शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलच्या ‘मंद’ गतीचा मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:21 IST

सर्वत्र आॅनलाईन व्यवहार झाल्याने इंटरनेटची आवश्यकता असते. बहुतांश कार्यालयात शासनाच्या अखत्यारितील भारत संचार निगमची (बीएसएनएल) सेवा आहे. मात्र गत महिन्याभरापासून बीएसएनएलच्या इंटरनेटची गती मंदावल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुणी तक्रार केली तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या सर्व प्रकाराला कंटाळून जिल्हा बँकेने तर आता खाजगी कंपनीची इंटरनेट सेवा घेतली आहे.

ठळक मुद्देलिंक फेलचे ग्रहण : जिल्हा बँकेने केली पर्यायी व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्वत्र आॅनलाईन व्यवहार झाल्याने इंटरनेटची आवश्यकता असते. बहुतांश कार्यालयात शासनाच्या अखत्यारितील भारत संचार निगमची (बीएसएनएल) सेवा आहे. मात्र गत महिन्याभरापासून बीएसएनएलच्या इंटरनेटची गती मंदावल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुणी तक्रार केली तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या सर्व प्रकाराला कंटाळून जिल्हा बँकेने तर आता खाजगी कंपनीची इंटरनेट सेवा घेतली आहे.भंडारा जिल्ह्यात सर्वत्र बीएसएनएलचे जाळे आहेत. सर्व शासकीय कार्यालयासह बँकांमध्ये बीएसएनएलचीच सेवा घेतली जाते. परंतु गत महिन्याभरापासून बीएसएनएलची सेवा ठेपाळली आहे. वारंवार लिंक फेल होत असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. राष्टÑीयकृत बँकासह विविध शासकीय कार्यालयातील कामकाजही ठप्प पडते. नागरिकांच्या रोषाचा सामना या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना करावा लागतो. याबाबत संबंधितांनी वारंवार बीएसएनएलकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्याऐवजी विविध कारणे सांगितले जातात. केबल तुटला आहे, दुरुस्तीचे काम सुरु आहे, असे ठेवणीतील उत्तर दिले जाते.सर्वाधिक फटका ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखांना बसत आहे. विविध कामांसाठी आलेल्या ग्राहकांना विशेषत: शेतक-यांना मनस्ताप सहन करावा लागतो. लिंक मिळत नसल्याने कर्मचारी ठप्प बसून असतात. याठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने वादाचे प्रसंग निर्माण होतात. बीएसएनएलच्या कारभाराचा मनस्ताप मात्र याठिकाणी कार्यरत कर्मचाºयांना सोसावा लागतो. याप्रकाराला कंटाळून जिल्हा बँकेने आता आपल्यासर्व शाखांमध्ये रिलायन्सीची सेवा घेण्याचे ठरविले आहे. १४ शाखांमध्ये रिलायन्सची सेवा घेण्यात आली असून इतर ठिकाणीही ही सेवा लवकरच घेतली जाणार आहे.बीएसएनएल कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. प्रत्येक वेळी नवीन कारण सांगितले जाते. त्यामुळे आम्ही पर्यायी व्यवस्था केली आहे. बीएसएनएलच्या विरोधात केंद्र सरकारकडे रितसर तक्रार करण्यात येईल. ग्राहकांना होत असलेल्या त्रसाबद्दल आम्ही दिलगिर आहोत.- सुनील फुंडे, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक, भंडारा