शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

स्पर्धात्मक परीक्षेतच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST

खांदूर : आधुनिकतेने झपाटलेल्या युगात सर्वांनाच शिक्षणीचे व तंत्राचे वेड लागले असले तरी या युगात तग धरायची असेल तर ...

खांदूर : आधुनिकतेने झपाटलेल्या युगात सर्वांनाच शिक्षणीचे व तंत्राचे वेड लागले असले तरी या युगात तग धरायची असेल तर स्पर्धात्मक परीक्षेतच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य असल्याचे मत डॉ. महेंद्र गजभिये यांनी व्यक्त केले. ते १३ फेब्रुवारी रोजी भंडारा येथील सामाजिक न्याय भवनातील सभागृहात आयोजीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, पाया मजबूत असेल तर इमारत उंच होईल, असे सांगताना प्रत्येक विद्यार्थ्याने प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक व पदवी शिक्षणापर्यंत कसोशीने प्रयत्न केले पाहिजे. समाजातील कोणी एक पदवीधर अथवा पदव्युत्तर घटक प्रशासकीय सेवेपासून उपेक्षित राहू नये यासाठी प्रत्येकांने शिक्षणाप्रति सामर्थ्यशाली बल दाखविले पाहिजे.

ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण अनेक विद्यार्थी असताना केवळ अजानतेपणामुळे या परीक्षेला पुढे जाण्याची हिम्मत दाखवत नसल्याचे चित्र आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षक पालकांनी महत्त्वाकांक्षी वृत्ती बाळगत भविष्यात विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेसाठी पात्र ठरावा, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले. सदर कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने तसेच सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग भंडारा यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, केंद्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा तसेच विविध परीक्षांची माहिती व अभ्यासपद्धती मिळण्याच्या हेतूने कार्यशाळेचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाच्या आयोजनात गणवीर व चव्हाण यांनी मोलाची कामगिरी बजावली.