शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 22:58 IST

तुमसर तालुक्यात तथा परिसरात बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करण्याकरिता नियमानुसार १२ ते १५ विविध प्रमाणपत्राची गरज आहे.

ठळक मुद्दे१२ ते १५ प्रमाणपत्राची गरज : आरओ प्लांटला सुगीचे दिवस

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यात तथा परिसरात बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करण्याकरिता नियमानुसार १२ ते १५ विविध प्रमाणपत्राची गरज आहे. वर्षाला किमान ६० ते ७० हजार रुपये खर्च करून संबंधित विभागाच्या परवानगी घ्यावी लागते. येथे तर दोन ते अडीच लाख रूपयात बाटलीबंद पाणी विक्रीचे कारखाने सुरू करण्यात आलेले आहे. शासकीय मानकांचा येथे पत्ताच नाही. अन्न व औषधी विभागाचे येथे दुर्लक्ष होत आहे.पाणी जीवन आहे. नगदी व्यवसाय म्हणून पाणी व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. घरीच विहिर खोदून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय थाटण्यात आला आहे. तुमसर परिसरात २२ ते २५ बाटलीबंद पाण्याचे कारखाने सुरु आहेत. किमा २ ते अडीच लाखांपासून तर दहा लाखापर्यंत हे शुध्द पाणी प्रक्रियेचे कारखाने सुरु केले आहेत. बाटलीबंद पाणी व्यवसायाचे अतिशय कठोर नियम आहेत. परंतु येथे नियम डावलून हा गोरखधंदा सर्रास सुरु आहे. प्रत्येक दुकानात शुध्द पाण्याच्या नावाखाली कॅन सर्वत्र दिसून येतात. शासकीय मानकानुसार ते शुध्द पाणी आहे काय? हा संशोधनाचा विषय आहे.काही आरो प्लांटला येथे परवानगी आहे, अशी माहिती आहे. परंतु अनेक आरो प्लांट येथे अधिकृत नाहीत अशी माहिती आहे. अन्न व औषधी विभागाची येथे परवानगीची गरज असून १२ ते १५ प्रमाणपत्रांची येथे नियमानुसार गरज आहे. सदर प्रमाणपत्र प्राप्त करणे हे मोठे अग्नीदिव्य आहे. शहरासोबतच गाव खेड्यातही सर्रास बाटलीबंद पाण्याचे कारखाने सुरु करण्यात आले आहे.नागपूर, रायपूर या महानगरासह मध्यप्रदेशातील अभियंते तथा तंत्रज्ञ स्वस्त दरात आरो प्लांट उभे करुन देतात. बेरोजगारीवर मात करण्यासाठी हा उद्योग अत्यंत चांगला विकल्प म्हणून पुढे आला आहे, परंतु नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.नामांकित कंपन्यांचे बाटलीबंद एक लिटर पाणी किमान १८ ते २० रूपयाला मिळते तिथे आरो प्लांटमध्ये १० ते १५ लिटरपाणी मध्ये ४० ते ४० रूपयात सहज उपलब्ध आहे. तालुका स्तरावर या बाटलीबंद पाणी व्यवसायाकडे सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. केवळ अन्न व औषधी प्रशासन विभागाकडेच कारवाई करण्याचा अधिकार आहे. अशी माहिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर विषयाकडे गांभीर्याने तपासणी करण्याचे निर्देश देण्याची गरज आहे.