शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 22:58 IST

तुमसर तालुक्यात तथा परिसरात बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करण्याकरिता नियमानुसार १२ ते १५ विविध प्रमाणपत्राची गरज आहे.

ठळक मुद्दे१२ ते १५ प्रमाणपत्राची गरज : आरओ प्लांटला सुगीचे दिवस

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यात तथा परिसरात बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करण्याकरिता नियमानुसार १२ ते १५ विविध प्रमाणपत्राची गरज आहे. वर्षाला किमान ६० ते ७० हजार रुपये खर्च करून संबंधित विभागाच्या परवानगी घ्यावी लागते. येथे तर दोन ते अडीच लाख रूपयात बाटलीबंद पाणी विक्रीचे कारखाने सुरू करण्यात आलेले आहे. शासकीय मानकांचा येथे पत्ताच नाही. अन्न व औषधी विभागाचे येथे दुर्लक्ष होत आहे.पाणी जीवन आहे. नगदी व्यवसाय म्हणून पाणी व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. घरीच विहिर खोदून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय थाटण्यात आला आहे. तुमसर परिसरात २२ ते २५ बाटलीबंद पाण्याचे कारखाने सुरु आहेत. किमा २ ते अडीच लाखांपासून तर दहा लाखापर्यंत हे शुध्द पाणी प्रक्रियेचे कारखाने सुरु केले आहेत. बाटलीबंद पाणी व्यवसायाचे अतिशय कठोर नियम आहेत. परंतु येथे नियम डावलून हा गोरखधंदा सर्रास सुरु आहे. प्रत्येक दुकानात शुध्द पाण्याच्या नावाखाली कॅन सर्वत्र दिसून येतात. शासकीय मानकानुसार ते शुध्द पाणी आहे काय? हा संशोधनाचा विषय आहे.काही आरो प्लांटला येथे परवानगी आहे, अशी माहिती आहे. परंतु अनेक आरो प्लांट येथे अधिकृत नाहीत अशी माहिती आहे. अन्न व औषधी विभागाची येथे परवानगीची गरज असून १२ ते १५ प्रमाणपत्रांची येथे नियमानुसार गरज आहे. सदर प्रमाणपत्र प्राप्त करणे हे मोठे अग्नीदिव्य आहे. शहरासोबतच गाव खेड्यातही सर्रास बाटलीबंद पाण्याचे कारखाने सुरु करण्यात आले आहे.नागपूर, रायपूर या महानगरासह मध्यप्रदेशातील अभियंते तथा तंत्रज्ञ स्वस्त दरात आरो प्लांट उभे करुन देतात. बेरोजगारीवर मात करण्यासाठी हा उद्योग अत्यंत चांगला विकल्प म्हणून पुढे आला आहे, परंतु नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.नामांकित कंपन्यांचे बाटलीबंद एक लिटर पाणी किमान १८ ते २० रूपयाला मिळते तिथे आरो प्लांटमध्ये १० ते १५ लिटरपाणी मध्ये ४० ते ४० रूपयात सहज उपलब्ध आहे. तालुका स्तरावर या बाटलीबंद पाणी व्यवसायाकडे सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. केवळ अन्न व औषधी प्रशासन विभागाकडेच कारवाई करण्याचा अधिकार आहे. अशी माहिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर विषयाकडे गांभीर्याने तपासणी करण्याचे निर्देश देण्याची गरज आहे.