शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जदार शेतकरी सावकाराच्या दारात

By admin | Updated: May 15, 2014 23:18 IST

निसर्गाचा प्रकोप, सततची नापिकी, बियाणे व खताचे वाढते भाव, शेतमालाची कमी भावात विक्री अशा चौफेर संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांवर बँकांचे कर्ज थकीत झाले आहे.

भंडारा : निसर्गाचा प्रकोप, सततची नापिकी, बियाणे व खताचे वाढते भाव, शेतमालाची कमी भावात विक्री अशा चौफेर संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांवर बँकांचे कर्ज थकीत झाले आहे. काही शेतकरी जुळवाजुळव करुन थकित कर्ज अदा करीत आहेत तरण नवीन कर्जासाठी शेतकरी बँकेत चकरा मारत असल्याचे दिसते. बँकेतही शेतकर्‍यांची अडवणूक होत असल्याने यावर्षीही शेतकर्‍यांना कर्जासाठी सावकाराच्या दारी जावे लागणार असल्याचे दिसते.

उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे. शिक्षणाच्या खर्चातही वाढ झाली असून तो न झेपावणारा आहे. मेंदूत हुशार असताना आर्थिक विवंचनेमुळे शेतकर्‍यांच्या मुलांना इच्छा असून आवडीचे शिक्षण घेता येत नाही. मुला-मुलींचे लग्न करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव जड जात आहे. ज्या शेतकर्‍यांनी श्रमाचा पै-पै बँकेत जमा केला तो पैसा बँक गरजेच्यावेळी देत नाही. असे असताना शेतकर्‍यांच्या प्रश्नांना बगल देत राजकीय मंडळी पोळ्या शेकण्यात व्यस्त दिसत आहेत. शेतकर्‍यांच्या शेतमालाचे भाव अचानक पडले. जो माल शेतकर्‍यांकडे नाही, जो व्यापार्‍याच्या गोदामात पोहोचला त्याचे भाव वाढत आहेत. या विसंगतीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. सहकारी सोसायटी कर्ज देऊ शकत नाही. राष्ट्रीयकृत बँका सहजासहजी शेतकर्‍याला कर्ज देत नाही. दिलेच तर कागदपत्रे गोळा करताना त्याची दमछाक होते. शेतीचे भाव कितीही वाढले असले तरी त्या शेतीवर शेतकर्‍याला नाममात्र कर्ज मिळते. तेवढय़ा रकमेत वाढत्या दराने बियाणे, खते, किटकनाशके यांचा ताळमेळ बसत नाही. निंदण, खुरपणासाठी पैसा राहत नाही व शेतकर्‍यांना अपेक्षीत उत्पन्नही होत नाही. त्यातही निसर्गाचा लहरीपणा शेतकर्‍यांच्या पाचवीलाच पूजलेला आहे. यामुळे तो संकटात सापडला आहे. अशा स्थितीत नाईलाजाने शेतकर्‍यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. सावकार शेतकर्‍यांच्या जमिनीचे सरळ विक्रीपत्र स्वत:च्या वा नातेवाईकाच्या नावे करुन तुटपुंजी रक्कम शेतकर्‍यांच्या पदरात टाकते. अज्ञानी शेतकर्‍यांना सर्व कळत असताना हे कृत्य करतो. यात अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. एकेकाळी सावकारांना सोलून काढण्याची भाषा करण्यात आली. पण येथे सावकारच शेतकर्‍यांना सोलून काढण्याची भाषा करीत असल्याचे दिसते. जिल्ह्यात कित्येक शेतकर्‍यांच्या उभ्या पिकाला भुईसपाट करुन शेताचा ताबा सावकरांनी घेतला. पण त्यांच्यासमोर कुणाचे काहीच चालले नाही. ज्यांनी पोलीस ठाण्याचा आधार घेण्याचा प्रयत्न केला त्यांना सावकारांनी शेताचे रजिस्टर्ड विक्रीपत्र दाखविले. चिरीमिरी देत अन्यायग्रस्त शेतकर्‍यांना न्यायालयात जाण्याचे सल्ले देण्यात आले. (नगर प्रतिनिधी)