शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

कर्जदार शेतकरी सावकाराच्या दारात

By admin | Updated: May 15, 2014 23:18 IST

निसर्गाचा प्रकोप, सततची नापिकी, बियाणे व खताचे वाढते भाव, शेतमालाची कमी भावात विक्री अशा चौफेर संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांवर बँकांचे कर्ज थकीत झाले आहे.

भंडारा : निसर्गाचा प्रकोप, सततची नापिकी, बियाणे व खताचे वाढते भाव, शेतमालाची कमी भावात विक्री अशा चौफेर संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांवर बँकांचे कर्ज थकीत झाले आहे. काही शेतकरी जुळवाजुळव करुन थकित कर्ज अदा करीत आहेत तरण नवीन कर्जासाठी शेतकरी बँकेत चकरा मारत असल्याचे दिसते. बँकेतही शेतकर्‍यांची अडवणूक होत असल्याने यावर्षीही शेतकर्‍यांना कर्जासाठी सावकाराच्या दारी जावे लागणार असल्याचे दिसते.

उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे. शिक्षणाच्या खर्चातही वाढ झाली असून तो न झेपावणारा आहे. मेंदूत हुशार असताना आर्थिक विवंचनेमुळे शेतकर्‍यांच्या मुलांना इच्छा असून आवडीचे शिक्षण घेता येत नाही. मुला-मुलींचे लग्न करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव जड जात आहे. ज्या शेतकर्‍यांनी श्रमाचा पै-पै बँकेत जमा केला तो पैसा बँक गरजेच्यावेळी देत नाही. असे असताना शेतकर्‍यांच्या प्रश्नांना बगल देत राजकीय मंडळी पोळ्या शेकण्यात व्यस्त दिसत आहेत. शेतकर्‍यांच्या शेतमालाचे भाव अचानक पडले. जो माल शेतकर्‍यांकडे नाही, जो व्यापार्‍याच्या गोदामात पोहोचला त्याचे भाव वाढत आहेत. या विसंगतीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. सहकारी सोसायटी कर्ज देऊ शकत नाही. राष्ट्रीयकृत बँका सहजासहजी शेतकर्‍याला कर्ज देत नाही. दिलेच तर कागदपत्रे गोळा करताना त्याची दमछाक होते. शेतीचे भाव कितीही वाढले असले तरी त्या शेतीवर शेतकर्‍याला नाममात्र कर्ज मिळते. तेवढय़ा रकमेत वाढत्या दराने बियाणे, खते, किटकनाशके यांचा ताळमेळ बसत नाही. निंदण, खुरपणासाठी पैसा राहत नाही व शेतकर्‍यांना अपेक्षीत उत्पन्नही होत नाही. त्यातही निसर्गाचा लहरीपणा शेतकर्‍यांच्या पाचवीलाच पूजलेला आहे. यामुळे तो संकटात सापडला आहे. अशा स्थितीत नाईलाजाने शेतकर्‍यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. सावकार शेतकर्‍यांच्या जमिनीचे सरळ विक्रीपत्र स्वत:च्या वा नातेवाईकाच्या नावे करुन तुटपुंजी रक्कम शेतकर्‍यांच्या पदरात टाकते. अज्ञानी शेतकर्‍यांना सर्व कळत असताना हे कृत्य करतो. यात अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. एकेकाळी सावकारांना सोलून काढण्याची भाषा करण्यात आली. पण येथे सावकारच शेतकर्‍यांना सोलून काढण्याची भाषा करीत असल्याचे दिसते. जिल्ह्यात कित्येक शेतकर्‍यांच्या उभ्या पिकाला भुईसपाट करुन शेताचा ताबा सावकरांनी घेतला. पण त्यांच्यासमोर कुणाचे काहीच चालले नाही. ज्यांनी पोलीस ठाण्याचा आधार घेण्याचा प्रयत्न केला त्यांना सावकारांनी शेताचे रजिस्टर्ड विक्रीपत्र दाखविले. चिरीमिरी देत अन्यायग्रस्त शेतकर्‍यांना न्यायालयात जाण्याचे सल्ले देण्यात आले. (नगर प्रतिनिधी)