शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

पुस्तके ई-स्वरुपात उपलब्ध व्हावी

By admin | Updated: February 17, 2016 00:17 IST

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्व पुस्तके ई-पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध करुन दिलीत तर आजची तरुण पिढी आपोआप वाचनाकडे वळेल,...

भंडारा ग्रंथोत्सव समारोप : अर्चना कसबेकर यांचे प्रतिपादनभंडारा : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्व पुस्तके ई-पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध करुन दिलीत तर आजची तरुण पिढी आपोआप वाचनाकडे वळेल, असे मत अप्पर कोषागार अधिकारी अर्चना कसबेकर यांनी व्यक्त केले. तीन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक नीळकंठ रणदिवे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे उपस्थित होते. अर्चना कसबेकर म्हणाल्या, ग्रंथ माणसांसारखा स्वार्थी नाही. त्यामुळे पुस्तकांसारखा मित्र कायम आपल्या सोबतीला राहतो. पुस्तकातून आपल्याला इतिहास, भुगोल, खानपान संस्कृती, यश कसे मिळवावं, समाजात कसे वागावे-बोलावे अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पुस्तक का वाचावं याच महत्व जर आजच्या मुलांना पटवून दिलं तर ही पिढी सुध्दा पुस्तकांकडे वळेल. माणसाला माणुस बनण्यासाठी ग्रंथाचं व्यसन हवं. हे व्यसन एकदा लागलं की ते सुटत नाही. सातत्याने चालणारा विचार प्रवाह म्हणजे मन. या विचार प्रवाहाला आवश्यकता आहे ती शब्दांची आणि पुस्तकांची . ग्रंथ तुम्हाला शहाणपण शिकवतील ते आत्मसात करा, असे विचार निळकंठ रणदिवे यांनी व्यक्त केले. यावेळी ग्रंथालय अधिकारी बोपचे यांनी प्रास्ताविकातून तीन दिवस पार पडलेल्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती दिली. या प्रसंगी जिल्हा ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विवेकानंद आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रतिमा ग्रंथालयाला भेट म्हणून दिली. यावेळी जिल्हयातील ग्रंथालयांचे ग्रंथपाल, पुस्तकप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)