शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

बोगस बियाणे बाजारात येणार!

By admin | Updated: June 3, 2015 00:43 IST

जगाच्या स्पर्धेत शेतकरीही सहभागी झाल्याने रेडीमेड बियाणे खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

पालांदूर : जगाच्या स्पर्धेत शेतकरीही सहभागी झाल्याने रेडीमेड बियाणे खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कंपन्यांनीही शेतकऱ्यांची कमजोरी व अज्ञानाचा लाभ उठवत दरवर्षी डझनभर नवीन वाण आणून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. जिल्ह्यात धान बियाणे कृषीकेंद्रात आले असून विक्रीकरीता उपलब्ध लवकरच होणार आहेत. यात बोगस बियाणे असण्याची चिन्हे अधिक आहेत.धानाचा एक वाण तयार करण्याकरीता, शोधण्याकरीता सुमारे दहा ते बारा वर्ष लागतात. मात्र बाजारात दरवर्षी नवनवीन वाण आणून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जाते. वाण/जात एकच असते. फक्त पॅकींग व कंपनीचे नाव बदलवून अधिक नफा कमविण्याच्या लालसेने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जातात. दोन वर्षापूर्वी खराशी व पालांदूर परिसरात अशाच एका नामवंत कंपनीचे आरपीएन जातीचे वाण बोगगस निघाले.साठ टक्क्याच्या वर भेसळ बियाणे असल्याने निसण्यावर विपरीत परिणाम होऊन उत्पन्न नाहीच्या बरोबर आले. तक्रार झाली, चौकशी आटोपली पण अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने कंपनी मोकळी सुटली. कालपरवा पर्यंत कर्तव्यनिष्ठ समजले जाणारे कृषी विभागाचे अधिकारीही प्रवाहासोबत राहून शेतकऱ्यांवर अन्याय करतात. रब्बीतही याच कंपनीचे बियाणे धोकादायक ठरतात. धान निसवल्यावर असताना काही गर्भात, काही पूर्णपणे फुललेला तर काही पूर्णपणे भरलेला असतो. एकावेळी पूर्ण धान कापणीला येत नाही. यामुळे कालावधी निश्चिततेपेक्षा अधिक राहतो. यामुळे हंगाम धोक्यात येऊन नुकसानीची भिती अधिक असते. (वार्ताहर)शक्यतो घरचे बियाणे वापराशेतकऱ्यांनो, नफा-तोटा लक्षात घेऊन शेती करणे अगत्याचे आहे. ९०-१२५ रुपये प्रति किलो भावाचे धान बियाणे खरेदी करण्यापेक्षा घरचेच वाण योग्य काळजीने ठेवले तर दरवर्षी नवीन बियाणे घेणे गरजेचे राहणार नाही. आपली शेती परावलंबी करु नका. बियाणे स्वत: शोधा, तयार करा व स्वत:च पुढे येऊन नवीन काहीतरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. जुने ते सोने म्हणत यातूनच नवीन वाणाची निर्मिती होते तसा प्रयोग स्वत:पासून तयार करा. याकरीता शासनाची कृषी विभागाकडून माहिती पुरविली जाते. जुने घरचेच वाण बियाणे म्हणून वापरताना साधी घरच्याघरी प्रक्रिया करुन बियाणे वापरु शकता.