शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

By admin | Updated: March 24, 2015 00:15 IST

सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडविणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आहे.

साकोली : सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडविणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आहे. जेव्हा केंद्रात व राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे आता दिसेनासे झाले आहेत. यावर्षी गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. धानाला भाव नाही. त्यामुळे निसर्गासोबतच शासनही शेतकऱ्यांवर कोपला आहे. आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची वेळ आली आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांनी केली. लहरीबाबा मठ देवस्थान साकोली येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, आ.राजेंद्र जैन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, अविनाश ब्राम्हणकर, सदाशिव वलथरे, धनंजय दलाल, पद्माकर गहाणे, दामाजी खंडाईत, सुरेश कापगते, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, हेमकृष्ण वाडीभस्मे, डॉ.अनिल शेंडे, एन.सी. लोधीकर उपस्थित होते.यावेळी सदाशिव वलथरे यांनी काही राजकारणी लोक खोटे बोलून, आमीष दाखवून राजकारण करतात. त्यामुळे अशा राजकारण्यांजवळ कार्यकर्ते जास्त काळ टिकून राहत नाही अशीच परिस्थिती विरोधी पक्षाची झाली आहे. राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्यांच्या भावना जाणणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनी मनापासून काम करायला हवे, तरच पक्ष मजबूत होईल, असे सांगितले.संचालन सुधन्वा चेटुले यांनी तर आभार प्रदर्शन अनिल टेंभरे यांनी केले. कार्यक्रमाला अंगराज समरीत, सुरेश बघेल, उर्मिला आगाशे, जया भुरे, रामचंद्र कोहळे, सुरेखा शहारे, डॉ.राजेश चंदवानी, अ‍ॅड.अग्रवाल, शैलेश गजभिये, हेमंत भारद्वाज, ओम गायकवाड, रवी राऊत, मुशीर खान, राशीद कुरैशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वासुदेव तितीरमारे व जिल्हा मच्छीमार संघाचे संचालक अमृत मोहनकर यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. (तालुका प्रतिनिधी)