शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

By admin | Updated: March 24, 2015 00:15 IST

सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडविणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आहे.

साकोली : सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडविणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आहे. जेव्हा केंद्रात व राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे आता दिसेनासे झाले आहेत. यावर्षी गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. धानाला भाव नाही. त्यामुळे निसर्गासोबतच शासनही शेतकऱ्यांवर कोपला आहे. आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची वेळ आली आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांनी केली. लहरीबाबा मठ देवस्थान साकोली येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, आ.राजेंद्र जैन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, अविनाश ब्राम्हणकर, सदाशिव वलथरे, धनंजय दलाल, पद्माकर गहाणे, दामाजी खंडाईत, सुरेश कापगते, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, हेमकृष्ण वाडीभस्मे, डॉ.अनिल शेंडे, एन.सी. लोधीकर उपस्थित होते.यावेळी सदाशिव वलथरे यांनी काही राजकारणी लोक खोटे बोलून, आमीष दाखवून राजकारण करतात. त्यामुळे अशा राजकारण्यांजवळ कार्यकर्ते जास्त काळ टिकून राहत नाही अशीच परिस्थिती विरोधी पक्षाची झाली आहे. राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्यांच्या भावना जाणणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनी मनापासून काम करायला हवे, तरच पक्ष मजबूत होईल, असे सांगितले.संचालन सुधन्वा चेटुले यांनी तर आभार प्रदर्शन अनिल टेंभरे यांनी केले. कार्यक्रमाला अंगराज समरीत, सुरेश बघेल, उर्मिला आगाशे, जया भुरे, रामचंद्र कोहळे, सुरेखा शहारे, डॉ.राजेश चंदवानी, अ‍ॅड.अग्रवाल, शैलेश गजभिये, हेमंत भारद्वाज, ओम गायकवाड, रवी राऊत, मुशीर खान, राशीद कुरैशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वासुदेव तितीरमारे व जिल्हा मच्छीमार संघाचे संचालक अमृत मोहनकर यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. (तालुका प्रतिनिधी)