शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर पालिकेवर भाजपचा हल्लाबोल

By admin | Updated: July 13, 2016 01:32 IST

जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे तुमसर शहरात मागील १० दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा सुरू आहे.

प्रकरण चिखलमिश्रित पाणीपुरवठ्याचे : मुख्याधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न तुमसर : जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे तुमसर शहरात मागील १० दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा सुरू आहे. १० दिवसांपासून ही समस्या कायम असल्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी यांच्या नेतृत्वात मंगळवारला भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेवर हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. तुमसर शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाडामुळे चिखलमय पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळा सुरू झाला असून चिखलमिश्रीत पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे पालिकेचे लक्ष वेधून घेण्याकरिता हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांच्या कक्षात जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, शहराध्यक्ष विजय जायस्वाल, भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम लांजेवार, माजी नगरसेवक प्रमोद घरडे, खेमराज गभणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. चिखलमिश्रीत पाणी एका बॉटलमध्ये भरून खेमराज गभने व प्रमोद घरडे यांनी नेले होते. शहरवासीयांना हे दूषित पाणी प्यावे लागते, असे सांगून हे पाणी तुम्ही प्या, यावरून चांगलीच शाब्दिक चकमक झाली. जलशुद्धीकरण केंद्र आठ दिवसात दुरुस्ती करून शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. यावेळी जिल्हा महासचिव प्रदीप पडोळे, प्रमोद घरडे, सुनिल लांजेवार, श्याम धुर्वे, शैलेश मेश्राम, लक्ष्मीकांत सलामे, योगेश रंगवानी, दिपक कठाणे, मुन्ना पुंडे, शोभा लांजेवार, कैलाश पडोळे, खेमराज गभने, ललित शुक्ला, अनिल साठवणे, डॉ.चंद्रशेखर भोयर, शेखर मलेवार, शेखर बिसेन, हुकुमचंद साखरवाडे, राजू गायधने, दिपक साकुरे, सज्जू शेख, बापू धांडे, सागर बिसने, अतुल चौधरी, नवनाथ मेश्राम, महेश आलमकर, गणेश मस्के, नरेंद्र मारबते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी/शहर प्रतिनिधी) भाजपच जबाबदार -नगराध्यक्ष महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सन २००७ ला कोष्टी येथील पंपहाऊस नगरपरिषदेला हस्तांतरीत केली. त्यावेळी भाजपच्या नगराध्यक्षा गीता कोंडेवार होत्या. त्यावेळी तत्कालीन पाणी पुरवठा सभापती आशिष कुकडे यांनी ती योजना घेण्यापूर्वी प्राधिकरणाने हस्तांतरीत करावे याकरिता आक्षेप नोंदविले होते. परंतु श्रेय लाटण्यासाठी बिघाड असलेली योजना हस्तांतरीत केल्याने शहरवासीयांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.