शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
3
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
4
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
5
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
6
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
7
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
8
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
9
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
10
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
11
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
12
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
13
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
14
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
15
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
16
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
17
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
18
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
19
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
20
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर पालिकेवर भाजपचा हल्लाबोल

By admin | Updated: July 13, 2016 01:32 IST

जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे तुमसर शहरात मागील १० दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा सुरू आहे.

प्रकरण चिखलमिश्रित पाणीपुरवठ्याचे : मुख्याधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न तुमसर : जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे तुमसर शहरात मागील १० दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा सुरू आहे. १० दिवसांपासून ही समस्या कायम असल्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी यांच्या नेतृत्वात मंगळवारला भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेवर हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. तुमसर शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाडामुळे चिखलमय पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळा सुरू झाला असून चिखलमिश्रीत पाणी पिण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे पालिकेचे लक्ष वेधून घेण्याकरिता हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांच्या कक्षात जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, शहराध्यक्ष विजय जायस्वाल, भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम लांजेवार, माजी नगरसेवक प्रमोद घरडे, खेमराज गभणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. चिखलमिश्रीत पाणी एका बॉटलमध्ये भरून खेमराज गभने व प्रमोद घरडे यांनी नेले होते. शहरवासीयांना हे दूषित पाणी प्यावे लागते, असे सांगून हे पाणी तुम्ही प्या, यावरून चांगलीच शाब्दिक चकमक झाली. जलशुद्धीकरण केंद्र आठ दिवसात दुरुस्ती करून शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. यावेळी जिल्हा महासचिव प्रदीप पडोळे, प्रमोद घरडे, सुनिल लांजेवार, श्याम धुर्वे, शैलेश मेश्राम, लक्ष्मीकांत सलामे, योगेश रंगवानी, दिपक कठाणे, मुन्ना पुंडे, शोभा लांजेवार, कैलाश पडोळे, खेमराज गभने, ललित शुक्ला, अनिल साठवणे, डॉ.चंद्रशेखर भोयर, शेखर मलेवार, शेखर बिसेन, हुकुमचंद साखरवाडे, राजू गायधने, दिपक साकुरे, सज्जू शेख, बापू धांडे, सागर बिसने, अतुल चौधरी, नवनाथ मेश्राम, महेश आलमकर, गणेश मस्के, नरेंद्र मारबते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी/शहर प्रतिनिधी) भाजपच जबाबदार -नगराध्यक्ष महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सन २००७ ला कोष्टी येथील पंपहाऊस नगरपरिषदेला हस्तांतरीत केली. त्यावेळी भाजपच्या नगराध्यक्षा गीता कोंडेवार होत्या. त्यावेळी तत्कालीन पाणी पुरवठा सभापती आशिष कुकडे यांनी ती योजना घेण्यापूर्वी प्राधिकरणाने हस्तांतरीत करावे याकरिता आक्षेप नोंदविले होते. परंतु श्रेय लाटण्यासाठी बिघाड असलेली योजना हस्तांतरीत केल्याने शहरवासीयांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.