शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजिवांच्या पीक नुकसानभरपाईसाठी भंडारा वनविभागाला २.११ कोटींच्या निधीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:26 IST

करडी (पालोरा) : भंडारा वनविभागात वन्यजिवांमुळे पीक व अन्य नुकसानभरपाईची शेकडो प्रकरणे सहा महिने ते वर्षभरापासून प्रलंबित आहेत. निधी ...

करडी (पालोरा) : भंडारा वनविभागात वन्यजिवांमुळे पीक व अन्य नुकसानभरपाईची शेकडो प्रकरणे सहा महिने ते वर्षभरापासून प्रलंबित आहेत. निधी मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे एकीकडे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे; तर दुसरीकडे कोरोना संकटकाळ असताना वनाधिकाऱ्यांकडे शेतकरी वर्गाची वाढलेली वर्दळ काळजी वाढविणारी ठरत आहे. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी वनविभागाला सुमारे २ कोटी ११ लाख रुपयांची गरज आहे. नुकतीच तशी मागणी विभागीय वनाधिकाऱ्यांकडे भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयाने केली आहे.

भंडारा जिल्हा धान पिकाबरोबर जंगलाचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. जिल्ह्याला निसर्गसंपन्नतेचे वरदान लाभले आहे. वनांना व वन्यजीवांना संरक्षण व उपयुक्त निवासाची सोय उपलब्ध झाल्याने वन्यप्राण्यांची संख्या वेगाने वाढली. परंतु जंगलात पर्याप्त खाद्य उपलब्ध होत नसल्याने पहाटे व सायंकाळच्यासुमारास जंगल परिसरातील शेतशिवारात वन्यप्राण्यांचा संचार वाढीस लागला आहे. परिणामी मानव व वन्यजीव संघर्ष नेहमीची बाब ठरली आहे.

बॉक्स

नुकसानभरपाईची रक्कम तुटपुंजी

शासन प्रशासनाने वन्यजीवांचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी अनेक कठोर कायदे तयार केले. मात्र वन्यप्राण्यांपासून मिळणारी मदत अजूनही तुटपुंजी ठरत आहे. लाखोंचे नुकसान होत असताना हजारांत नुकसानभरपाई शेतकरी वर्गाच्या पदरी पडते. ती सुध्दा निश्चित वेळेत मिळत नसल्याने अनेकदा वनाधिकाऱ्यांना शेतकरी वर्गाच्या रोषाला सामोरे जावे लागते. वारंवार नुकसानभरपाईची रक्कम वाढविण्याची मागणी होत असताना शासनाचे त्याकडे होणारे दुर्लक्ष शेतकरी वर्गात असंतोष वाढविणारे ठरत आहे.

कोट

''जिल्ह्यात वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानभरपाईची प्रकरणे प्रलंबित आहेत. नुकतेच विभागीय कार्यालयाकडे २ कोटी ११ लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्याला निधी प्राप्त होताच प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा केला जाणार आहे.''

- एस. बी. भलावी, उपवनसंरक्षक, वनविभाग, भंडारा