शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

भंडारा जिल्ह्यात मेंढपाळ चारा-पाण्याच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 11:11 IST

जिल्ह्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस चांगलीच वाढ होत असल्याने वाढत्या तापमानाचा फटका मानवासोबतच जिल्ह्यातील पशुंनाही बसत आहे.

ठळक मुद्देउन्हामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस चांगलीच वाढ होत असल्याने वाढत्या तापमानाचा फटका मानवासोबतच जिल्ह्यातील पशुंनाही बसत आहे.उन्हाच्या वाढत्या झळांचा फटका शेळ्या,मेंढ्या,दूघ उत्पादकांना बसू लागला आहे.गुरांसह, बकऱ्यांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यात मेंढपाळांची ससेहोलपट होत असून जास्त प्रमाणात बकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामीण भागात अनेक पशुपालकांचे संसार शेळीपालन,मेंढपालनावर चालतात.ग्रामीण भागात चरीतार्थाचे साधन म्हणून शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरत असताना वाढत्या तापमानामुळे उष्माघातात शेळ्या आजारी पडू लागल्या आहेत.परंतु मुख्यालयी असणारे पयुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने उपचाराअभावी जनावरे दगावू लागली आहेत. अधिकाºयांनी उप स्थित राहून पशुपालकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.पाणीटंचाईमुळे ईतर जिल्ह्यातील देखील मेंढपाळांचे कळप चाऱ्याच्या शोधार्थ दाखल झाले आहेत. यामध्ये अन्य जिल्ह्यातील मेंढपाळ आले आहेत. उन्हाळा संपल्यानंतर पुन्हा हे मेंढराचे कळप पुन्हा आपल्या जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली की परत जात असतात.जिल्ह्यात सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात हे कळप चाऱ्याच्या शोधार्थ भटकंती करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील शेतीचा हंगाम संपला असून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील रब्बीची पीके काढली आहेत. त्यामुळे शेतशिवारे रिकामे झाल्यामुळे मेंढपाळांना चारा काही प्रमाणात उपलब्ध होत आहे. मात्र पाण्याचा तुटवडा जाणवत अ सल्याने जेथे पाण्याची सोय आहे त्याच भागात हे कळप स्थिरावत आहेत.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असणारे पाझर तलाव, विहिरी, कुपनलिका, नद्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी बकऱ्यांना पिण्याचे पाणी व चरण्यासाठी झाडपाला मिळत नसून मेंढपाळांना स्वत:च्या आरोग्यासह आपल्या जितराबांचा प्रश्न सतावतो आहे. मेंढपाळांसोबत स्वत:चे कुटुंब असल्याने चिमुकल्या मुलांचे आरोग्यही बिघडत आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून दुर्लक्षीत असणाऱ्या मेंढपाळांकडे शासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.उष्माघाताचा पशुधनाला बसतोय फटकाउन्हाच्या वाढलेल्या काहीलीमुळे जिल्ह्यातील पशुधनाला फटका बसत असून वाढत्या तापमानामुळे अनेक पशुपालक धास्तावलेले आहेत.गाई,म्हशी, शेळ्या ,मेंढ्यासह जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून काही ठिकाणी बकºया उष्माघाताच्या बळी ठरत आहेत. शेतीचा पोत वाढवण्यासाठी शेतात बसवलेल्या मेंढ्यांना चारापाण्याच्या शोधार्थ राणावणातच भटकावे लागते. पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी हजर राहत नसल्याने पशूंना वळेवर उपचार मिळत नसल्याने बकºयांसह, मेंढ्यांना याचा फटका बसत आहे.

टॅग्स :foodअन्न