शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

भंडारा जिल्ह्यात मेंढपाळ चारा-पाण्याच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 11:11 IST

जिल्ह्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस चांगलीच वाढ होत असल्याने वाढत्या तापमानाचा फटका मानवासोबतच जिल्ह्यातील पशुंनाही बसत आहे.

ठळक मुद्देउन्हामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस चांगलीच वाढ होत असल्याने वाढत्या तापमानाचा फटका मानवासोबतच जिल्ह्यातील पशुंनाही बसत आहे.उन्हाच्या वाढत्या झळांचा फटका शेळ्या,मेंढ्या,दूघ उत्पादकांना बसू लागला आहे.गुरांसह, बकऱ्यांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यात मेंढपाळांची ससेहोलपट होत असून जास्त प्रमाणात बकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामीण भागात अनेक पशुपालकांचे संसार शेळीपालन,मेंढपालनावर चालतात.ग्रामीण भागात चरीतार्थाचे साधन म्हणून शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरत असताना वाढत्या तापमानामुळे उष्माघातात शेळ्या आजारी पडू लागल्या आहेत.परंतु मुख्यालयी असणारे पयुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने उपचाराअभावी जनावरे दगावू लागली आहेत. अधिकाºयांनी उप स्थित राहून पशुपालकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.पाणीटंचाईमुळे ईतर जिल्ह्यातील देखील मेंढपाळांचे कळप चाऱ्याच्या शोधार्थ दाखल झाले आहेत. यामध्ये अन्य जिल्ह्यातील मेंढपाळ आले आहेत. उन्हाळा संपल्यानंतर पुन्हा हे मेंढराचे कळप पुन्हा आपल्या जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली की परत जात असतात.जिल्ह्यात सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात हे कळप चाऱ्याच्या शोधार्थ भटकंती करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील शेतीचा हंगाम संपला असून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील रब्बीची पीके काढली आहेत. त्यामुळे शेतशिवारे रिकामे झाल्यामुळे मेंढपाळांना चारा काही प्रमाणात उपलब्ध होत आहे. मात्र पाण्याचा तुटवडा जाणवत अ सल्याने जेथे पाण्याची सोय आहे त्याच भागात हे कळप स्थिरावत आहेत.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असणारे पाझर तलाव, विहिरी, कुपनलिका, नद्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी बकऱ्यांना पिण्याचे पाणी व चरण्यासाठी झाडपाला मिळत नसून मेंढपाळांना स्वत:च्या आरोग्यासह आपल्या जितराबांचा प्रश्न सतावतो आहे. मेंढपाळांसोबत स्वत:चे कुटुंब असल्याने चिमुकल्या मुलांचे आरोग्यही बिघडत आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून दुर्लक्षीत असणाऱ्या मेंढपाळांकडे शासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.उष्माघाताचा पशुधनाला बसतोय फटकाउन्हाच्या वाढलेल्या काहीलीमुळे जिल्ह्यातील पशुधनाला फटका बसत असून वाढत्या तापमानामुळे अनेक पशुपालक धास्तावलेले आहेत.गाई,म्हशी, शेळ्या ,मेंढ्यासह जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून काही ठिकाणी बकºया उष्माघाताच्या बळी ठरत आहेत. शेतीचा पोत वाढवण्यासाठी शेतात बसवलेल्या मेंढ्यांना चारापाण्याच्या शोधार्थ राणावणातच भटकावे लागते. पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी हजर राहत नसल्याने पशूंना वळेवर उपचार मिळत नसल्याने बकºयांसह, मेंढ्यांना याचा फटका बसत आहे.

टॅग्स :foodअन्न