शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

भागवत समितीने पार पाडली आई-बाप-भावाची भूमिका

By admin | Updated: April 14, 2017 00:34 IST

मुलीचा विवाह म्हटले की, आनंदाचा क्षण. या कार्यात वर-वधू दोघांच्याही कुटुंबात एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो.

नवदाम्पत्यांनाही आवरता आले नाही अश्रू : सामूहिक विवाह सोहळ्यातील हृदयस्पर्शी प्रसंगविशाल रणदिवे  अड्याळमुलीचा विवाह म्हटले की, आनंदाचा क्षण. या कार्यात वर-वधू दोघांच्याही कुटुंबात एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. जेव्हा मुलगी विवाह होऊन माहेर सोडून सासरी जाते, तो क्षण मात्र आजही आधुनिक युग असले तरी मुलगी तिचे भाऊ बंध, आईवडील हे सर्व कुणी डोळ्यातून अश्रू पाडतात तर कुणी मनातल्या मनात. मुलगी आपली ताई, आपल्या पोटचा गोळा नेहमीसाठी परघरी जाते त्याचे दु:ख आणि तिचा विवाह आल्याचा आनंद मानत असतात.अड्याळ नगरीत हनुमान जयंती निमित्त भागवत सप्ताहाचे आयोजन केले गेले होते. यावर्षीही सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहा जोडपी विवाहबद्ध झाले. विवाह संपन्न झाल्यानंतर परंपरेनुसार मुलीची ‘पाठवणी’ केल्या जाते. तसेच घरच्यासारखे कार्यक्रम या सामूहिक विवाह सोहळ्यात भागवत समितीने व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केल्यामुळे सोहळ्यात असलेल्या उपस्थितीत मंडळींनी भागवत समितीचे आभार मानले. लग्नानंतर मुलीला मुलाच्या स्वाधीन करताना जी परंपरा आहे ती परंपरा पहिल्यांदाच सामूहिक विवाह सोहळ्यात पार पडत असताना भागवत समितीचे कार्यकारी अध्यक्ष महेश गभणे, सचिव राजेश गभणे, समितीचे संपूर्ण पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यासाठी थोरामोठ्यांनी सहकार्य केले. मंडपात बसलेल्या हजारो लोकांना महिला तसेच बालकांना सांभाळणे म्हणजे तारेवरची करसरतच यासाठी पोलीस विभाग सुद्धा सज्ज होते. अड्याळ येथे ज्यांनी भागवत सप्ताह सुरु केले, ते आज म्हातारे झाले असले तरी त्यांच्या अनुभवाचा सल्ला, मार्गदर्शन युवा पिढीला लाभत असल्यामुळे या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा आजही कायम आहे. या वरवधू ‘पाठवणी’ कार्यक्रमात या सोहळ्यात ज्या मुलींनी विवाह केला. त्यांच्या मते भागवत समितीने आईवडील व भाऊ बहिण सख्खे रक्ताचे नाते असल्यासारखे आज सासरी जातेवेळी वाटत आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.