शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात बालकांची काळजी व संरक्षणसाठी कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आढावा घेताना जिल्हाधिकारी कदम ...

जिल्हाधिकारी कार्यालयात बालकांची काळजी व संरक्षणसाठी कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आढावा घेताना जिल्हाधिकारी कदम बोलत होते. या बैठकीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.एस. फारुकी, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले, बालकल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले की, कोरोनामुळे ज्या बालकांचे पालक दगावले आहेत, अशा बालकांना बालसंगोपन योजनेंतर्गत मदत मिळावी म्हणून कृतिदलाची (टास्क फोर्स)ची स्थापना करण्यात आली आहे. अशा बालकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी तालुकानिहाय बालसंगोपन योजनेचे अर्ज भरून घ्यावेत. अर्ज भरण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करावी, तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्या अशा बालकांचा सांभाळ योग्यरीतीने होतो किंवा नाही याबाबत माहिती घेण्यासाठी बालकल्याण समितीने गृहभेट द्यावी. सोबतच आई- वडील दोन्ही गमावलेल्या बालकांच्या पाल्यांचे बँकेत खाते असल्यास त्या खात्याचे बालकांना नॉमिनी करण्यास मदत करावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी जिल्ह्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या एकूण बालकांची संख्या ५२१ आहे. त्यामध्ये आई गमावलेल्या बालकांची संख्या ५०, तर वडील गमावलेल्या बालकांची संख्या ४६५ आहे व दोन्ही (आई- वडील) गमावलेल्या बालकांची संख्या ०६ आहे. याबाबतचे अजूनही कामकाज सुरूच असून, जिल्हा महिला व बालविकास विभागातर्फे आई- वडील गमावलेल्या बालकांची शोधमोहीम सुरू असल्याची माहिती बैठकीत दिली.