शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

राष्ट्रसंतांच्या हस्ते उद्घाटित शाळेचे ‘बेहाल’

By admin | Updated: April 27, 2016 00:22 IST

सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल,...

बालकांचा जीव धोक्यात : व्यथा पिलांद्री येथील जिल्हा परिषद शाळेचीविशाल रणदिवे अड्याळसर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, असे सांगायचे. १९६६ मध्ये त्यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या जिल्हा परिषद शाळेची आजची अवस्था पाहिल्यावर शिकणारे विद्यार्थी आणि शिकविणारे शिक्षक भयभीत वातावरणात आहेत. १० मे १९६६ रोजी गांधी विद्यालयाचे संस्थापक तुकाराम मोटघरे व पिलांद्रीचे तत्कालीन सरपंच सखाराम चव्हाण यांच्या पुढकाराने राष्ट्रसंतांच्या हस्ते पिलांद्री जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे उद्घाटन झाले होते. गाव व परिसरातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी शाळा सुरू करण्यात आली होती. आजघडीला ही इमारत जीर्ण अवस्थेत आहे. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन झाले त्याच इमारतीकडे दुर्लक्ष सुरू आहे. ज्यावेळी उद्घाटन झाले त्यावेळी लावण्यात आलेली टिनाची पाटी भिंतीवर आजही कायम आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमीकमी होत आहे. विद्यार्थी मिळत नाही अशी ओरड असताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार पिलांद्री येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला पाहिल्यावर दिसून येते. येथील ग्रामस्थ व शिक्षकाकडून मागील अनेक वर्षापासून नवीन ईमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. परंतु संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. इमारत जीर्ण असल्यामुळे ती कधीही कोसळू शकते. तरीही त्याच इमारतीत विद्यार्थी जीवाची पर्वा न करता ‘आली या भोगाशी असावे सादर’ या उक्तीप्रमाणे शिक्षण व घेत आहेत. येथील एखाद्या शिक्षकाचा किंवा विद्यार्थ्याचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? परंतु हे कधीपर्यंत सहन करायचे असा ग्रामस्थांचा प्रश्न आहे. संबंधित विभागाने आतातरी जागे होऊन याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत कायम राहावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या शाळेचे महात्मय लक्षात घेण्याची गरज आहे. नाहीतर कालौघात ते विस्मृतीत जाईल.येथील मुख्याध्यापकांच्या चुकीमुळे व सर्वशिक्षा अभियानांतर्गत येणारा निधी न आल्याने येथील काम रखडले होते. तीन महिन्यात या शाळेचे काम करण्यात येईल. - रेखा भुसारी, जि.प. सदस्य.या शाळेतील समस्या फार जून आहे. ही समस्या आजची नाही. वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी व शिक्षण देणारे शिक्षक दोन्हीचा विचार होणे महत्त्वाचे आहे.- भिमटे, मुख्याध्यापिका, पिलांद्री