शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

धानाची विक्री करताना दक्ष राहावे

By admin | Updated: October 29, 2016 00:37 IST

सध्या धानाचे उत्पादन निघणे सुरु झाले आहे. धानाची इतरत्र ठिकाणी विक्री करताना शेतकऱ्यांची लुबाडणूक होणार नाही ..

बाजार समितीचे आवाहन : पत्रक काढून शेतकऱ्यांना केले सावधान अर्जुनी मोरगाव : सध्या धानाचे उत्पादन निघणे सुरु झाले आहे. धानाची इतरत्र ठिकाणी विक्री करताना शेतकऱ्यांची लुबाडणूक होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी धानाची विक्री शासकीय हमी भाव धान खरेदी केंद्र तसेच बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये आणून विक्री करण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती काशिमजमा कुरैशी, उपसभापती लायकराम भेंडारकर, प्रभारी सचिव अशोक काळबांधे यांनी काढलेल्या जाहिर पत्रकाद्वारे केले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने मुख्य बाजार अर्जुनी-मोरगाव, दुय्यम बाजार नवेगावबांध येथे खरीप हंगामातील धानाचे पणन सुरु केले असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या धानाची विक्री राईस मिल, दुकान, व्यापाऱ्यांचे गोदाम, मध्यस्थांकडून करु नये. मार्केट यार्ड शिवाय इतर ठिकाणी शेतमालाचे पणन करणे अवैध असून शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव न मिळता वजनमापाद्वारे साशंकता निर्माण होते. संबंधित व्यापाऱ्याकडून शेतमालाची विक्री रक्कम सुद्धा बिलासह प्राप्त होत नाही असे पत्रकातून शेतकऱ्यांना सजग करण्यात आले आहे. शासनाचे आधारभूत दर साधारण धान १४७० रुपये, ‘अ’ ग्रेड धान १५१० रुपये असून या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने धानाची विक्री होणार नाही याची कास्तकारबांधवांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ च्या खालील नियम १९६७ च्या तरतुदी व उपविधीनुसार बाजार समितीचे नियंत्रणाखाली शेतमालाच्या पणनाचे व्यवहार मार्केट यार्डवर झाल्यास शेतकरी, व्यापारी व अडत्यांना हितावह असून हमाल व शेतमाल वाहतूकदारांना काम मिळून ग्रामीण भागातील संबंधित लोकांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होत असल्याचा आशावाद बाजार समितीच्या जाहिर पत्रकात व्यक्त करण्यात आला आहे. तालुक्यातील शेतमाल खरेदीदार व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या मार्केट यार्डशिवाय इतरत्र कोठेही राईस मिल, दुकान, व्यापारी गोदाम किंवा खळ्यावरुन शेतमालाची खरेदी करु नये असा सुचक इशारा सुद्धा पत्रकातून देण्यात आला आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डवरुन शेतकऱ्यांच्या धानाची विक्री झाल्यास शेतकऱ्यांकडून कोणतीही ‘अडत’ घेतली जाणार नाही असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी) शेतमाल तारण कर्ज योजनाधान एकाचवेळी बाजारामध्ये विक्रीस येत असल्यामुळे भाव कमी मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असल्यास व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याच्या हेतूने सामान्य कास्तकारांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने २०१६-१७ या हंगामासाठी शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपला धान शासनाच्या वखार महामंडळाच्या गोदामात ठेवल्यानंतर गोदाम पावतीप्रमाणे त्या दिवसाचे बाजारभाव विचारात घेऊन शेतमाल बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम ६ टक्के व्याज दराने कर्ज स्वरुपात ६ महिन्याच्या मुदतीकरिता बाजार समिती उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हटले आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.