शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! कोरोना रुग्णांचा आलेख घसरतोय, पण संसर्गाचा धोका कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST

भंडारा : कोरोना संसर्गाच्या उद्रेकाने भयभीत झालेल्या जनतेला मे महिन्यात मोठा दिलासा मिळाला. रुग्णसंख्येसह मृत्यूंचे प्रमाणही कमी होऊ लागले. ...

भंडारा : कोरोना संसर्गाच्या उद्रेकाने भयभीत झालेल्या जनतेला मे महिन्यात मोठा दिलासा मिळाला. रुग्णसंख्येसह मृत्यूंचे प्रमाणही कमी होऊ लागले. कोरोना रुग्णांचा आलेख घसरायला लागताच नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. सकाळी अत्यावश्यक खरेदीच्या निमित्ताने आणि दिवसभर विविध कारणांचा शोध घेत शहरभर भटकंती करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी संसर्गाचा धोका मात्र कायम आहे. भंडारा जिल्ह्याला एप्रिल महिना भयभीत करून गेला. दररोज सरासरी १,२०० कोरोना रुग्ण आढळून येत होते तर २० ते २५ जणांचा मृत्यू होत होता. वाढत्या रुग्णसंख्येने सर्वचजण चिंताग्रस्त झाले होते. शासनाने संचारबंदी घोषित केल्यानंतर अनेकांनी आपल्या घरातच राहणे पसंत केले. शहरी आणि ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येने नागरिक नियमांचे पालन करून लागले होते. परंतु, मे महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्याला दिलासा मिळाला. कोरोना रुग्णांची संख्या ५००च्या आत येऊ लागली. तसेच मृत्यूही एक आकडी संख्येत नोंदविले जाऊ लागले. गत आठ दिवसातील कोरोना रुग्णांच्या संख्येवर नजर टाकल्यास रुग्णसंख्या वेगाने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशास्थितीत नागरिकांची बेफिकिरी पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने बाहेर पडणाऱ्यांची संख्याही गत तीन-चार दिवसात वाढली आहे. भाजीपाला खरेदीच्या नावाखाली भाजी बाजारात मोठी गर्दी होत आहे. बिनकामाचे अनेक तरूण रत्यावरून फिरताना दिसत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी शहरातील नागरिकांना शिस्त लावली. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी प्रसाद दिला. त्यामुळेही गत आठवड्यात रस्त्यावर गर्दी कमी झाली होती. परंतु, आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिक पुन्हा बेफिकीर झाले आहेत.

रुग्णसंख्या कमी होत असली, तरी संसर्गाचा धोका कायमच आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. घरातून बाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझर आवश्यक झाले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही गरजेचे आहे. बाजारातून खरेदी करताना कोणती वस्तू कोणाकडून खरेदी करतो, याची चाचपणी करूनच खरेदी करणे गरजेचे आहे. अन्यथा खरेदीच्या आड कोरोना संसर्ग होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.