शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

सावधान! कोरोना संसर्ग काळात पाणीपुरी खाणे धोक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:35 IST

भंडारा : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता चटपटीत पदार्थ म्हणजे पाणीपुरी. शहर असो की गावखेडे, चौकात पाणीपुरीचा हातठेला लागलेला. ...

भंडारा : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता चटपटीत पदार्थ म्हणजे पाणीपुरी. शहर असो की गावखेडे, चौकात पाणीपुरीचा हातठेला लागलेला. कोरोना संसर्गकाळातही पाणीपुरीच्या ठेल्यांवर खवय्यांची गर्दी दिसते. कोरोना नियमांचे पालन तर सोडा, स्वच्छतेचेही विक्रेत्याला वावडे असते. थेट अर्धा हात मटक्यात घालून ग्राहकाच्या प्लेटमध्ये पाणीपुरी दिली जाते. जिभेचे चोचले पुरविताना अनेक जण स्वत:चा जीव धोक्यात घालतात. पवनी तालुक्यातील भेंडाळा घटनेने पाणीपुरीचे वास्तव पुढे आले असले तरी बुधवारी भंडारा शहरातील अनेक स्टाॅलवर गर्दी कायमच होती.

पाणीपुरी हा शब्द उच्चारला तरी अनेकांच्या जिभेला पाणी सुटते. अनेक जण सहपरिवार पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी शहरातील स्टाॅलवर जातात. भंडारा शहरातच नव्हेतर, तालुका मुख्यालय आणि गावागावांत आता पाणीपुरीचे स्टाॅल लागलेले दिसून येतात. या स्टाॅलवर सायंकाळ झाली की मोठी गर्दी होते. कुणीही स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत विचारणा करताना दिसत नाही. हातात प्लेट घेतली की डोळे मिटून गुपचूप खाणे तेवढे सुरू असते. विक्रेता हातात पुरी घेऊन मटक्यातील पाण्यात थेट बुडवून ग्राहकांच्या प्लेटमध्ये टाकतो. कोणताही विक्रेता हँडग्लोजचा वापर करताना दिसत नाही. त्याच हाताने इतर कामे करताना आलेल्या ग्राहकाला पाणीपुरी दिली जाते. येथे ना सॅनिटायझर असते ना विक्रेता मास्क लावलेला असतो.

पाणीपुरी तयार करण्यासाठी खाद्यपदार्थही निकृष्ट दर्जाचे वापरले जात असल्याची नेहमी ओरड होते. पाणीसुद्धा अशुद्ध आणि लगतच्याच हातपंपाचे किंवा प्लास्टीक ड्रममध्ये साठविलेले असते. स्टाॅलवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तर दिव्य असते. एका स्टीलच्या ड्रममध्ये पाणी आणि त्यावर एक मग ठेवलेला असतो. कुणीही यावे आणि थेट ड्रममध्ये मग बुडवून पाणी प्यावे अशी अवस्था असते. पुरीमध्ये टाकले जाणारे पाणी आंबट-गोड आणि तिखट असते. अनेकदा बेचव आणि झिनझिन्या आणणारे हे पाणी असते. अशा पाणीपुरीमुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात. परंतु कुणीही अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे तक्रार करीत नाही. कोरोना काळ आहे. तो तरी कुठे व्यवसाय करणार? असे माणुसकीचे दर्शन घडवित चूपचाप पाणीपुरी खातात. मात्र, पवनी तालुक्यातील भेंडाळा येथील आठवडी बाजारातील पाणीपुरी खाल्ल्याने झालेला उद्रेक जिल्ह्याने अनुभवला. ७८ जणांना विषबाधा झाली. एका बालिकेचा बळी गेला. मात्र, त्यानंतरही कुणी यापासून धडा घेईल असे दिसत नाही.

अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष

खाद्यपदार्थ विकण्यापूर्वी स्टाॅलची रीतसर नोंदणी अन्न व प्रशासन विभागात करावी लागते. भंडारा शहरात साधारणत: ५० च्या जवळपास पाणीपुरी विक्रेते आहेत. परंतु यापैकी कुणीही अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे नोंदणी केलेली नाही. कुणी तक्रार करीत नाही म्हणून अन्न व औषधी प्रशासन विभागही या स्टाॅलच्या तपासणीसाठी पुढाकार घेत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार बिनबोभाट सुरू आहे. आतातर कोरोना संसर्गाचा काळ आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. अशा स्थितीत पाणीपुरी विक्रेत्यांची तपासणी करून स्वच्छतेबाबत त्यांना निर्देश देणे गरजेचे आहे.