शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

‘बावनथडी’चे कोट्यवधींचे ‘आऊटलेट्स’ उद्ध्वस्त

By admin | Updated: April 1, 2016 01:12 IST

बावनथडी प्रकल्पाचे दगडी आऊटलेट प्रकल्पाच्या पाण्यात वाहून गेले. आऊटलेट उद्ध्वस्त झाल्याचा खूणा तेवढ्या शिल्लक आहेत. सन १९९० मध्ये ह्या आऊटलेटस बांधल्या होत्या.

लोकप्रतिनिधींचे लक्ष जाणार काय? : नवीन बांधकामाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबितमोहन भोयर तुमसरबावनथडी प्रकल्पाचे दगडी आऊटलेट प्रकल्पाच्या पाण्यात वाहून गेले. आऊटलेट उद्ध्वस्त झाल्याचा खूणा तेवढ्या शिल्लक आहेत. सन १९९० मध्ये ह्या आऊटलेटस बांधल्या होत्या. सन २०१२ ते २०१६ पर्यंत खरीप व रब्बी हंगामात केवळ आठ ते दहा वेळा पाणी सोडण्यात आले हे विशेष कोट्यवधीचे सिमेंट आऊटलेटस तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामाला सन १९७६ मध्ये सुरुवात झाली होती. बावनथडी प्रकल्पाचा उजवा मुख्य कालावा असून त्याला समांतर इतर लहान कालवे बांधण्यात आले. या कालव्यांना दगडी लेआऊटलेट सन १९९० च्या सुमारास बांधण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या शेतात या आऊटलेटमधून लहान वितरिकेत कालव्यातून पाणी सोडण्यात येते. तुमसर व मोहाउी तालुक्यात असे दगडी आऊटलेट्स मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आले आहेत. अपवाद वगळता सर्वच आऊटलेटस उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे.तुमसर तालुक्यातील हिंगणा व काटेबाम्हणी शिवारात प्रत्यक्ष भेट दिली असता हा प्रकार आढळला. सन १९९० पूर्वी राज्यात कालव्याचे आऊटलेटस दगडांचे बांधले जात होते. हे विशेष धरणातून पाणी सोडल्याने पाण्याच्या प्रवाहात मोठा जोर असतो हे दगड पाण्याचा प्रवाह सहन केल्रूाची क्षमता नसल्याने या प्रकल्पाचे सर्वच आऊटलेट्स उद्ध्वस्त झाले. दगडी आऊटलेट्स बांधकामाची गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर या बांधकामाला सुमारे २५ वर्षे झाली. त्यामुळे या आऊटलेटसचे आयुष्य संपल्याचे बोलले जाते. प्रथम धरण, कालवे बांधल्यानंतर वितरिका व आऊटलेटची कामे करण्याची गरज होती. परंतु या प्रकल्पात प्रथमत: सिमेंट पूल, आऊटलेटस् सारख्या बांधकामाला सुरुवातीपासूनच प्रथम प्राधान्य देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.शेतकऱ्यांच्या जमिनी घेणे, वितरिकांचे जाळे तयार करणे ही प्राथमिक कार्ये अजूनही पूर्ण झाली नाहीत तर बांधकामांना २० ते २५ वर्षे होत आहेत. अनेक ठिकाणी कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण उखडून वाहून गेले. राज्य शासनाने सन २०१७ मध्ये प्रकल्प पूर्णत्वाची हमी दिली आहे. उद्ध्वस्त झालेल्या आऊटलेट्स पुन्हा सिमेंट क्राँक्रीटच्या तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. हे विशेष.