शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

घर गेले, जमीन गेली... यातना नशिबी आल्या! बावनथडी प्रकल्पग्रस्तांनी मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 13:57 IST

भूमिहीन झालेले शेतकरी रोजगाराच्या शोधात

मोहन भोयर

तुमसर (भंडारा) : बावनथडी प्रकल्पासाठी काळजाचा तुकडा असलेली कसदार जमीन दिली. मोबदल्याच्या नावावर तोंडाला पाने पुसली. वाढलेल्या किमतीने मिळालेल्या मोबदल्यात शेती घेता आली नाही. आता भूमिहीन झाल्याने दुसऱ्या शेतात रोजमजुरी करावी लागते. पुनर्वसित गावात नागरी सुविधांचा अभाव आहे. आता नशिबी यातना आल्या. बावनथडी प्रकल्पामुळे उद्ध्वस्त झालेले प्रकल्पग्रस्त आदिवासी आपली व्यथा सांगत होते, तेव्हा त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

तुमसर तालुक्यातील सुसूरडोह, कमकासूर, सीतेकसा ही गावे बुडीत क्षेत्रात आली. संपूर्ण शेतीही धरणाने गिळंकृत केली. सुसूरडोहचे पुनर्वसन बगळा येथे, कमकासूरचे रामपूर आणि सीतेकसाचे पुनर्वसन खापा येथे करण्यात आले. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त सातपुडा पर्वतरांगांत आहे. प्रकल्पात गावे जाण्यापूर्वी प्रत्येक आदिवासीकडे शेती होती. गावांचे पुनर्वसन झाले. पण, शेतकरी भूमिहिन झाले. शासनाने २९ ते ३० हजार रुपये प्रति एकर जमिनीचा मोबदला दिला. तेवढ्या रुपयांत शेती मिळाली नाही. आता येथील भूमिहीन झालेले शेतकरी रोजगाराच्या शोधात आहेत.

नागरी सुविधा नावापुरत्या

प्रकल्पग्रस्तांना तेरा नागरी सुविधा शासनाने पुरविण्याच्या नियम आहे. २०१३ मध्ये या तिन्ही गावांचे पुनर्वसन झाले. शासनस्तरावर यांना नाममात्र १३ सुविधा देण्यात आल्या. गावातील अंतर्गत रस्ते बांधलेले नाहीत. येथील नागरिक पोटापाण्यासाठी वनवन भटकत आहेत. गाव परिसरात मिळालेले काम ते करीत आहेत. अनेक तरुणांनी कामाच्या शेधात गावाला रामराम ठोकला आहे.

आदिवासी महिलांच्या डोळ्यांत अश्रू

सुसरडोह पुनर्वसन गावातील वयोवृद्ध कांताबाई नेताम व सीताबाई नेताम म्हणाल्या, आम्हाला रेशन दुकानातून २५ किलो तांदूळ, पाच किलो गहू व एक किलोग्रॅम साखर मिळते. त्यावरच आमचे पोट भरावे लागते. आता आम्हाला मजुरी करूनच शेवटची घटका मोजावी लागेल, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

पुनर्वसित गावांना घेतले होते दत्तक

२०१७-१८ मध्ये जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्त गावांना दत्तक घेतले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्राधान्याने समस्या सोडविण्याचे निर्देश दिले होते. नागपूर येथे पुढाकार घेऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यातही या गावातील आदिवासी बांधवांच्या समस्या दूर करण्याचे निर्देश दिले होते. प्रशासन कामाला लागले होते. परंतु ते केवळ कागदोपत्री ठरले. त्यानंतर प्रशासनाचा कोणताही अधिकारी इकडे फिरकला नाही.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पtumsar-acतुमसरbhandara-acभंडारा