शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

घर गेले, जमीन गेली... यातना नशिबी आल्या! बावनथडी प्रकल्पग्रस्तांनी मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 13:57 IST

भूमिहीन झालेले शेतकरी रोजगाराच्या शोधात

मोहन भोयर

तुमसर (भंडारा) : बावनथडी प्रकल्पासाठी काळजाचा तुकडा असलेली कसदार जमीन दिली. मोबदल्याच्या नावावर तोंडाला पाने पुसली. वाढलेल्या किमतीने मिळालेल्या मोबदल्यात शेती घेता आली नाही. आता भूमिहीन झाल्याने दुसऱ्या शेतात रोजमजुरी करावी लागते. पुनर्वसित गावात नागरी सुविधांचा अभाव आहे. आता नशिबी यातना आल्या. बावनथडी प्रकल्पामुळे उद्ध्वस्त झालेले प्रकल्पग्रस्त आदिवासी आपली व्यथा सांगत होते, तेव्हा त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

तुमसर तालुक्यातील सुसूरडोह, कमकासूर, सीतेकसा ही गावे बुडीत क्षेत्रात आली. संपूर्ण शेतीही धरणाने गिळंकृत केली. सुसूरडोहचे पुनर्वसन बगळा येथे, कमकासूरचे रामपूर आणि सीतेकसाचे पुनर्वसन खापा येथे करण्यात आले. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त सातपुडा पर्वतरांगांत आहे. प्रकल्पात गावे जाण्यापूर्वी प्रत्येक आदिवासीकडे शेती होती. गावांचे पुनर्वसन झाले. पण, शेतकरी भूमिहिन झाले. शासनाने २९ ते ३० हजार रुपये प्रति एकर जमिनीचा मोबदला दिला. तेवढ्या रुपयांत शेती मिळाली नाही. आता येथील भूमिहीन झालेले शेतकरी रोजगाराच्या शोधात आहेत.

नागरी सुविधा नावापुरत्या

प्रकल्पग्रस्तांना तेरा नागरी सुविधा शासनाने पुरविण्याच्या नियम आहे. २०१३ मध्ये या तिन्ही गावांचे पुनर्वसन झाले. शासनस्तरावर यांना नाममात्र १३ सुविधा देण्यात आल्या. गावातील अंतर्गत रस्ते बांधलेले नाहीत. येथील नागरिक पोटापाण्यासाठी वनवन भटकत आहेत. गाव परिसरात मिळालेले काम ते करीत आहेत. अनेक तरुणांनी कामाच्या शेधात गावाला रामराम ठोकला आहे.

आदिवासी महिलांच्या डोळ्यांत अश्रू

सुसरडोह पुनर्वसन गावातील वयोवृद्ध कांताबाई नेताम व सीताबाई नेताम म्हणाल्या, आम्हाला रेशन दुकानातून २५ किलो तांदूळ, पाच किलो गहू व एक किलोग्रॅम साखर मिळते. त्यावरच आमचे पोट भरावे लागते. आता आम्हाला मजुरी करूनच शेवटची घटका मोजावी लागेल, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

पुनर्वसित गावांना घेतले होते दत्तक

२०१७-१८ मध्ये जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्त गावांना दत्तक घेतले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्राधान्याने समस्या सोडविण्याचे निर्देश दिले होते. नागपूर येथे पुढाकार घेऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यातही या गावातील आदिवासी बांधवांच्या समस्या दूर करण्याचे निर्देश दिले होते. प्रशासन कामाला लागले होते. परंतु ते केवळ कागदोपत्री ठरले. त्यानंतर प्रशासनाचा कोणताही अधिकारी इकडे फिरकला नाही.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पtumsar-acतुमसरbhandara-acभंडारा