शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

घर गेले, जमीन गेली... यातना नशिबी आल्या! बावनथडी प्रकल्पग्रस्तांनी मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 13:57 IST

भूमिहीन झालेले शेतकरी रोजगाराच्या शोधात

मोहन भोयर

तुमसर (भंडारा) : बावनथडी प्रकल्पासाठी काळजाचा तुकडा असलेली कसदार जमीन दिली. मोबदल्याच्या नावावर तोंडाला पाने पुसली. वाढलेल्या किमतीने मिळालेल्या मोबदल्यात शेती घेता आली नाही. आता भूमिहीन झाल्याने दुसऱ्या शेतात रोजमजुरी करावी लागते. पुनर्वसित गावात नागरी सुविधांचा अभाव आहे. आता नशिबी यातना आल्या. बावनथडी प्रकल्पामुळे उद्ध्वस्त झालेले प्रकल्पग्रस्त आदिवासी आपली व्यथा सांगत होते, तेव्हा त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

तुमसर तालुक्यातील सुसूरडोह, कमकासूर, सीतेकसा ही गावे बुडीत क्षेत्रात आली. संपूर्ण शेतीही धरणाने गिळंकृत केली. सुसूरडोहचे पुनर्वसन बगळा येथे, कमकासूरचे रामपूर आणि सीतेकसाचे पुनर्वसन खापा येथे करण्यात आले. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त सातपुडा पर्वतरांगांत आहे. प्रकल्पात गावे जाण्यापूर्वी प्रत्येक आदिवासीकडे शेती होती. गावांचे पुनर्वसन झाले. पण, शेतकरी भूमिहिन झाले. शासनाने २९ ते ३० हजार रुपये प्रति एकर जमिनीचा मोबदला दिला. तेवढ्या रुपयांत शेती मिळाली नाही. आता येथील भूमिहीन झालेले शेतकरी रोजगाराच्या शोधात आहेत.

नागरी सुविधा नावापुरत्या

प्रकल्पग्रस्तांना तेरा नागरी सुविधा शासनाने पुरविण्याच्या नियम आहे. २०१३ मध्ये या तिन्ही गावांचे पुनर्वसन झाले. शासनस्तरावर यांना नाममात्र १३ सुविधा देण्यात आल्या. गावातील अंतर्गत रस्ते बांधलेले नाहीत. येथील नागरिक पोटापाण्यासाठी वनवन भटकत आहेत. गाव परिसरात मिळालेले काम ते करीत आहेत. अनेक तरुणांनी कामाच्या शेधात गावाला रामराम ठोकला आहे.

आदिवासी महिलांच्या डोळ्यांत अश्रू

सुसरडोह पुनर्वसन गावातील वयोवृद्ध कांताबाई नेताम व सीताबाई नेताम म्हणाल्या, आम्हाला रेशन दुकानातून २५ किलो तांदूळ, पाच किलो गहू व एक किलोग्रॅम साखर मिळते. त्यावरच आमचे पोट भरावे लागते. आता आम्हाला मजुरी करूनच शेवटची घटका मोजावी लागेल, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

पुनर्वसित गावांना घेतले होते दत्तक

२०१७-१८ मध्ये जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्त गावांना दत्तक घेतले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्राधान्याने समस्या सोडविण्याचे निर्देश दिले होते. नागपूर येथे पुढाकार घेऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यातही या गावातील आदिवासी बांधवांच्या समस्या दूर करण्याचे निर्देश दिले होते. प्रशासन कामाला लागले होते. परंतु ते केवळ कागदोपत्री ठरले. त्यानंतर प्रशासनाचा कोणताही अधिकारी इकडे फिरकला नाही.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पtumsar-acतुमसरbhandara-acभंडारा