शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

भरपावसाळ्यात बावनथडी कोरडीच

By admin | Updated: August 4, 2014 23:34 IST

जीवनदायीनी बावनथडी नदी भर पावसाळ्यात एका पावसानंतर कोरडी पडली आहे. नदीवर धरण तयार झाल्याने ती कोरडी पडली काय, असा प्रश्न उपस्थित होतो. पुन्हा बारा महिने ती कोरडी

भविष्यात समस्या उद्भवणार : तरीही रेतीचा सर्रास उपसा सुरूचतुमसर: जीवनदायीनी बावनथडी नदी भर पावसाळ्यात एका पावसानंतर कोरडी पडली आहे. नदीवर धरण तयार झाल्याने ती कोरडी पडली काय, असा प्रश्न उपस्थित होतो. पुन्हा बारा महिने ती कोरडी राहिली तर पर्यावरण व मानवासह जनावरांवर त्याचा परिणाम होणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘गंगा को बचाना है’, या निर्धारासोबत वैनगंगेलाही केंद्र शासनाने वाचविण्याची गरज आहे.मध्यप्रदेशातून उगम पावलेली बावनथडी नदी महाराष्ट्रातील बपेराजवळ वैनगंगेत तिचा संगम होतो. या नदीवर महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाचा बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प तयार केला. सन २०१३ मध्ये या प्रकल्पात जलसाठा करण्यात आला. वैनगंगेची बावनथडी नदी आहे.सध्या बावनथडी प्रकल्पात ४२ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पातून भंडारा जिल्ह्यातील १७,५३७ हेक्टर तर बालाघाट जिल्ह्यामध्ये १८,६१५ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होत आहे. नाकाडोंगरी या गावाजवळून वाहत जाणारी बावनथडी नदी सध्या कोरडी पडली आहे. या स्थळावरून प्रकल्प १५ कि़मी. अंतरावर आहे. बावनथडी नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. नदीपलीकडे मध्यप्रदेशाची सीमा सुरू होते. पावसाळ्यात ही नदी भरून वाहते. परंतु दोनच दिवसात ती कोरडी पडत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. आता नदीवर धरण झाल्याने नदीला पाणीच नसल्याचे तेच नागरीक सांगत आहेत.मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून पाणी सोडल्यावर नदीला मोठा पूर येतो, धरणामुळे आता ती शक्यताही कमीच आहे. पाण्याचा प्रवाह नसल्यामुळे याचा परिणाम पर्यावरण, मानवी जीवन तथा जनावरांवर होईल, तर नाही ना? असा चिंतेचा आणि चिंतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याकरिता पाणी, शेती व नंतर उद्योगधंद्यांना पाणी देण्याचा कायदा आहे. येथे तर पिण्याकरिताच पाणी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. पुढे १५ कि़मी. वैनगंगेवर वाहनी मांडवी येथे पुन्हा ४५० कोटीचा बंधारा तयार करण्यात आला आहे. सिंचनासोबतच वीज प्रकल्पाला पाणी देण्यात येत आहे. बावनथडी नदीतून रेतीचा प्रचंड उपसा करणे व बाराही महिने सुरूच आहे. मध्यप्रदेश शासनाने रेतीघाट लिलाव केला आहे. नदीत सीमा निश्चित नसल्याने महाराष्ट्राच्या हद्दीतून राजरोसपणे रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. येथे नदीत मोठमोठे खड्डे पडले आहेत. केंद्र शासनाने गंगा को बचाना है अशी मोहिम हाती घेतली असून हजारो कोटी रूपये त्यावर खर्च करणार आहे, वैनगंगा तथा बावनथडी नदीच्या दुर्दशेला कोण वाचविणार की नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)