शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

बासमती धान उत्पादक संकटात

By admin | Updated: June 18, 2014 23:56 IST

शासनाच्या उदासीन धोरणामुळे व आधारभूत धान खरेदी केंद्रावरील दलालांच्या बेजबाबदार धोरणामुळे मासळ परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे.

मासळ : शासनाच्या उदासीन धोरणामुळे व आधारभूत धान खरेदी केंद्रावरील दलालांच्या बेजबाबदार धोरणामुळे मासळ परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे. चालू उन्हाळी हंगामात मासळ, खैरी, धरतोडा, ढोलसर, बाचेवाडी, परिसरात भरघोस बासमती धानाचे उत्पादन झाले. परंतु शासनाकडून हा बासमती धान केंद्रावर खरेदी करण्याच्या काहीच उपाययोजना नाहीत. त्यामुळे शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत सापडला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडील धान उचल न झाल्यामुळे तसाच पडून आहे. काही काही शेतकऱ्यांकडील धान अत्यल्प भावाने व्यापारी खरेदी करीत आहेत. तर काहींचा बासमती धानाला कोणी विचारत नाही. शेतकरी आर्थिक टंचाईतून बाहेर पडावा व त्याची स्थिती सुधारावी या हेतूने शेतकऱ्यांनी बासमती धानाचे उत्पादन घेतले. परंतु योग्य भाव व बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना मागेल त्या किंमतीत धानाची विक्री करावी लागत आहे. बहुतांशी तर शेतकऱ्यांच्या बासमती धानाला कोणी विचारतच नाही. तेव्हा धान विक्रीसाठी न्यायचा कुठे? हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. अशावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी बासमती धान खरेदी करीता काहीतरी पाउले उचलावी अशी दिपक घुगुसकर, राजगोपाल भुरे, रवि गौरकर, किशोर चेटुले आदी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)