शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

सिंचनासाठी सामूहिक शेततळ्यांचा आधार

By admin | Updated: September 26, 2015 00:30 IST

पाण्याचे मोठ्या प्रमाणात स्त्रोत असतानाही सिंचन क्षमता नाममात्र असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी...

इंद्रपाल कटकवार भंडारापाण्याचे मोठ्या प्रमाणात स्त्रोत असतानाही सिंचन क्षमता नाममात्र असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता सामूहिक शेततळी योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून १६ .६५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून टंचाईच्या काळात बांधण्यात येणाऱ्या शेततळ्यातून पिकांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा मानस असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सामूहिक शेततळे योजना भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द धरण, बावनथडी प्रकल्प, सोंड्याटोला उपसा सिंचन योजना, नेरला उपसा सिंचन योजना, करचखेडा उपसा सिंचन योजना यासारखे अनेक लहानमोठे प्रकल्प आहेत. मात्र बहुतांश प्रकल्प आजही कार्यान्वित झालेले नाही. पावसाच्या पाण्यावर शेती करणाऱ्या बळीराजाला योजनेच्या माध्यमातून सिंचनाचे बळ मिळावे, जेणेकरून उत्पन्नात वाढ होऊ शकेल. विशेष म्हणजे पूर्वी तयार केलेले शेततळे, नैसर्गिक खड्डा, दगड खाणी, विहिर आदी जागी सामूहिक शेततळे मंजूर करण्यात येणार नाही. या शेततळ्यातील पाणी वापरण्यासाठी अधिक कार्यक्षमता असलेल्या सिंचन पद्धतीचा (विशेष करून ठिंबक व तुषार) वापर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांना मिळणार लाभनवीन सामूहिक शेततळ्याच्या लाभ अनुसुचित जातीच्या शेतकऱ्यांना १६ टक्के, अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना ८ टक्के, अपंग प्रवर्गासाठी ३ टक्के व सर्वसाधारण प्रवर्ग ७३ टक्के असा देण्यात येणार आहे. प्रत्येक प्रवर्गातंर्गत महिलांना समांतर ३० टक्के या प्रमाणात लाभ देणे बंधनकारक आहे. या योजनेत समुहात दोन किंवा तीन लाभार्थ्यांचा समावेश राहणार आहे. तसेच एकाच कुंटुंबातील किंवा संयुक्त कुंटुंबातील एकापेक्षा जास्त शेततकऱ्याला यात सहभागी होता येणार नाही. या शेततळ्याचे (तलावाचे) एकूण तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहेत.