शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

सर्वांगीण विकासासाठी बाबासाहेबांचे विचार अंगिकारा

By admin | Updated: April 16, 2017 00:17 IST

देशाच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान तयार केले ....

राजेश काशीवार यांचे प्रतिपादन : शिवनी (मोगरा) येथे डिजीधन मेळावाभंडारा : देशाच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान तयार केले त्यामुळेच आज देशाचा व देशातील सामान्य नागरिक, दलित, पीडित व शोषित वर्गाचा विकास शक्य झाला. विकसित भारताची संकल्पना साध्य करण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत विकास गरजेचा असून शासनाच्या प्रत्येक योजनांची अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश काशीवार यांनी केले.लाखनी तालुक्यातील शिवनी (मोगरा) येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय डिजीधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मिश्रा, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय बागडे, स्टेट बँकेचे जिल्हा शाखा व्यवस्थापक कुळकर्णी, खंडविकास अधिकारी साकोली ब्राम्हणकर,शिवणी (मोगरा) च्या सरपंच माया कुथे, पंचायत समिती सदस्य दादू खोब्रागडे, पद्माकर बावणकर, मुख्याध्यापक महेंद्र राऊत, बोरकर, भीमराव खांडेकर उपस्थित होते.आमदार काशीवार पुढे म्हणाले की, जीवन सुखमय बनविण्यासाठी कॅशलेस व्यवहार आवश्यक असून यामुळे भ्रष्टाचारावर आळा बसेल व आर्थिक विकास साध्य करण्यात मदत होईल. शिवणी ग्रामवासीयांनी कॅशलेस व्यवहार सुरु करून संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून यासाठी शिवणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर झाल्याचे त्यांनी सांगितले.शासकीय योजनेनुसार प्रत्येक राशनकार्ड हे आधारकार्डशी लिंक करून चौकशी केल्यावर ४२ टक्के राशनकार्ड बोगस ठरले व त्यामुळे शासनची ७०० कोटी रुपयांची बचत झाल्याचे सांगून प्रत्येकाने डॉ.बाबासाहेब आंबेडरांचे आदर्श समोर ठेवून त्यांचे विचार अंगीकृत करावे, असे आमदार काशिवार म्हणाले.यावेळी सुधाकर आडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराने आम्हाला घडविले म्हणून आम्ही उत्तम जीवन जगत आहोत. कॅशलेस योजनेमुळे शिवणीवासीयांना सुविधा उपलब्ध झाली असून पीओएस मशीनची माहिती सर्वांना झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कुळकर्णी व इतर अधिकाऱ्यांनी पीओएस मशीनची माहिती देवून त्यांचे महत्व व उपयोगीतेवर प्रकाश टाकला. शिवणीवासी व परिसरातील १०८ लाभार्थ्यांना पीओएस मशिनचे वाटप करण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत सरपंच, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, राशन दुकानदारांचा समावेश आहे. कॅशलेस व्यवहार करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन दादू खोब्रागडे यांनी केले तर आभार ग्राम विकास्तार अधिकारी गडपायले यांनी मानले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य बचत गटांचे कार्यकर्ते, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, ग्रामवासी, महिला, पुरुष तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)