शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

शेती आरोग्यासाठी रासायनिक खताचा अतिवापर टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST

करडी (पालोरा) : शेतकऱ्यांनी वेळेवर खतव्यवस्थापन केल्यास उत्पादनात भरीव वाढ होते. त्याचबरोबर पिकांची निरीक्षणे योग्य पद्धतीने घेतल्यास रोगव्यवस्थापनावरील ...

करडी (पालोरा) : शेतकऱ्यांनी वेळेवर खतव्यवस्थापन केल्यास उत्पादनात भरीव वाढ होते. त्याचबरोबर पिकांची निरीक्षणे योग्य पद्धतीने घेतल्यास रोगव्यवस्थापनावरील खर्च कमी करता येतो. शिवाय रासायनिक खतांचा वापर कमी करून त्याऐवजी हिरवळीचे खत, सेंद्रिय खत, कंपोस्ट खत, युरिया ब्रिकेटस्‌चा वापर करून रासायनिक खतावरील खर्च कमी करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी केले आहे.

मोहाडी तालुका कृषी विभागात महाराष्ट्र कृषिदिनी आलेल्या शेतकऱ्यांना जमिनीची मशागत, खताचे व्यवस्थापन, कीड, रोग नियंत्रण व धानाच्या नर्सरीची माहिती देताना ते बोलत होते. यापूर्वी कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत त्यांनी मुंढरी खुर्द येथील धान नर्सरीची पाहणी केली.

सध्याच्या कृषी पद्धतीत रासायनिक खताच्या अनिर्बंध वापरामुळे व अन्य कारणांमुळे या शेतीचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. शेतीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारित खताचा संतुलित, तसेच परिणामकारक वापरास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषी संजीवनी मोहिमेचा उद्देश रासायनिक खताचा अनिर्बंध वापर कमी करून मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्याच्या कमतरतेनुसार खताच्या संतुलित व कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देणे असा आहे.

मृद आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जैविक खते, गांडूळखते, युरिया ब्रिकेटस्‌ खताच्या वापरास प्रोत्साहन देणे. जमीन आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्याची पातळी, सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता स्थिती व त्यानुसार पिकांना द्यावयाच्या खतमात्रेची माहिती मिळते. पत्रिकेत जमिनीचा पोत, कमी झालेले घटक, योग्य खताचा वापर आणि पिकाची माहिती आहे. या पत्रिकेनुसार शेतकऱ्याने पीक घेणे अपेक्षित आहे. जमिनीच्या सुपीकता निर्देशांकानुसार आपल्याला संतुलित खताचा वापर करणे शक्य होते.

जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच मूलद्रव्याची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खते, गांडूळ खते, हिरवळीच्या खताचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मोहाडी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी केले आहे.