शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
3
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
4
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
5
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
6
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
7
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
8
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
9
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
10
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
11
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
12
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
13
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
14
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
15
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
16
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
18
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
19
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
20
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध

१९ तासानंतर झाले शवविच्छेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST

कोंढा (कोसरा) : ग्रामीण रुग्णालय पवनी येथे १९ तासानंतर केले जाते शवविच्छेदन, यावर आपला विश्वास बसणार नाही, परंतु हे ...

कोंढा (कोसरा) : ग्रामीण रुग्णालय पवनी येथे १९ तासानंतर केले जाते शवविच्छेदन, यावर आपला विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे. २९ मार्च रोजी निमगाव येथील पवन बागडे यांचा अपघात सायंकाळी ५ वाजता झाला. तसेच अकोला जिल्ह्यातील झिल्हा या गावचे समीर बळवंत साताडे यांचे २९ मार्चला रात्री ८ वाजता अपघातात निधन झाले. पवन बागडे यांचा मृतदेह ५ वाजता शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला. समीर साताडे यांचा मृतदेह रात्री ८ वाजता ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणण्यात आला.

या दोन्ही अपघात झालेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन तब्बल १९ तासानंतर करण्यात आले. रात्रभर हे मृतदेह दवाखान्यामध्ये पडून होते. सकाळी डॉक्टरची ड्युटी नियमाप्रमाणे ९ वाजताच्या आत असते. डॉक्टरांनी या कालावधीमध्ये रुग्णालयात हजर राहणे गरजेचे असते. परंतु याठिकाणी कार्यरत असणारे व ज्याच्याकडे जबाबदारी आहे असे डॉक्टर दिघोरे हे ११.३० वाजता ग्रामीण रुग्णालय येथे हजर झाले. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी यासंबंधाची कल्पना त्यांना दिल्यानंतरदेखील त्यांनी शवविच्छेदनाकडे दुर्लक्ष केले. ओपीडीमध्ये रुग्णांना तपासाचे काम सुरू केले. यासंदर्भामध्ये विचारणा करण्याकरिता मृतांचे नातेवाईक व मित्र परिवार यांनी डॉक्टर दिघोरे यांच्याकडे विचारणा केली. ‘मी कोविड पेशंट व टायफाईडचे पेशंट तपासत आहे, त्यानंतर मी पोस्टमार्टेम करेन’ असे उत्तर डॉक्टर दिघोरे यांनी दिले.

ग्रामीण रुग्णालयामध्ये शीतकपाट नाही तसेच बर्फाचीदेखील व्यवस्था नाही. हे दोन्ही मृतदेह उघड्यावर त्या ठिकाणी होते. १९ तासानंतर त्यांच्या शरीराची दुर्गंधी येऊ लागली. परंतु डॉक्टर दिघोरे यांना त्याची काहीच चिंता नव्हती. येथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी ११ नंतरच येतात. डॉक्टर दिघोरे यांनी १२.१५ वाजता शवविच्छेदन सुरू केले. १२.३० वाजता मृतांच्या नातेवाईकाकडे त्यांचे मृतदेह सुपूर्द केले. १९ तास वाट पाहिल्यानंतर शवविच्छेदन केले जाते, ही खेदाची बाब आहे. साधारणतः अकोला येथे जायला पाच ते सहा तास लागतात. अशावेळी त्या लोकांनी अंत्यसंस्कार कसे करावेत, एकीकडे दुर्गंधीही येत होती. कोणतेही कारण सांगून टाळाटाळ करणाऱ्यावर कुणाचेही निर्बंध नाही. सदर प्रकरणाची चौकशी व्हावी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व आरोग्यमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेणे गरजेचे आहे.