शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

१९ तासानंतर झाले शवविच्छेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST

कोंढा (कोसरा) : ग्रामीण रुग्णालय पवनी येथे १९ तासानंतर केले जाते शवविच्छेदन, यावर आपला विश्वास बसणार नाही, परंतु हे ...

कोंढा (कोसरा) : ग्रामीण रुग्णालय पवनी येथे १९ तासानंतर केले जाते शवविच्छेदन, यावर आपला विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे. २९ मार्च रोजी निमगाव येथील पवन बागडे यांचा अपघात सायंकाळी ५ वाजता झाला. तसेच अकोला जिल्ह्यातील झिल्हा या गावचे समीर बळवंत साताडे यांचे २९ मार्चला रात्री ८ वाजता अपघातात निधन झाले. पवन बागडे यांचा मृतदेह ५ वाजता शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला. समीर साताडे यांचा मृतदेह रात्री ८ वाजता ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणण्यात आला.

या दोन्ही अपघात झालेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन तब्बल १९ तासानंतर करण्यात आले. रात्रभर हे मृतदेह दवाखान्यामध्ये पडून होते. सकाळी डॉक्टरची ड्युटी नियमाप्रमाणे ९ वाजताच्या आत असते. डॉक्टरांनी या कालावधीमध्ये रुग्णालयात हजर राहणे गरजेचे असते. परंतु याठिकाणी कार्यरत असणारे व ज्याच्याकडे जबाबदारी आहे असे डॉक्टर दिघोरे हे ११.३० वाजता ग्रामीण रुग्णालय येथे हजर झाले. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी यासंबंधाची कल्पना त्यांना दिल्यानंतरदेखील त्यांनी शवविच्छेदनाकडे दुर्लक्ष केले. ओपीडीमध्ये रुग्णांना तपासाचे काम सुरू केले. यासंदर्भामध्ये विचारणा करण्याकरिता मृतांचे नातेवाईक व मित्र परिवार यांनी डॉक्टर दिघोरे यांच्याकडे विचारणा केली. ‘मी कोविड पेशंट व टायफाईडचे पेशंट तपासत आहे, त्यानंतर मी पोस्टमार्टेम करेन’ असे उत्तर डॉक्टर दिघोरे यांनी दिले.

ग्रामीण रुग्णालयामध्ये शीतकपाट नाही तसेच बर्फाचीदेखील व्यवस्था नाही. हे दोन्ही मृतदेह उघड्यावर त्या ठिकाणी होते. १९ तासानंतर त्यांच्या शरीराची दुर्गंधी येऊ लागली. परंतु डॉक्टर दिघोरे यांना त्याची काहीच चिंता नव्हती. येथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी ११ नंतरच येतात. डॉक्टर दिघोरे यांनी १२.१५ वाजता शवविच्छेदन सुरू केले. १२.३० वाजता मृतांच्या नातेवाईकाकडे त्यांचे मृतदेह सुपूर्द केले. १९ तास वाट पाहिल्यानंतर शवविच्छेदन केले जाते, ही खेदाची बाब आहे. साधारणतः अकोला येथे जायला पाच ते सहा तास लागतात. अशावेळी त्या लोकांनी अंत्यसंस्कार कसे करावेत, एकीकडे दुर्गंधीही येत होती. कोणतेही कारण सांगून टाळाटाळ करणाऱ्यावर कुणाचेही निर्बंध नाही. सदर प्रकरणाची चौकशी व्हावी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व आरोग्यमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेणे गरजेचे आहे.