शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
3
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
4
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
5
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
6
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
7
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
8
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
9
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
10
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
11
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
12
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
13
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
14
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
15
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
17
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
18
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
19
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
20
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप

पाण्यासाठी नगर पंचायतवर हल्लाबोल

By admin | Updated: July 29, 2016 00:38 IST

मोहाडी येथील नळाला येत असलेल्या गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे....

मोहाडीत दूषित पाण्याचा पुरवठा : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पुढाकार मोहाडी : मोहाडी येथील नळाला येत असलेल्या गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंबधी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मोहाडीतर्फे नगरपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आला. यावेळी उपस्थित नगराध्यक्ष स्वाती निमजे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मात्र यावेळी एकही अधिकारी उपस्थित नव्हते. सध्या मोहाडीतील नळांना पिवळा गढूळ व दूषित पाणी येत असल्याने लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळाला येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक नागरिकांना हातपंपाचे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच शहरात सार्वजनिक खुल्या जागेत तसेच रस्त्याच्या कडेला हिरवेगार गवत वापरलेले आहे. या गवतामुळे डासांचा त्रास वाढलेला असून सरपटणारे प्राणी, साप वैगेरे गवतात लपून असतात. ज्यामुळे प्राणहानी होण्याची शक्यता असल्याने या गवतावर तननाशकाची फवारणी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याणीताई भुरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर अध्यक्ष सोमल गजभिये, राकाँ महिला शहर अध्यक्ष मनिषा गायधने, रामदास पराते, किशोर पातरे, रूबीना शेख, ज्योती माहालगावे, नुरजंहा शेख, कौशल्याबाई निखारे, जयश्री गायधने, मंजुषा भानारकर, वनीता पारधी, कविता गजभिये, बाळु तरारे, प्रमोद भानारकर, देवकाबाई पारधी, महेश पारधी, कपील पारधी, थगबागडे, आकाश डेकाटे, विपुल भानारकर, असलम पठाण, इमरान पठाण, संदेश लोणारे, धनराज तरारे, जितु सोनवाने, महेंद्र पारधी, कदीर शेख, मोहित पारधी, शंकर भुते, शैलेश मेंढे, मिनाझ शेख, दानीश शेख, लकी शेख, आफताब कुरेशी, पंकज निमजे, वैभव डोंगरे, प्रणय सोनकुसरे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नगरपंचायत मोहाडी येथे लेखापाल चौधरी व अभियंता नागदेवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र हे दोन्ही अधिकारी आठवड्यातून फक्त दोनच दिवस मोहाडी येथे येतात व फक्त एक दोन तास थांबून निघुन जातात. त्यामुळे नागरिकांना आठ दहा दिवसांची वाट बघावी लागते. नगरसेवकांना सुद्धा त्यांची वाट पाहात थांबावे लागते. या अधिकाऱ्यांनी ठरलेल्या दिवशी संपूर्ण दिवसभर येथे उपस्थित राहावे, अशी मागणी आहे. पाण्यासारख्या ज्वलंत मुद्यावर नगरपंचायत प्रशासन गंभीर नाही, अशी चर्चाही शहरात सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)