शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नगर पंचायतवर हल्लाबोल

By admin | Updated: July 29, 2016 00:38 IST

मोहाडी येथील नळाला येत असलेल्या गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे....

मोहाडीत दूषित पाण्याचा पुरवठा : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पुढाकार मोहाडी : मोहाडी येथील नळाला येत असलेल्या गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंबधी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मोहाडीतर्फे नगरपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आला. यावेळी उपस्थित नगराध्यक्ष स्वाती निमजे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मात्र यावेळी एकही अधिकारी उपस्थित नव्हते. सध्या मोहाडीतील नळांना पिवळा गढूळ व दूषित पाणी येत असल्याने लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळाला येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक नागरिकांना हातपंपाचे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच शहरात सार्वजनिक खुल्या जागेत तसेच रस्त्याच्या कडेला हिरवेगार गवत वापरलेले आहे. या गवतामुळे डासांचा त्रास वाढलेला असून सरपटणारे प्राणी, साप वैगेरे गवतात लपून असतात. ज्यामुळे प्राणहानी होण्याची शक्यता असल्याने या गवतावर तननाशकाची फवारणी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याणीताई भुरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर अध्यक्ष सोमल गजभिये, राकाँ महिला शहर अध्यक्ष मनिषा गायधने, रामदास पराते, किशोर पातरे, रूबीना शेख, ज्योती माहालगावे, नुरजंहा शेख, कौशल्याबाई निखारे, जयश्री गायधने, मंजुषा भानारकर, वनीता पारधी, कविता गजभिये, बाळु तरारे, प्रमोद भानारकर, देवकाबाई पारधी, महेश पारधी, कपील पारधी, थगबागडे, आकाश डेकाटे, विपुल भानारकर, असलम पठाण, इमरान पठाण, संदेश लोणारे, धनराज तरारे, जितु सोनवाने, महेंद्र पारधी, कदीर शेख, मोहित पारधी, शंकर भुते, शैलेश मेंढे, मिनाझ शेख, दानीश शेख, लकी शेख, आफताब कुरेशी, पंकज निमजे, वैभव डोंगरे, प्रणय सोनकुसरे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नगरपंचायत मोहाडी येथे लेखापाल चौधरी व अभियंता नागदेवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र हे दोन्ही अधिकारी आठवड्यातून फक्त दोनच दिवस मोहाडी येथे येतात व फक्त एक दोन तास थांबून निघुन जातात. त्यामुळे नागरिकांना आठ दहा दिवसांची वाट बघावी लागते. नगरसेवकांना सुद्धा त्यांची वाट पाहात थांबावे लागते. या अधिकाऱ्यांनी ठरलेल्या दिवशी संपूर्ण दिवसभर येथे उपस्थित राहावे, अशी मागणी आहे. पाण्यासारख्या ज्वलंत मुद्यावर नगरपंचायत प्रशासन गंभीर नाही, अशी चर्चाही शहरात सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)