शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

सहायक वनसंरक्षकांचा शेतकऱ्यांच्या खसऱ्याला ठेंगा

By admin | Updated: August 4, 2016 00:35 IST

शेतकऱ्याचे खसरे प्रकरणाला नाकारून कंत्राटदारांच्या खसरे प्रकरणाला क्लीन चिट देणारे साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक हे शेतकऱ्यासाठी कर्दनकाळ ठरले आहेत.

कंत्राटदाराच्या खसऱ्याला मिळते ‘क्लीन चिट’ : लाखांदूरातील शेतकऱ्यांची वनमंत्र्यांकडे तक्रारलाखांदूर : शेतकऱ्याचे खसरे प्रकरणाला नाकारून कंत्राटदारांच्या खसरे प्रकरणाला क्लीन चिट देणारे साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक हे शेतकऱ्यासाठी कर्दनकाळ ठरले आहेत. नाहक शेतकऱ्यांना त्रास देऊन कंत्राटदारांच्या मर्जीने काम करीत आहेत, असा आरोप करीत शेतकऱ्यांनी राज्याचे वन तथा वित्तमंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. गत पाच महिन्यांपासून लाखांदूर वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयातील तीन वन परिक्षेत्राधिकाऱ्यांची बदली झाली. याच कालावधीत सहायक वनसंरक्षक साकोली हे मात्र कायम असल्याने खसरे प्रकरणात सावळागोंधळ करण्यासाठी त्यांना चांगलेच जमले. लाखांदूर वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयात नोव्हेबर २०१५ पासून शेतकरी व कंत्राटदाराचे खसरे प्रकरण अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे रखडले. परंतु यात कंत्राटदारांचे प्रकरण पटकन पास करून शेतकऱ्यांचे प्रकरण एक ना अनेक त्रृट्या पुढे करून साकोली कार्यालयात रेंगाळत ठेवण्यात आले. खसरे प्रकरणाच्या फाईली लाखांदूर ते साकोलीत अजूनही फिरत आहेत. तोडलेली लाकडे शेतात पडून आहेत काही शेतकऱ्यांनी तोडलेली लाकडे पावसाच्या व चोरीच्या भीतीने सुरक्षित स्थळी आणून ठेवली. आज ना उद्या साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक हे पासिंग करून देतील म्हणून काही शेतकऱ्यांनी आपली शेती पडीक ठेवून खरिपाची पीक न घेता आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.शेतकऱ्यानी स्वत: केलेल्या खसऱ्याचे प्रकरण पुन्हा पाच ते सहा महिने फाईल बंद ठेवा. कंत्राटदारांचे प्रकरण तात्काळ निकाली काढण्याचे फर्मान साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षकानी काढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मागील ७ ते ८ माहिन्यांपासूनचे खसरे प्रकरणाची तपासणी केली असता एकही शेतकऱ्याचे स्वत: केलेले प्रकरण निकाली निघाल्याचे दिसून येत नाही. मात्र कंत्राटदारांचे संपूर्ण प्रकरण कमिशनपोटी तात्काळ निकाली निघाल्याचे तपासात दिसून येते. यापुर्वी पास केलेले खसरे प्रकरणाची झाडाच्या बुंध्यासकट मोजणी केली असता अवैध वृक्ष कटाईचे मोठे घबाड उघडकीस यायला वेळ लागणार नाही. जंगलातील चोरीचे लाकडे कंत्राटदारांनी मिसळवून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मूक संमती दिल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. मात्र प्रामाणिकपणे नियमाचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना वनविभागाकडून ठेंगा दाखवला जात आहे.साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक यांनी वारंवार होणाऱ्या वन परिक्षेत्राधिकारी यांच्या बदल्यांचा फायदा घेत नियमबाह्यरित्या जुन्या तारखेत अनेक प्रकरण निकाली काढल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरून कंत्राटदारांना पाठबळ देणाऱ्या साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक यांच्या संपूर्ण कामकाजाची चौकशी व शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी राज्याचे वन तथा वित्तमंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्यांकडे लेखी तक्रारीतून शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)