शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

अस्मानी संकट : शेतकरी चिंतातूर

By admin | Updated: March 18, 2015 00:42 IST

जवळपास मार्च महिन्यापासून उन्हाळ्याला सुरूवात होते, परंतु सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे ही उन्हाळ्याची सुरूवात आहे की, पावसाळ्याची सुरूवात आहे, असा प्रश्न पडत आहे.

दाभा : जवळपास मार्च महिन्यापासून उन्हाळ्याला सुरूवात होते, परंतु सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे ही उन्हाळ्याची सुरूवात आहे की, पावसाळ्याची सुरूवात आहे, असा प्रश्न पडत आहे. अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाचे जनजीवन बिकट झाले आहे. वर्षभर रात्रंदिवस मेहनत करून, एकवेळ उपासी राहून काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचे घासच जणू निसर्ग हिसकावून घेत आहे. जिल्ह्यात गहू, चना, लाखोरी, मिरची, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्ग पोटावर मारतो व राजकीय पुढारी पाठीवर मारतात असे दृश्य आहे.बालपणी वर्गात गुरूजी ‘निसर्ग कोपला तर’ या विषयांवर निबंध लिहून घ्यायचे. ते फक्त शाळा व पेपर पुरली मर्यादित होते. मात्र त्याची प्रत्यक्ष चाहूल सध्या अनुभवायला मिळत आहे. जवळपास आठ ते दहा दिवसापासून निसर्गाची प्रकृती बिघडली असून त्याचा प्राकृतिक परिणाम जनतेवर होत आहे. (वार्ताहर)आरोग्यावर परिणाम वातावरणातील बदलामुळे विषाणुजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. सर्दी, पडसे, ताप, पाठदुखी आदी रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी रुग्णालयात गर्दी वाढत आहे. सध्या राज्यात आधीच स्वाईन फ्लू या आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या वातावरणाचा मानवी जीवनावर मोठा बिकट परिणाम होत आहे.भाजीपाला महागलानिसर्गाच्या अवकृपेमुळे हाती आलेला भाजीपाला वाया जात आहे. सध्या ग्रामीण भागात मिरची, भेंडीचा तोडा मोठ्या प्रमाणात सुरू असून असेच पाऊस पडत राहिले तर मिरची व भेंडी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशी चिंता शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे. ऐन तोडणीच्या वेळी पावसाने भाजीपाला खराब झाल्याने व बाजारामध्ये भाजीपाला पुरवठा कमी झाल्याने परिणामी भाज्यांचे भाव कडाडले आहेत. दिवसा उन्हाळा सायंकाळी पावसाळा असा चित्र सध्या सुरू असून जणू निसर्गाचा लपंडावच सुरू आहे.मदतीची अपेक्षानिसर्गाच्या अवकाळी पावसामुळे कृषि विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन तोडणीवर आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर दिवसेंदिवस वाढल्याने शेतकरी आत्महत्येचे चित्र सध्या विदर्भात दिसत आहे. सध्या राज्यात व केंद्रात सत्ताधारी एकाच पक्षाचे असल्याने त्यांनी मोठ्या मनाने शेतकऱ्यांचे दु:ख वाटून घेणे गरजेचे आहे. तेव्हाच अच्छे दिन आयेंगे या त्यांच्या ब्रीदवाक्याची सत्यता जनतेला कळून येईल.