शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

शहरात कृत्रिम पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: May 5, 2017 00:34 IST

पाण्याचा मुबलक साठा असूनही शुद्ध पाण्यासाठी तरसणाऱ्या भंडारेकरांना आता भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

महिलांची भटकंती : इन्व्हर्टरवर टिल्लू पंप, पाण्याची चोरी सुरूच भंडारा : पाण्याचा मुबलक साठा असूनही शुद्ध पाण्यासाठी तरसणाऱ्या भंडारेकरांना आता भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील काही वॉर्डात ईन्व्हरर्टरच्या सहायाने टिल्लूपंप लावून पाणी ओढले जात आहे. परिणामी पाणी टंचाईत अजुन वाढ झाली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहराला वळसा घालून जीवनदायीनी वैनगंगा नदी वाहते. गोसीखुर्द धरणात पाणी साठवण केल्यानंतर वैनगंगेचा जलस्तरही मोठ्या प्रमाणात वाढला. महिनाभरापुर्वी धरणातील पाणी सोडल्याने सध्यास्थितीत कारधा वैनगंगा नदीत सहा ते सात फुट पाणी आहे. मात्र सदर पाणी दूषित आहे. जलशुद्धीकरण संयत्राच्या माध्यमातून हेच पाणी भंडारेकरांना पिण्यासाठी नगरपालिका प्रशासनातर्फे पुरविले जाते. आधीच दूषित पाणीपुरवठा होत असताना उंच सखल भागात पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे. त्यात पाणी चोरणाऱ्यांनी नामी शक्कल लढविली आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा काळात नगरपालिकेच्या विनंतीवरून सकाळी ७ ते ८ या वेळात विजेचा पुरवठा खंडित करण्यात येत असतो. मात्र याच काळात टिल्लू पंप लावणाऱ्यांचेही चांगलेच फावले आहेत. एकीकडे वीज पुरवठा खंडित केल्यावरही टिल्लूपंपाच्या आधारे पाणी चोरणाऱ्यांचे मनसुबे बुलंदीवर आहेत. परिणामी नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठा काळात विद्युत पुरवठा खंडित केला असला तरी पाण्याच्या टंचाईत टिल्लूपंपाने कहर केला आहे. शहरातील बहुतांश वॉर्डात ईन्व्हरर्टरच्या सहायाने टिल्लूपंप चालविले जात आहे. सर्वेक्षणानुसार एका टिल्लूपंपाच्या वापरामुळे जवळपास सात घरांना होणारा पाणीपुरवठा एकट्या एका घराला होत आहे. परिणामी शेजारधर्म विसरलेल्या माणसाला शेजाऱ्याचे पाणी चोरने अभिमानास्पद वाटत आहे. परंतु याचा फटका सर्वांना बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी) तर टिल्लूपंपाची जप्ती व्हावी. शहरात पाणीपुरवठा काळात विद्युत पुरवठा खंडित होत असला तरी इन्व्हर्टरवर टिल्लूपंप लावले जात आहे. नगरपालिका प्रशासनाने मोहिम राबवून सदर टिल्लूपंप जप्त करावे, अशी मागणी काही वॉर्डातील नागरिकांकडून सातत्याने होत आहे. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पाणी मुबलक प्रमाणात मिळेल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र या युक्तीचा गैरवारच होत असल्याचे दिसून येत आहे. वीज नसल्याने नळाची धारही वाढण्यापेक्षा उलट कमी झाली आहे. ७ वाजता नळाला पाणी यायचे मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर पाणी यायची वेळ ७.३० पर्यंत वाढली आहे. काही भागात दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. मात्र संपूर्ण शहरात दोनवेळा पाणीपुरवठा होत नाही. हे येथे उल्लेखनीय.