शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शहरात कृत्रिम पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: May 5, 2017 00:34 IST

पाण्याचा मुबलक साठा असूनही शुद्ध पाण्यासाठी तरसणाऱ्या भंडारेकरांना आता भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

महिलांची भटकंती : इन्व्हर्टरवर टिल्लू पंप, पाण्याची चोरी सुरूच भंडारा : पाण्याचा मुबलक साठा असूनही शुद्ध पाण्यासाठी तरसणाऱ्या भंडारेकरांना आता भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील काही वॉर्डात ईन्व्हरर्टरच्या सहायाने टिल्लूपंप लावून पाणी ओढले जात आहे. परिणामी पाणी टंचाईत अजुन वाढ झाली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहराला वळसा घालून जीवनदायीनी वैनगंगा नदी वाहते. गोसीखुर्द धरणात पाणी साठवण केल्यानंतर वैनगंगेचा जलस्तरही मोठ्या प्रमाणात वाढला. महिनाभरापुर्वी धरणातील पाणी सोडल्याने सध्यास्थितीत कारधा वैनगंगा नदीत सहा ते सात फुट पाणी आहे. मात्र सदर पाणी दूषित आहे. जलशुद्धीकरण संयत्राच्या माध्यमातून हेच पाणी भंडारेकरांना पिण्यासाठी नगरपालिका प्रशासनातर्फे पुरविले जाते. आधीच दूषित पाणीपुरवठा होत असताना उंच सखल भागात पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे. त्यात पाणी चोरणाऱ्यांनी नामी शक्कल लढविली आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा काळात नगरपालिकेच्या विनंतीवरून सकाळी ७ ते ८ या वेळात विजेचा पुरवठा खंडित करण्यात येत असतो. मात्र याच काळात टिल्लू पंप लावणाऱ्यांचेही चांगलेच फावले आहेत. एकीकडे वीज पुरवठा खंडित केल्यावरही टिल्लूपंपाच्या आधारे पाणी चोरणाऱ्यांचे मनसुबे बुलंदीवर आहेत. परिणामी नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठा काळात विद्युत पुरवठा खंडित केला असला तरी पाण्याच्या टंचाईत टिल्लूपंपाने कहर केला आहे. शहरातील बहुतांश वॉर्डात ईन्व्हरर्टरच्या सहायाने टिल्लूपंप चालविले जात आहे. सर्वेक्षणानुसार एका टिल्लूपंपाच्या वापरामुळे जवळपास सात घरांना होणारा पाणीपुरवठा एकट्या एका घराला होत आहे. परिणामी शेजारधर्म विसरलेल्या माणसाला शेजाऱ्याचे पाणी चोरने अभिमानास्पद वाटत आहे. परंतु याचा फटका सर्वांना बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी) तर टिल्लूपंपाची जप्ती व्हावी. शहरात पाणीपुरवठा काळात विद्युत पुरवठा खंडित होत असला तरी इन्व्हर्टरवर टिल्लूपंप लावले जात आहे. नगरपालिका प्रशासनाने मोहिम राबवून सदर टिल्लूपंप जप्त करावे, अशी मागणी काही वॉर्डातील नागरिकांकडून सातत्याने होत आहे. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पाणी मुबलक प्रमाणात मिळेल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र या युक्तीचा गैरवारच होत असल्याचे दिसून येत आहे. वीज नसल्याने नळाची धारही वाढण्यापेक्षा उलट कमी झाली आहे. ७ वाजता नळाला पाणी यायचे मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर पाणी यायची वेळ ७.३० पर्यंत वाढली आहे. काही भागात दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. मात्र संपूर्ण शहरात दोनवेळा पाणीपुरवठा होत नाही. हे येथे उल्लेखनीय.