शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

एप्रिल हिट : पारा ४०.५ अंशावर

By admin | Updated: April 2, 2016 00:34 IST

एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच सुर्य आग ओकू लागला आहे. होळी संपल्यानंतर सूर्याचा पारा चढत जातो,

देवानंद नंदेश्वर  भंडाराएप्रिल महिन्याच्या प्रारंभीच सुर्य आग ओकू लागला आहे. होळी संपल्यानंतर सूर्याचा पारा चढत जातो, असा सर्वमान्य संकेत आहे. मात्र भंडारा शहरासह जिल्ह्यातच मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सूर्याचा पारा चढू लागला आहे. आज कमाल तापमान ४०.५ तर, किमान तापमान २३.५ अंश सेल्सियस नोंदविण्यात आला. उन्हाची काहिली जिल्हावासीयांना आतापासूनच असह्य होऊ लागली आहे.या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सिंचन प्रकल्पातही पाणी नाही. ग्रामीण भागातील नदी-नाले, बोड्या, तलाव आटण्याच्या मार्गावर आहेत. अशातच आता उन्हाळ्यालाही जिल्ह्यात लवकरच सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून सूर्य आग ओकू लागल्याचे भासत आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहिली वाढत असल्याने नागरिकांनाही ती असह्य होऊ लागली आहे. मार्च महिन्यातच तीव्र उष्णता जाणवते तर एप्रिल व मे महिन्यात काय हाल होतील, याची चिंता जिल्हावासीयांना लागली आहे.उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनीही दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे कमी केले आहे. आवश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. सर्वच मार्ग दुपारच्या सुमारास ओस पडल्याचे दिसून येत आहेत. दुपारची वर्दळ कमी झाल्याने सायंकाळी व रात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. नागरिक आपल्या कुटुंबासह खरेदीसाठी सायंकाळीच घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. पाण्याची पातळी खालावलीदुसरीकडे उन्हाची काहिली वाढल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. नदी-नाले, तलाव तर आटण्याच्या मार्गावर आहेच; शिवाय ग्रामीण भागातील जलस्त्रोत असलेल्या विहिरी, बोअरवेल यांचे पाणीही कमी होत आहे. अनेक गावांत आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवत आहे. अनेक ठिकाणी लोक पाण्यासाठी एक-दोन किलोमीटरची पायपीट करताना दिसत आहेत. मडक्यांची मागणी वाढलीउन्हाची काहिली वाढली की थंड पाणी मोठा आधार वाटतो. त्यामुळे मडक्यांची मागणी वाढते. आताही येथील कुंभार टोलीत नागरिकांची माठ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. अनेक छोटे व्यावसायिक, गोरगरीब नागरिक फ्रिज घेण्याच्या भानगडीत न पडता माठातच पाणी ठेवतात. त्यामुळे सध्या माठांच्या किमतीही वधारल्या आहेत.जिल्ह्यात 'हिट अँक्शन प्लॅन' वाढलेल्या तापमानामुळे सर्व सामान्य नागरिक व मेहनतीचे काम करणाऱ्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि निवाऱ्याकरीता शेडची व्यवस्था करण्यात यावी. तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून रुग्णालयामध्ये तात्काळ उपचारासाठी शीतकक्षाची निर्मिती करावी, नगर परिषद भंडारा, पवनी आणि तुमसर या शहरी भागात नागरिकांना पिण्यासाठी पाणी, सार्वजनिक प्याऊ तसेच उन्हात निवाऱ्याच्या जागा निश्चित करण्यात याव्यात. सेतू केंद्र , बसस्थानक, रेल्वे स्टेशन तसेच सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या लोकांना रांगेत उभे राहण्यासाठी शेडची व्यवस्था विभाग प्रमुखांनी करावी. फुटपाथ बसस्थानक येथे झोपणाऱ्या व्यक्ती तसेच आजारी व्यक्ती यांच्याकडे लक्ष ठेवून त्यांना गरज असल्यास उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करावे. नागरिकांनी रुग्णवाहिकेची सेवा मिळविण्यासाठी १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा , अशा सूचना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिल्या आहेतउष्णतेपासून उष्माघाताची शक्यता असते. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उष्माघाताच्या उपचारासाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे. उपचारासाठी औषधाचा मुबलक साठा आहे. रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टरांसह परिचारिका तैनात आहेत. या कक्षात रुग्णांना गारवा मिळावा, यासाठी कक्ष वातानुकुलीत करण्यात आले आहे. - देवेंद्र पातुरकर,जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा.गारपीटची शक्यतायेत्या पाच ते सात एप्रिल दरम्यान विदर्भासह भंडारा जिल्ह्यात गारपिठसह पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. यापूर्वी मार्च महिन्यात दोनदा अकाली पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात बदल झाला.