शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

३ कोटींच्या पेयजल योजनेला मंजुरी

By admin | Updated: April 14, 2017 00:31 IST

राष्ट्रीय ग्रामीण कृती आराखडा नुसार जिल्ह्यातील चार गावात पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करण्यात येणार आहे.

जि.प. जलव्यवस्थापन समितीचा ठराव : तुमसर तालुक्यात तीन तर पवनीत एका ठिकाणी होणार बांधकामभंडारा : राष्ट्रीय ग्रामीण कृती आराखडा नुसार जिल्ह्यातील चार गावात पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी ३ कोटी १२ लाख ८८६ रुपयांच्या योजनेला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीने मंजुरी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या सभाध्यक्षतेखाली पार पडलेल्या गुरुवारच्या सभेत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, समाजकल्याण सभापती विनायक टेकाम, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले यांच्यासह सर्व समिती सदस्य व लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.राष्ट्रीय ग्रामीण कृती आराखडा पेयजल योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या गावांमध्ये पवनी तालुक्यातील अड्याळ, तुमसर तालुक्यातील चुल्हाड, देव्हाडी व पाथरी या गावांचा समावेश आहे. अड्याळ येथे या योजनेसाठी ६८ लाख ६ हजार ४०२ रुपये, चुल्हाडसाठी १ कोटी ८ लाख ३४ हजार ८२ रुपये, देव्हाडीसाठी ७१ लाख १ हजार २०१ रुपये व पाथरीसाठी ५३ लाख ७९ हजार २०१ रुपये असा तीन कोटी १२ लाख ८८६ रुपयांचा हा आराखडा मंजूर केला. ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाणीपुरवठा समितीच्या नियंत्रणात यांचे काम व नियंत्रण करण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी निर्णयाने अड्याळ, चुल्हाड, देव्हाडी व पाथरी येथील पाण्याच्या संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याचा जि.प. अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी सुवर्णमध्य साधला आहे. (शहर प्रतिनिधी)