शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शिक्षक अतिरिक्त असताना निर्देशकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 00:32 IST

सानगडी : सत्र २०१५-१६ मध्ये झालेल्या शिक्षक संच मान्यतेत राज्यात हजारो शिक्षक अतिरिक्त झाले.

सानगडी : सत्र २०१५-१६ मध्ये झालेल्या शिक्षक संच मान्यतेत राज्यात हजारो शिक्षक अतिरिक्त झाले. अतिरिक्त शिक्षकांचे इतर शाळेत समायोजन न करताच केवळ आरटीईमधील तरतुदीनुसार राज्यातील उच्च प्राथमिक शाळा मध्ये कला, शारीरिक शिक्षक, कार्यानुभवाचे धडे देण्यासाठी अतिथी निर्देशकांची नियुक्ती शासनाने केली आहे.इयत्ता सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक शाळांची पटसंख्या १०० पेक्षा अधिक आहे. अशा शाळांमध्ये कला, शारीरिक शिक्षण व आरोग्य आणि कार्यानुभव यातील विषयांसाठी केवळ मानधनावर अतिथी निदेशकांची नियुक्ती करण्याच्या सुचना शालेय व क्रीडा विभागाने दिल्या आहेत. ७ आॅक्टोबर २०१५ च्या आदेशानुसार अतिथी निर्देशकाना कोर्टात दावा करता येणार नाही. संघटनेकडे दाद मागता येणार नाही. वेतनासाठी तगादा न लावता सेवा करु असे हमी पत्र लिहून दयावे लागेल. या अटीच्या अधिन राहून मानधनावर अतिथी निदेशकांची नियुक्ती करण्यात आली. म्हणजेच अतिथी निदेशकांनी दिवास्वप्न न पाहता टाईमपास सेवा करने असा अर्थ होतो. यामुळे अतिथी निदेशकाचे भविष्य धोक्यात आहे असेच म्हणावे लागेल. मानधनासाठी येणारा खर्च सर्व शिक्षा अभियानातुन भागविण्यात येणार आहे.केंद्र सरकारकडून प्रत्येक वर्षी युडाईसची माहिती प्रमाणित केली जाते. राज्यात १०० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या २,२२१ उच्च प्राथमिक शाळा आहेत. या शाळांसाठी प्रत्येक तीन शिक्षक याप्रमाणे ६,६६३ अतिथी निदेशकांच्या पदाकरिता केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार ६६६३ अतिथी निदेशकांच्या मानधनाकरिता ३३.२१ कोटी रुपये मंजुर करण्यात आले.इयत्ता निहाय व विषय निहाय उपलब्ध तासिकेवर आणि फक्त मानधनाच्या अटीस बाध्य राहून अतिथी निदेशकांची नियुक्ती करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले असल्यामुळे भविष्यात येणारी भानगड किंवा समस्या आल्यास शाळा व्यवस्थापन समितीला तोंड दयावे लागेल. दिवसेंदिवस शिक्षण विभागात समस्या वाढत आहेत. आरटीईनुसार कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभवाचे धडे देण्यासाठी पुर्ण वेळ शिक्षकांची नियुक्ती किंवा अतिरिक्त असलेले शिक्षक यांची नियुक्ती न करता फक्त मानधनावर अतिथी निदेशकांची नियुक्ती ही सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा आहे. (वार्ताहर)