शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
2
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
3
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
4
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
5
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
6
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
7
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
8
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
9
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
10
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
11
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
12
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
13
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
14
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
15
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
16
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
17
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
18
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
19
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

कोविड उपचारासाठी २२ डॉक्टरांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:35 IST

मार्च व एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख अचानक वाढला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे. ही बाब लक्षात ...

मार्च व एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख अचानक वाढला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे. ही बाब लक्षात घेता, जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी डॉक्टर व अधिपरिचारिका यांना सेवा देण्याचे आवाहन केले होते. प्राप्त अर्जानुसार २२ डॉक्टर व ७५ आरोग्य सेविकांना नेमणूक देण्यात आली आहे. डॉक्टरांमध्ये बीएएमएस व बीडीएस डॉक्टरांचा समावेश आहे. या डॉक्टरांची जिल्हा रुग्णालय, साकोली व तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयासह भंडारा, लाखनी, पवनी येथील कोविड केअर सेंटरमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी काही डॉक्टर रुजू झाले असून, उर्वरित डॉक्टर लवकरच रुजू होतील, असा विश्वास आरोग्य विभागाला आहे.

कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोविड रुग्णांची शुश्रूषा करण्यासाठी अधिक संख्येने अधिपरिचारिकांची आवश्यकता भासत आहे. यासाठी वारंवार जाहिरात देऊनही हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने शासनाने आरोग्य सेविकांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने १३ एप्रिलच्या आदेशानुसार ७५ आरोग्य सेविकांची कंत्राटी स्वरूपात तात्पुरत्या कालावधीकरिता नियुक्ती केली आहे. त्यांची जिल्हा रुग्णालय, साकोली, तुमसर उपजिल्हा रुग्णालय, तसेच भंडारा, लाखनी व पवनी कोविड केअर सेंटर येथे नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभागाला अधिकच्या मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहेच. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत खासगी डॉक्टर व अधिपरिचारिका तसेच आरोग्य सेविकांनी आपल्या सेवा शासनाला द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

बाॅक्स

उपचारासाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज

जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात सुरू असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णावरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत आहे. अशावेळी वैद्यकीय प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास त्याचा लाभ रुग्णांना होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता एमबीबीएस झालेले विद्यार्थी, नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेले व डॉक्टर यांच्या सेवेची शासकीय आरोग्य विभागाला नितांत गरज आहे. शासकीय आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले डॉक्टरसुद्धा आपल्या सेवा देऊ शकतात. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले.