शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

अन् शेतकऱ्यांनीच जाळले धानपीक

By admin | Updated: December 3, 2015 00:44 IST

आधीच कोरडा दुष्काळ त्यातही शेतकऱ्यांनी कशीबशी शेतीची लागवड केली. परंतु परिसरातील तळे व विहिरी कोरडे पडल्याने सिंचनाअभावी व हवामानाच्या बदलामुळे ...

तुमसर : आधीच कोरडा दुष्काळ त्यातही शेतकऱ्यांनी कशीबशी शेतीची लागवड केली. परंतु परिसरातील तळे व विहिरी कोरडे पडल्याने सिंचनाअभावी व हवामानाच्या बदलामुळे शेतपिकावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला. परिणामी धानाची उतारी मिळाली नाही. स्वत:च्या शेतातल्या उभ्या धानपिकाला जाळून परिसरातील १८ गावे ही दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. तुमसर तालुक्यातील चिखला, आष्टी व गर्रा बघेडा जि.प. क्षेत्रात यावर्षी अती अल्प पाऊस पडल्याने परिसरातील शेतकरी प्रभावित झाले होते. सर्वात जास्त कोरड्या दुष्काळाचा फटका चिखला जि.प. क्षेत्रातील चिखला, राजापूर, सीतासावंगी, चिचोली, भोंडकी, मोकोटोला, गुडरी, खंदाळ, सोदेपूर, धामनेवाडा, खैरटोला, गोबरवाही, हेटी, हिरापूर, हमेशा, धुटेरा, घानोड, सक्करदरा, मोहगाव या गावांना बसला. त्यामुळे परिसरातील १५ हजार हेक्टरवरील शेतजमिनीवर शेतकऱ्यांनी शेतीची लागवडच केली नाही. तर कुठे धानावर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने धानाला उतारी मिळालीच नाही. शेतातील धान कापणीला येणारा खर्चही त्या धानाच्या उतारीतून होवू शकत नसल्याने चिखला जि.प. क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून तब्बल ३० एकर शेतातील उभ्या धान पिकाला स्वत:च्या हाताने जाळून घेतले व आतातरी क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांच्या हाताला कामे व कर्जमाफी घोषित करण्याची एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या समस्येशी जाणीव व्हावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. मात्र प्रशासनातर्फे कसलीही कारवाई न झाल्याने प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधण्याकरिता शेतकऱ्यांनी स्वमर्जीने धानपिक जाळले. तरी देखील शासनाला जाग येत नसेल तर यास काय म्हणावे?- संगीता सोनवानेजि.प. सदस्या, चिखला.