शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अन् शेतकऱ्यांनीच जाळले धानपीक

By admin | Updated: December 3, 2015 00:44 IST

आधीच कोरडा दुष्काळ त्यातही शेतकऱ्यांनी कशीबशी शेतीची लागवड केली. परंतु परिसरातील तळे व विहिरी कोरडे पडल्याने सिंचनाअभावी व हवामानाच्या बदलामुळे ...

तुमसर : आधीच कोरडा दुष्काळ त्यातही शेतकऱ्यांनी कशीबशी शेतीची लागवड केली. परंतु परिसरातील तळे व विहिरी कोरडे पडल्याने सिंचनाअभावी व हवामानाच्या बदलामुळे शेतपिकावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला. परिणामी धानाची उतारी मिळाली नाही. स्वत:च्या शेतातल्या उभ्या धानपिकाला जाळून परिसरातील १८ गावे ही दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. तुमसर तालुक्यातील चिखला, आष्टी व गर्रा बघेडा जि.प. क्षेत्रात यावर्षी अती अल्प पाऊस पडल्याने परिसरातील शेतकरी प्रभावित झाले होते. सर्वात जास्त कोरड्या दुष्काळाचा फटका चिखला जि.प. क्षेत्रातील चिखला, राजापूर, सीतासावंगी, चिचोली, भोंडकी, मोकोटोला, गुडरी, खंदाळ, सोदेपूर, धामनेवाडा, खैरटोला, गोबरवाही, हेटी, हिरापूर, हमेशा, धुटेरा, घानोड, सक्करदरा, मोहगाव या गावांना बसला. त्यामुळे परिसरातील १५ हजार हेक्टरवरील शेतजमिनीवर शेतकऱ्यांनी शेतीची लागवडच केली नाही. तर कुठे धानावर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने धानाला उतारी मिळालीच नाही. शेतातील धान कापणीला येणारा खर्चही त्या धानाच्या उतारीतून होवू शकत नसल्याने चिखला जि.प. क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून तब्बल ३० एकर शेतातील उभ्या धान पिकाला स्वत:च्या हाताने जाळून घेतले व आतातरी क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांच्या हाताला कामे व कर्जमाफी घोषित करण्याची एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या समस्येशी जाणीव व्हावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. मात्र प्रशासनातर्फे कसलीही कारवाई न झाल्याने प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधण्याकरिता शेतकऱ्यांनी स्वमर्जीने धानपिक जाळले. तरी देखील शासनाला जाग येत नसेल तर यास काय म्हणावे?- संगीता सोनवानेजि.प. सदस्या, चिखला.