शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
7
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
8
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
9
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
10
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
11
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
12
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
13
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
14
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
15
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
16
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
17
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
18
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
19
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
20
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...

अन् शेतकºयांनी केली कोरड्या शेतात रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 21:35 IST

येथील शेतकरी अशोक सोमाजी शहारे यांनी शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने हलक्या धानाचे पºहे टाकले होते.

ठळक मुद्देपाऊस बरसेना चिंता संपेना : करडी परिसरातील पहिला धाडसी प्रयोग

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : येथील शेतकरी अशोक सोमाजी शहारे यांनी शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने हलक्या धानाचे पºहे टाकले होते. मात्र, पºयांना ३० दिवसांचा कालावधी लोटला असतांना रोवणी लायक पाणी आले नाही. त्यामुळे वाळलेल्या नर्सरीतून रोपे काढून चिखलणी न करता वाफसा स्थितीमधील जमिनीवर शेततण विरहित करुन दोरीच्या सहायाने भात रोपांची लागवड केली. हा करडी परिसरातील पहिला धाडसी प्रयोग असून परिणामाकडे शेतकºयांचे व कृषी विभागाचे लक्ष लागले आहे.करडी परिसर कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. सिंचनाच्या कोणत्याही सुविधा या भागात नाहीत. निसर्गावर येथील शेती अवलंबून आहे. परिसरात लहान मोठ्या तलावांची संख्या बरीच असतांना तलावांची सिंचन क्षमता बेताची आहे. विहिरीच्या पाण्याची पातळी खालावलेली असते. यावर्षी मोहाडी तालुक्यात १ जुन ते २९ जुलैपर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी ७२ टक्के आहे. त्यातच वरठी १०२ टक्के, करडी ४८ टक्के, कांद्री ५१ टक्के, कान्हळगाव ४० आंधळगाव ६३ टक्के आहे. परिणामी अजुनही तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. नाले पाण्याविणा कोरडी आहेत. शेतकºयांच्या शेतबोळीत, शेततळ्यात पाहिजे तसा पाण्याचा साठा निर्माण झालेला नाही.करडी परिसरात यावर्षी आठवड्या अगोदर या हंगामातील पहिला मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकºयांनी कशीबशी रोवणी सुरु केली असतांना पाऊस बेपत्ता झाला. त्यामुळे रोवण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षत असतांना रोपांचा कालावधी महिना दिड महिन्यांवर आला आहे. शेतकºयांना कोरड्या दुष्काळाच्या चिंता सतावत आहे. शहारे यांची फक्त अर्धा एकर कोरडवाहू शेती करडी ते पालोरा मार्गावर विद्युत उपकेंद्राच्या समोर रस्त्याला लागून आहे. यांनी यावर्षी हलक्या धानाची पºहे टाकली. पºहांना कालावधी महिन्याभराचा झालेला असतांना शेती रोवायची कशी याची चिंता सतावीत असताना कोरड्या निसर्गाला न घाबरता शेतीत रोवणा करण्याचा धाडसी निर्णय घेतला. २८ जुलै रोजी त्यांनी ओल्या असलेल्या शेतीतील पºहे काढले. शेतात पाणी नसल्याने त्यांनी चिखलनीच्या भानगडी न करता रोपे जमिनीत गाडण्यासाठी नागरडी केली. शेत तणविरहित केले. चरे पडलेल्या खोलगट भागात धान पिकांची रोपे दोरी लावून रोवली. करडीचे कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार यांनी शेतावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रोपांची मुळे जमिनीत गाडण्याचा सल्ला दिला. प्रयोगाचे कौतुक होत असून पाऊस लांबणीवर पडल्याने हा प्रयोग यशस्वी होणार काय, याकडे शेतकरी व कृषी विभागाच्या नजरा लागल्या आहेत.