शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: सलग दुसऱ्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
4
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
5
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
6
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
7
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
8
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
9
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
10
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
11
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
12
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
13
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
14
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
15
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
16
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
17
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
18
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
19
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
20
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले

अन् शेतकºयांनी केली कोरड्या शेतात रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 21:35 IST

येथील शेतकरी अशोक सोमाजी शहारे यांनी शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने हलक्या धानाचे पºहे टाकले होते.

ठळक मुद्देपाऊस बरसेना चिंता संपेना : करडी परिसरातील पहिला धाडसी प्रयोग

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : येथील शेतकरी अशोक सोमाजी शहारे यांनी शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने हलक्या धानाचे पºहे टाकले होते. मात्र, पºयांना ३० दिवसांचा कालावधी लोटला असतांना रोवणी लायक पाणी आले नाही. त्यामुळे वाळलेल्या नर्सरीतून रोपे काढून चिखलणी न करता वाफसा स्थितीमधील जमिनीवर शेततण विरहित करुन दोरीच्या सहायाने भात रोपांची लागवड केली. हा करडी परिसरातील पहिला धाडसी प्रयोग असून परिणामाकडे शेतकºयांचे व कृषी विभागाचे लक्ष लागले आहे.करडी परिसर कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. सिंचनाच्या कोणत्याही सुविधा या भागात नाहीत. निसर्गावर येथील शेती अवलंबून आहे. परिसरात लहान मोठ्या तलावांची संख्या बरीच असतांना तलावांची सिंचन क्षमता बेताची आहे. विहिरीच्या पाण्याची पातळी खालावलेली असते. यावर्षी मोहाडी तालुक्यात १ जुन ते २९ जुलैपर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी ७२ टक्के आहे. त्यातच वरठी १०२ टक्के, करडी ४८ टक्के, कांद्री ५१ टक्के, कान्हळगाव ४० आंधळगाव ६३ टक्के आहे. परिणामी अजुनही तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. नाले पाण्याविणा कोरडी आहेत. शेतकºयांच्या शेतबोळीत, शेततळ्यात पाहिजे तसा पाण्याचा साठा निर्माण झालेला नाही.करडी परिसरात यावर्षी आठवड्या अगोदर या हंगामातील पहिला मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकºयांनी कशीबशी रोवणी सुरु केली असतांना पाऊस बेपत्ता झाला. त्यामुळे रोवण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षत असतांना रोपांचा कालावधी महिना दिड महिन्यांवर आला आहे. शेतकºयांना कोरड्या दुष्काळाच्या चिंता सतावत आहे. शहारे यांची फक्त अर्धा एकर कोरडवाहू शेती करडी ते पालोरा मार्गावर विद्युत उपकेंद्राच्या समोर रस्त्याला लागून आहे. यांनी यावर्षी हलक्या धानाची पºहे टाकली. पºहांना कालावधी महिन्याभराचा झालेला असतांना शेती रोवायची कशी याची चिंता सतावीत असताना कोरड्या निसर्गाला न घाबरता शेतीत रोवणा करण्याचा धाडसी निर्णय घेतला. २८ जुलै रोजी त्यांनी ओल्या असलेल्या शेतीतील पºहे काढले. शेतात पाणी नसल्याने त्यांनी चिखलनीच्या भानगडी न करता रोपे जमिनीत गाडण्यासाठी नागरडी केली. शेत तणविरहित केले. चरे पडलेल्या खोलगट भागात धान पिकांची रोपे दोरी लावून रोवली. करडीचे कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार यांनी शेतावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रोपांची मुळे जमिनीत गाडण्याचा सल्ला दिला. प्रयोगाचे कौतुक होत असून पाऊस लांबणीवर पडल्याने हा प्रयोग यशस्वी होणार काय, याकडे शेतकरी व कृषी विभागाच्या नजरा लागल्या आहेत.