शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अन् शेतकºयांनी केली कोरड्या शेतात रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 21:35 IST

येथील शेतकरी अशोक सोमाजी शहारे यांनी शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने हलक्या धानाचे पºहे टाकले होते.

ठळक मुद्देपाऊस बरसेना चिंता संपेना : करडी परिसरातील पहिला धाडसी प्रयोग

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : येथील शेतकरी अशोक सोमाजी शहारे यांनी शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने हलक्या धानाचे पºहे टाकले होते. मात्र, पºयांना ३० दिवसांचा कालावधी लोटला असतांना रोवणी लायक पाणी आले नाही. त्यामुळे वाळलेल्या नर्सरीतून रोपे काढून चिखलणी न करता वाफसा स्थितीमधील जमिनीवर शेततण विरहित करुन दोरीच्या सहायाने भात रोपांची लागवड केली. हा करडी परिसरातील पहिला धाडसी प्रयोग असून परिणामाकडे शेतकºयांचे व कृषी विभागाचे लक्ष लागले आहे.करडी परिसर कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. सिंचनाच्या कोणत्याही सुविधा या भागात नाहीत. निसर्गावर येथील शेती अवलंबून आहे. परिसरात लहान मोठ्या तलावांची संख्या बरीच असतांना तलावांची सिंचन क्षमता बेताची आहे. विहिरीच्या पाण्याची पातळी खालावलेली असते. यावर्षी मोहाडी तालुक्यात १ जुन ते २९ जुलैपर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी ७२ टक्के आहे. त्यातच वरठी १०२ टक्के, करडी ४८ टक्के, कांद्री ५१ टक्के, कान्हळगाव ४० आंधळगाव ६३ टक्के आहे. परिणामी अजुनही तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. नाले पाण्याविणा कोरडी आहेत. शेतकºयांच्या शेतबोळीत, शेततळ्यात पाहिजे तसा पाण्याचा साठा निर्माण झालेला नाही.करडी परिसरात यावर्षी आठवड्या अगोदर या हंगामातील पहिला मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकºयांनी कशीबशी रोवणी सुरु केली असतांना पाऊस बेपत्ता झाला. त्यामुळे रोवण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षत असतांना रोपांचा कालावधी महिना दिड महिन्यांवर आला आहे. शेतकºयांना कोरड्या दुष्काळाच्या चिंता सतावत आहे. शहारे यांची फक्त अर्धा एकर कोरडवाहू शेती करडी ते पालोरा मार्गावर विद्युत उपकेंद्राच्या समोर रस्त्याला लागून आहे. यांनी यावर्षी हलक्या धानाची पºहे टाकली. पºहांना कालावधी महिन्याभराचा झालेला असतांना शेती रोवायची कशी याची चिंता सतावीत असताना कोरड्या निसर्गाला न घाबरता शेतीत रोवणा करण्याचा धाडसी निर्णय घेतला. २८ जुलै रोजी त्यांनी ओल्या असलेल्या शेतीतील पºहे काढले. शेतात पाणी नसल्याने त्यांनी चिखलनीच्या भानगडी न करता रोपे जमिनीत गाडण्यासाठी नागरडी केली. शेत तणविरहित केले. चरे पडलेल्या खोलगट भागात धान पिकांची रोपे दोरी लावून रोवली. करडीचे कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार यांनी शेतावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रोपांची मुळे जमिनीत गाडण्याचा सल्ला दिला. प्रयोगाचे कौतुक होत असून पाऊस लांबणीवर पडल्याने हा प्रयोग यशस्वी होणार काय, याकडे शेतकरी व कृषी विभागाच्या नजरा लागल्या आहेत.