शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्ह्यातील शेतशिवारात पीक काढण्याची लगबग, पण मजुरांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST

अनेक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करीत आहेत. मात्र, ढगाळ वातावरण, तसेच वन्य प्राण्यांचा असलेला त्रास यामुळे मळणी ...

अनेक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करीत आहेत. मात्र, ढगाळ वातावरण, तसेच वन्य प्राण्यांचा असलेला त्रास यामुळे मळणी यंत्रांना मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मजुरांना जादा पैसे देऊन लवकर पिकांची कापणी करीत आहेत. काही गावांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मजूर कोरोनाच्या भीतीने कामास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे एकीकडे मजूर मिळतात, तर दुसरीकडे मळणीसाठी मशीन मिळत नाही. मशीन मिळालीच तर मजूर उपलब्ध होत नाहीत. अशी दुहेरी समस्या शेतकऱ्यांना सतावत आहे. भंडारा तालुक्यातील चिखली, खरबी, खराडी, माटोरा, मानेगाव बाजार खुटसावरी, शहापूर, नांदोरा परिसरात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रबी हंगामातील गहू, हरभरा पिकाचे चांगले उत्पादन येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यासोबतच खरीप हंगामात शेतकऱ्यांना बसलेला फटका यामुळे आणि रबी हंगामातील पिकांवरच पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. कोरोना संसर्ग तर दुसरीकडे वाढत्या महागाईने शेतकरी संकटात सापडला आहे.

डिझेलच्या वाढत्या दराने शेतकरी त्रस्त एकीकडे दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे, तर दुसरीकडे वाढलेल्या डिझेल पेट्रोलच्या किमतीचा परिणाम शेतकऱ्यांना मदनी पिकाच्या कापणीसाठी अधिकचा दर मोजावा लागत आहे. प्रत्येक पोत्यामागे शेतकऱ्यांना गेल्या वर्षीपेक्षा अधिकचा दर द्यावा लागत आहे. इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच सोसावा लागत आहे. यंदा डिझेलच्या दरवाढीने आणि शेतमजूरही जास्तीचे पैसे मागत आहेत त्यामुळे वाढत्या महागाईचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

कोट

रबी हंगामातील पिकांचे उत्पन्न शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले होत आहे. मात्र, यावर्षी डिझेलचे दरही वाढले आहेत. त्यामुळे पोत्यामागे पन्नास ते शंभर रुपयांची दरवाढ झाली आहे. वाढत्या महागाईची झळ शेतकऱ्यांसह मळणी यंत्र मालकांनाही बसत आहे.

श्रीकांत वंजारी

परसोडी, ता.भंडारा, मळणीयंत्र मालक.

कोट

प्रत्येक गोष्टीतच महागाई वाढली आहे. मात्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, अतिवृष्टी मदत, तसेच पीक कर्जमाफी अजूनही दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. डिझेलचे दर वाढले आहेत. मात्र, त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नाही.

विष्णुदास हटवार

शेतकरी तथा तंटामुक्ती अध्यक्ष, चिखली.