शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतशिवारात पीक काढण्याची लगबग, पण मजुरांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST

अनेक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करीत आहेत. मात्र, ढगाळ वातावरण, तसेच वन्य प्राण्यांचा असलेला त्रास यामुळे मळणी ...

अनेक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करीत आहेत. मात्र, ढगाळ वातावरण, तसेच वन्य प्राण्यांचा असलेला त्रास यामुळे मळणी यंत्रांना मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मजुरांना जादा पैसे देऊन लवकर पिकांची कापणी करीत आहेत. काही गावांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मजूर कोरोनाच्या भीतीने कामास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे एकीकडे मजूर मिळतात, तर दुसरीकडे मळणीसाठी मशीन मिळत नाही. मशीन मिळालीच तर मजूर उपलब्ध होत नाहीत. अशी दुहेरी समस्या शेतकऱ्यांना सतावत आहे. भंडारा तालुक्यातील चिखली, खरबी, खराडी, माटोरा, मानेगाव बाजार खुटसावरी, शहापूर, नांदोरा परिसरात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रबी हंगामातील गहू, हरभरा पिकाचे चांगले उत्पादन येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यासोबतच खरीप हंगामात शेतकऱ्यांना बसलेला फटका यामुळे आणि रबी हंगामातील पिकांवरच पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. कोरोना संसर्ग तर दुसरीकडे वाढत्या महागाईने शेतकरी संकटात सापडला आहे.

डिझेलच्या वाढत्या दराने शेतकरी त्रस्त एकीकडे दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे, तर दुसरीकडे वाढलेल्या डिझेल पेट्रोलच्या किमतीचा परिणाम शेतकऱ्यांना मदनी पिकाच्या कापणीसाठी अधिकचा दर मोजावा लागत आहे. प्रत्येक पोत्यामागे शेतकऱ्यांना गेल्या वर्षीपेक्षा अधिकचा दर द्यावा लागत आहे. इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच सोसावा लागत आहे. यंदा डिझेलच्या दरवाढीने आणि शेतमजूरही जास्तीचे पैसे मागत आहेत त्यामुळे वाढत्या महागाईचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

कोट

रबी हंगामातील पिकांचे उत्पन्न शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले होत आहे. मात्र, यावर्षी डिझेलचे दरही वाढले आहेत. त्यामुळे पोत्यामागे पन्नास ते शंभर रुपयांची दरवाढ झाली आहे. वाढत्या महागाईची झळ शेतकऱ्यांसह मळणी यंत्र मालकांनाही बसत आहे.

श्रीकांत वंजारी

परसोडी, ता.भंडारा, मळणीयंत्र मालक.

कोट

प्रत्येक गोष्टीतच महागाई वाढली आहे. मात्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, अतिवृष्टी मदत, तसेच पीक कर्जमाफी अजूनही दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. डिझेलचे दर वाढले आहेत. मात्र, त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नाही.

विष्णुदास हटवार

शेतकरी तथा तंटामुक्ती अध्यक्ष, चिखली.