शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

डाळ वाटपात सर्वसामान्यांना फटका

By admin | Updated: November 16, 2015 02:07 IST

‘दाल रोटी खाओ, प्रभू के गुण गावों, असे गीत प्रचलित आहे. परंतु तूर डाळ आता श्रीमंतीचे लक्षण दिसत आहे.

वाढती महागाई : स्वस्त धान्य दुकानात १३० रुपये भाव तुमसर : ‘दाल रोटी खाओ, प्रभू के गुण गावों, असे गीत प्रचलित आहे. परंतु तूर डाळ आता श्रीमंतीचे लक्षण दिसत आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानातून शासनाने डाळ उपलब्ध करुन दिली असली तरी ती प्रति किलोग्रॅम १३० अशी आहे. बाजारात डाळीची किंमत १५० किलोग्रॅम आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानात सामान्य ग्राहकांनी डाळीकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. देश तथा राज्यात अचानक डाळीचे भाव वाढले, भाव कमी होण्याचे मार्ग बंद झाल्यासारखेच झाले. सणासुदीचे दिवस पुढे येऊ न ठेवले. शासनावर दबाव वाढल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना डाळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला. सरकारी स्वस्त धान्य दुकानातून डाळ वितरीत करण्यात येईल अशी घोषणा शासनाने केली. या तूर डाळीची किंमत १३० रुपये किलो ग्रॅम इतकी ठेवली. सामान्य ग्राहकांनी सणासुदीच्या दिवसात अर्धा ते एक किलो ग्रॅम एवढी डाळ खरेदी केली. बाजारात तूर डाळीची किंमत सध्या १५० रुपये किलोग्रॅम इतकी आहे. केवळ २० रुपयाचा येथे फरक आहे.अनेक स्वस्त धान्य दुकानात सध्या तूर डाळीचा साठा उपलब्ध आहे. सर्वसामान्य गरिबांनी तांदूळ व गहू खरेदी केली. डाळ हा घटक अनिवार्य नाही अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी दिल्या. जप्त केलेली तुर दाळ केवळ १०० रुपये प्रति किलोग्रॅम विक्री करण्यात आली. तीही केवळ शहरी भागात, परंतु ग्रामीण भागात आजही तुरदाळ चढ्या भावानेच विक्री केली जात आहे. पूर्व विदर्भात एकाही ठिकाणी साठा जप्त करण्यात आला नाही. अन्न पुरवठा विभागाने केवळ कागदोपत्री तपासणी केली असावी. शासन स्तरावर किमान स्वस्त धान्य दुकानातून ७० ते ८० रुपये किलोग्रॅम तुरडाळ सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्याची गरज होती. दिवाळीसारख्या मोठया सणाला राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानातून डाळ उपलब्ध करुन दिली परंतु डाळीचा भाव जास्त आहे. सर्वसामान्यांना तो परवडणारा नाही. आपले स्वस्त धान्य दुकानात डाळीचा साठा जप्त आहे. (तालुका प्रतिनिधी)