शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दचे सर्वच दरवाजे उघडले

By admin | Updated: August 6, 2015 01:42 IST

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदीनाले ओसंडून वाहत आहेत.

पवनी : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदीनाले ओसंडून वाहत आहेत. वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे गोसेखुर्द धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे.मध्य प्रदेशातील संजय सरोवरच्या जलसाठा वाढल्याने समतोल ठेवण्याच्या दृष्टीने तेथील पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे हे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर वाढला आहे. त्यामुळे धरणाचा जलसाठा वाढला आहे. धरणाचा जलसाठा २४०.७०० मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने गोसेखुर्द धरण विभागाने धरणाचे ११ दरवाजे दीड मीटरने तर २२ दरवाजे एक मीटरने उघडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ७,३१६ क्युमेक्स म्हणजे २५८३६५ क्युसेक पाण्याचा प्रतिसेकंद विसर्ग सुरु आहे. सोमवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे मंगळवारी धरणाचा एक दरवाजा ०.२५ मीटरने उघडण्यात आला होता. मंगळवारी सुरु असलेल्या पावसाममुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे पाण्याची पातळी २४०.७०० मीटर स्थिर ठेवण्यासाठी ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहणाऱ्या नदीचा जलस्तर वाढला आहे. पाऊस सतत सुरु राहिल्यास वैनगंगा नदीकाठावरील गावांना याचा धोका संभवतो. सध्या धरणाचा जलसाठा १४.६३६ टीएमसी इतका आहे. जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. (तालुका प्रतिनिधी)