शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

गोसेखुर्दचे सर्वच दरवाजे उघडले

By admin | Updated: August 6, 2015 01:42 IST

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदीनाले ओसंडून वाहत आहेत.

पवनी : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदीनाले ओसंडून वाहत आहेत. वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे गोसेखुर्द धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे.मध्य प्रदेशातील संजय सरोवरच्या जलसाठा वाढल्याने समतोल ठेवण्याच्या दृष्टीने तेथील पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे हे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर वाढला आहे. त्यामुळे धरणाचा जलसाठा वाढला आहे. धरणाचा जलसाठा २४०.७०० मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने गोसेखुर्द धरण विभागाने धरणाचे ११ दरवाजे दीड मीटरने तर २२ दरवाजे एक मीटरने उघडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ७,३१६ क्युमेक्स म्हणजे २५८३६५ क्युसेक पाण्याचा प्रतिसेकंद विसर्ग सुरु आहे. सोमवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे मंगळवारी धरणाचा एक दरवाजा ०.२५ मीटरने उघडण्यात आला होता. मंगळवारी सुरु असलेल्या पावसाममुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे पाण्याची पातळी २४०.७०० मीटर स्थिर ठेवण्यासाठी ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहणाऱ्या नदीचा जलस्तर वाढला आहे. पाऊस सतत सुरु राहिल्यास वैनगंगा नदीकाठावरील गावांना याचा धोका संभवतो. सध्या धरणाचा जलसाठा १४.६३६ टीएमसी इतका आहे. जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. (तालुका प्रतिनिधी)