शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

तर गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्वच दरवाजे उघडणार

By admin | Updated: September 6, 2015 00:23 IST

नागपूरच्या प्रदूषित नाग नदीचे पाणी भंडारा जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमिन सिंचित करणाऱ्या गोसेखुर्द धरणात सोडण्यात येत असल्यामुळे ....

भंडारा : नागपूरच्या प्रदूषित नाग नदीचे पाणी भंडारा जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमिन सिंचित करणाऱ्या गोसेखुर्द धरणात सोडण्यात येत असल्यामुळे वैनंगगा नदी प्रदूषित झाली आहे. मार्चपूर्वी नाग नदीचे पाणी रोखण्यात न आल्यास गोसेखुर्दचे सर्वच ३३ दरवाजे उघडून पाणी सोडणार असल्याचा गर्भित इशारा खासदार नाना पटोले यांनी दिला.विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत ते म्हणाले, नाग नदीचे पाणी गोसेखुर्द धरणात सोडले जावू नये यासाठी मार्चपूर्वी उपाययोजना करण्यासाठी धरण विभागाला निर्देश दिले आहे. परंतु धरण विभागाकडून मार्चपर्यंत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही तर गोसेखुर्द धरणाचे सर्वच ३३ दरवाजे उघडून धरणातील साठवून ठेवलेले पाणी सोडण्यात येईल, असे सांगितले.नाग नदीच्या दूषित पाण्यामुळे गोसीखुर्द धरण आणि संपूर्ण वैनगंगा नदी प्रदूषित झालेली आहे. यात पवनी ते भंडारा तालुक्यापर्यंत वैनगंगा नदीचे पात्र दूषित झाले आहे. या पाण्यातील रासायनिक घटकांमध्ये ‘स्लो पायझन’ आहे. परिणामी भंडारावासियांना दूर्धर आजारांनी ग्रासले आहे. याशिवाय त्वचेचे विकार वाढत आहेत. आतापर्यंत नागरिकांच्या आरोग्याशी जो खेळ करण्यात आला तो यापुढे होऊ दिला जाणार नाही. नागपूर येथील ‘नीरी’ या पर्यावरण संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, भंडारा जिल्ह्याच्या भू-गर्भातील ८० टक्के पाणी असून पाणी आणखी प्रदूषित होऊ देऊ नका, असे म्हटले आहे. यासंदर्भात यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून नाग नदीच्या प्रदूषणाविषयीचे गांभीर्य समजावून सांगितले. ज्यावेळी गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाची योजना आखण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन सरकारला या समस्यांची जाणीव होती. परंतु वैनगंगा नदीच्या जल शुद्धीकरणाविषयी सर्वत्र चुप्पी साधण्यात आली होती. आता २८ वर्षांनंतरही समस्यांचे निराकरणासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. त्यामुळे जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)भाजपा जातीय आरक्षणाच्या समर्थनार्थ गुजरातमध्ये आरक्षणाच्या मुद्दाविषयी बोलताना खा.पटोले म्हणाले, मी आणि माझा पक्ष आरक्षणाच्या समर्थनार्थ असून जातीय आरक्षणाचा विरोध कधीही खपवून घेणार नाही. समाजातील मागास घटकांना सामाजिक, अािर्थक आणि शैक्षणिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी संविधानात आरक्षण दिले आहे. संविधान लागू झाल्यानंतर मागील सहा दशकापासून मागास प्रवर्गातील समाजाचा अपेक्षित विकास झालेला नाही. राज्यात ओबीसी आरक्षणाची मागणी करीत खा.पटोले म्हणाले, ओबीसी समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा, या आशयाचे निवेदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.