शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
3
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
6
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
7
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
8
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
9
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
10
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
11
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
12
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
13
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
14
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
15
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
16
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
17
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
18
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
19
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
20
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...

महसूल विभागाच्या वारंवार बदलत्या निर्णयाने कृषी कर्मचारी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST

भंडारा : वर्षभर राबवलेल्या कृषी विभागातील विविध योजनांच्या अंमलबजावणीचे प्रस्ताव, अहवाल तसेच विविध कामांच्या प्रकल्पाचे सादरीकरणाची एकीकडे लगबग सुरू ...

भंडारा : वर्षभर राबवलेल्या कृषी विभागातील विविध योजनांच्या अंमलबजावणीचे प्रस्ताव, अहवाल तसेच विविध कामांच्या प्रकल्पाचे सादरीकरणाची एकीकडे लगबग सुरू आहे. दुसरीकडे मार्च एंडिंगच्या शेवटच्या टप्प्यात भंडारा तहसीलकडून खरीप हंगामातील पीक नुकसानाच्या याद्या, शेतकरी संख्या, क्षेत्र अशी सर्वच माहिती कृषी विभागाकडूनच मागविण्यात येत आहे. तहसीलच्या वारंवार बदलणाऱ्या निर्णयाने कृषी विभागातील कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

कृषी विभागात कार्यरत असतानाही स्वत:ची जबाबदारीची कामे पार पाडताना वेळच मिळेनासा झाला आहे. कृषी विभागानेच पीक नुकसानाच्या याद्या बनविण्याची सर्व कामे करायची तर महसूल विभागाने राज्यस्तरावर पीएम किसान योजनेवर घातलेला बहिष्कार कोणत्या कामाचा, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. राज्यस्तरावर तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार संघटनेने महसूल विभागाला कराव्या लागत असलेल्या शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाच्या याद्या, नुकसानाची मदत यासोबतच महसूल विभागाची कामे याचा अतिरिक्त ताण असल्याचे कारण सांगून पीएम किसान योजनेवर बहिष्कार टाकला होता. मात्र, प्रत्यक्षात भंडारा तालुक्यात पीक नुकसानाच्या याद्या, क्षेत्रासह बनविण्याची कामे कृषी विभागाच्या माथी मारण्याचा प्रकार सुरू आहे.

मात्र, तरीही जिल्हा प्रशासनाचे आदेश स्वीकारून अनेकदा कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी हे काम एकत्रित करतात. कृषी सहाय्यकांची तालुक्यात अनेक रिक्त पदे असतानाही एका कृषी सहाय्यकाकडे पंचनामे करतानाही त्यावेळच्या तहसीलदारांनी आठ ते दहा गावे दिली होती. आजही अनेक कृषी सहाय्यकांकडे तब्बल १५ ते २० गावांचा पदभार आहे. भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नागपूर जिल्ह्यात मात्र ही सर्व कामे महसूल विभागाचे तलाठी, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी यांच्यामार्फत होताना दिसत आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात नियम वेगळा आहे का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून विचारला जात आहे. अनेकदा शासकीय यंत्रणेचे आपण एकत्रित काम करणारे घटक आहोत, याची जाणीव ठेवून कृषी कर्मचारी वरिष्ठांकडे अशा कामाची तक्रार करण्याचे टाळतात. मात्र, याचाच काहीजण फायदा घेत आपले काम दुसऱ्याच्या माथी मारत आहेत. हा प्रकार कधी थांबणार, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

बॉक्स

कृषिमंत्र्यांच्या पत्रानंतरही लसीकरण नाही

कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर जावून शेतकऱ्यांच्या भेटीगाठी, कृषी केंद्रांना भेट द्यावी लागत असल्याचे लक्षात घेऊन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोना लस देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, कृषिमंत्र्यांच्या या पत्राची अद्यापही भंडारा जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली नाही. कोरोना लसीकरणासाठी असा दुजाभाव का केला जात आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.