शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कृषी पर्यटनाचे नवे दालन उघडणार, मथाडी शिवारात कामे अंतिम टप्प्यात

By युवराज गोमास | Updated: April 14, 2024 16:44 IST

भंडारा कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत गणेश शेंडे यांनी महाराष्ट्रातील विविध भागांत कृषी क्षेत्रात झालेले बदल अनुभवले. कृषीतून निर्माण झालेला पर्यटनीय विकास पाहिला. तीच संकल्पना भंडारा जिल्ह्यातही राबवावी, या हेतूने मागील पाच वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

भंडारा : पर्यटन व्यवसाय सर्वत्र झपाट्याने वाढत आहे; परंतु जिल्ह्यात कृषी क्षेत्रात अद्यापही कुठेही पर्यटनीय दृष्टीने कामे झालेली नाहीत. कृषी पर्यटनात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने झपाटलेल्या एका तरुणाने ५ वर्षांपासून त्याच्या २५ एकरांतील खासगी शेतात 'पाटीलवाडी कृषी पर्यटन' या नावाचे नवे दालन सुरू करण्याचा खटाटोप चालविला आहे. त्या तरुणाचे नाव गणेश शेंडे, रा. भंडारा, असे आहे.

भंडारा कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत गणेश शेंडे यांनी महाराष्ट्रातील विविध भागांत कृषी क्षेत्रात झालेले बदल अनुभवले. कृषीतून निर्माण झालेला पर्यटनीय विकास पाहिला. तीच संकल्पना भंडारा जिल्ह्यातही राबवावी, या हेतूने मागील पाच वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी पर्यटन विकासासाठी त्यांनी भंडारा शहरापासून अवघ्या आठ किमी, तर भंडारा ते अड्याळ मार्गावरील पालगाव फाटावरून ३ अंतरावरील मथाडी (पालगाव) शेतशिवाराची निवड केली. खडतर प्रयत्नातून त्यांनी कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल केला.

निव्वळ शेतीवर अवलंबूून न राहता परिसरातील मजुरांनाही रोजगार देता यावा, या उद्देशाने त्यांनी २५ एकर शेतापैकी ५ एकर शेतीवर कृषी पर्यटनाचा विकास केला. हिरवेगार प्रशस्त लॉन, कार्यक्रमांसाठी बैठक सुविधा, मुलांसाठी खेळणे, उडणारे कारंजे, भाेजन सुविधांची उभारणी केली. नौकाविहार, फळ व फुलझाडे, फुलशेती, मत्स्यपालन, बदक व कुक्कुटपालन आदी रोजगाराभिमुख उपक्रमही सुरू केले. नाला काठावरील शेतीचा विकास करीत हिरवेगार रान फुलविले. शेतात पाऊल ठेवताच प्रसन्नतेचा व निसर्ग सान्निध्याची अनुभूती मिळते. कृषी पर्यटकांच्या आवडीनुसार भोजन सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे.

पीक पद्धतीत केले नवनवे प्रयोग -जिल्ह्यात धान शेतीला विशेष महत्त्व आहे; परंतु या शेतीव्यतिरिक्त अन्य पिकांतून मिळणारे उत्पन्न मोठे असते. त्यासाठी त्यांनी नवनवे प्रयोग केले. ठिबक सिंचन व मल्चिंगवर २० एकरांत विविध प्रकारची शेती फुलविली आहे. ३ एकरांत पपई, २ एकरांत केळी, २ एकरांत काकडी, २ एकरांत चवळी, २ एकरात टरबूज, दीड एकरात खरबूज, तर ३ एकरांत मत्स्यपालन व मत्स्यबीजनिर्मितीला प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळे चांगले उत्पन्नही हाती पडत आहे.

३० मजुरांना मिळतोय बारमाही रोजगार -विषमुक्त शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, या जाणीवजागृतीसाठी गणेश शेंडे यांनी स्वत: सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. सेंद्रिय शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा सर्वाधिक हिस्सा रोजगारनिर्मितीवर खर्च होत आहे. सध्या परिसरातील ३० महिला व पुरुषांना त्यांच्या कृषी क्षेत्रातून रोजगार दिला जात आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रtourismपर्यटन