शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अनलॉकनंतर भाजीपाला २५ टक्क्यांनी महागला, सामान्यांनी जगायचे तरी कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST

भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली होती. या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे ...

भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली होती. या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने याचा शेती व्यवसायाला फटका बसला होता. मात्र, आता जून महिन्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेतले जाते. मात्र, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे कांदा व इतर भाज्या, फळे बाहेरील जिल्ह्यातून येथे विक्रीसाठी येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊननंतर सुरू झालेली अनलॉक प्रक्रिया आणि डिझेल, पेट्रोलचे सातत्याने वाढत असलेले दर लक्षात घेता भाजीपाला महागला असल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारात कांदे ३० रुपये किलो, तर बटाटे ४० रुपये किलो, टोमॅटो २५ रुपये, वांगे ३० रुपये किलो, पालेभाज्या १५ रुपये जुडी, भेंडी ३० रुपये किलो असे भाज्यांचे दर वाढलेले दिसून येत आहेत. त्यामुळे आता गृहिणींकडून पुन्हा एकदा कडधान्य, डाळींचा वापर वाढल्याचे दिसत आहे. एकीकडे भाजीपाल्याचे दर वाढले असले तरी दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कमी दरानेच भाजीपाला विकावा लागत आहे. यात व्यापारीच मोठे होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

पुन्हा वरणावर जोर

कोट

आज सर्वसामान्य माणसांना जगताना मोठी कसरत करावी लागत आहे. आठवड्याचा भाजीपाला घ्यायचे म्हटले तर दोनशे ते तीनशे रुपये लागतात. त्याऐवजी डाळींचा, कडधान्याचा अधिक वापर सुरू केला आहे. दररोज वरण, उसळ करते. त्यामुळे त्यातल्या त्यात थोडी बचत करता येते.

शशिकला मोथरकर, खरबी.

कोट

आम्ही स्वतः शेतकरी आहोत. मात्र, वन्यप्राण्यांचा उपद्रव असल्याने भाजीपाला कमी केला आहे. अशातच आम्हालाही जादा दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. प्रत्यक्ष शेतात भाजीपाला पिकवला तरी व्यापाऱ्यांकडून चांगला दर दिला जात नाही.

प्रमिला घाटोळे, खरबी.

म्हणून वाढले दर ...

व्यापारी कोट

बाजारात जिल्ह्यातील भाजीपाला कमी प्रमाणात येत आहे. त्या तुलनेत जिल्ह्याबाहेरून येणारा भाजीपाला हा महागला असल्याने त्यामुळे दर काहीसे वाढले आहेत.

मनीष बुरडे, भाजीपाला व्यापारी.

व्यापारी कोट

लोकांना असे वाटते की, भाजीपाला विक्रेत्यांकडून अधिक दराने भाजीपाला विकला जातो. मात्र, प्रत्यक्षात आम्हालाही जादा दराने खरेदी करावी लागते. स्वस्तात मिळाल्यास आम्हीही ग्राहकांना कमी दराने विकतो.

विनोद वाडीभस्मे, भाजीपाला व्यापारी.

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच...

कोट

मी कारले, चवळी, भटई वांग्याची लागवड केली होती. याला चांगला दरही मिळाला. मात्र, आता इथून पुढे लागवड केलेल्या भाजीपाल्याला चांगला दर मिळेलच याची खात्री नाही. शासनाने खतांचे, बियाण्यांचे दर कमी करायला हवेत.

तानाजी गायधने, भाजीपाला उत्पादक शेतकरी, चिखली.

कोट

भाजीपाला लागवड फायदेशीर ठरते. मात्र, कोरोना परिस्थितीत मजूर मिळत नव्हते. इतर कामातही अडचणी येत होत्या. यावर्षी धानाचे क्षेत्र कमी केले आहे. आता भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढवले आहे. त्यामुळे विक्रीला भाजीपाला येईपर्यंत दर किती राहतो हे सांगता येणार नाही.

पद्माकर चकोले, भाजीपाला उत्पादक शेतकरी, पांढराबोडी.