शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

अनलॉकनंतर भाजीपाला २५ टक्क्यांनी महागला, सामान्यांनी जगायचे तरी कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST

भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली होती. या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे ...

भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली होती. या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने याचा शेती व्यवसायाला फटका बसला होता. मात्र, आता जून महिन्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेतले जाते. मात्र, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे कांदा व इतर भाज्या, फळे बाहेरील जिल्ह्यातून येथे विक्रीसाठी येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊननंतर सुरू झालेली अनलॉक प्रक्रिया आणि डिझेल, पेट्रोलचे सातत्याने वाढत असलेले दर लक्षात घेता भाजीपाला महागला असल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारात कांदे ३० रुपये किलो, तर बटाटे ४० रुपये किलो, टोमॅटो २५ रुपये, वांगे ३० रुपये किलो, पालेभाज्या १५ रुपये जुडी, भेंडी ३० रुपये किलो असे भाज्यांचे दर वाढलेले दिसून येत आहेत. त्यामुळे आता गृहिणींकडून पुन्हा एकदा कडधान्य, डाळींचा वापर वाढल्याचे दिसत आहे. एकीकडे भाजीपाल्याचे दर वाढले असले तरी दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कमी दरानेच भाजीपाला विकावा लागत आहे. यात व्यापारीच मोठे होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

पुन्हा वरणावर जोर

कोट

आज सर्वसामान्य माणसांना जगताना मोठी कसरत करावी लागत आहे. आठवड्याचा भाजीपाला घ्यायचे म्हटले तर दोनशे ते तीनशे रुपये लागतात. त्याऐवजी डाळींचा, कडधान्याचा अधिक वापर सुरू केला आहे. दररोज वरण, उसळ करते. त्यामुळे त्यातल्या त्यात थोडी बचत करता येते.

शशिकला मोथरकर, खरबी.

कोट

आम्ही स्वतः शेतकरी आहोत. मात्र, वन्यप्राण्यांचा उपद्रव असल्याने भाजीपाला कमी केला आहे. अशातच आम्हालाही जादा दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. प्रत्यक्ष शेतात भाजीपाला पिकवला तरी व्यापाऱ्यांकडून चांगला दर दिला जात नाही.

प्रमिला घाटोळे, खरबी.

म्हणून वाढले दर ...

व्यापारी कोट

बाजारात जिल्ह्यातील भाजीपाला कमी प्रमाणात येत आहे. त्या तुलनेत जिल्ह्याबाहेरून येणारा भाजीपाला हा महागला असल्याने त्यामुळे दर काहीसे वाढले आहेत.

मनीष बुरडे, भाजीपाला व्यापारी.

व्यापारी कोट

लोकांना असे वाटते की, भाजीपाला विक्रेत्यांकडून अधिक दराने भाजीपाला विकला जातो. मात्र, प्रत्यक्षात आम्हालाही जादा दराने खरेदी करावी लागते. स्वस्तात मिळाल्यास आम्हीही ग्राहकांना कमी दराने विकतो.

विनोद वाडीभस्मे, भाजीपाला व्यापारी.

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच...

कोट

मी कारले, चवळी, भटई वांग्याची लागवड केली होती. याला चांगला दरही मिळाला. मात्र, आता इथून पुढे लागवड केलेल्या भाजीपाल्याला चांगला दर मिळेलच याची खात्री नाही. शासनाने खतांचे, बियाण्यांचे दर कमी करायला हवेत.

तानाजी गायधने, भाजीपाला उत्पादक शेतकरी, चिखली.

कोट

भाजीपाला लागवड फायदेशीर ठरते. मात्र, कोरोना परिस्थितीत मजूर मिळत नव्हते. इतर कामातही अडचणी येत होत्या. यावर्षी धानाचे क्षेत्र कमी केले आहे. आता भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढवले आहे. त्यामुळे विक्रीला भाजीपाला येईपर्यंत दर किती राहतो हे सांगता येणार नाही.

पद्माकर चकोले, भाजीपाला उत्पादक शेतकरी, पांढराबोडी.