शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

अखेर ‘त्या’ बांधकामाला स्थगिती

By admin | Updated: March 17, 2016 00:31 IST

जलशुद्धीकरण केंद्रालगत भाजी बाजारासाठी ओटे व शेड बांधकाम तत्काळ बंद करून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करा, ...

लोकलढ्याला यश : नियमबाह्य परवानगी देणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणीभंडारा : जलशुद्धीकरण केंद्रालगत भाजी बाजारासाठी ओटे व शेड बांधकाम तत्काळ बंद करून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करा, असा आदेश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिला.येथील रहिवाशी मोरेश्वर लांजेवार यांनी जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाला शासकीय जागेचा दुरूपयोग होत असल्याची तक्रार केली होती. पालिकेच्या अखत्यारित राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या शीट क्र. ५४ वरील भूखंडाचा सीबीटी सब्जी व्यापारी असोसिएशनने केलेला करार नियमबाह्य असल्याचे म्हटले होते. या कामात अनियमितता असून शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत असल्यामुळे हा करार त्वरीत रद्द करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त तथा प्रादेशिक संचालकांनी या प्रकरणाची चौकशी केली. यात दोषी आढळलेल्या संबंधितांविरुद्ध योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, असा आदेश दिला. या दीड एकर जागेवरील भंडारा शहराचे सुधारित विकास योजनेत असलेल्या आरक्षणात आवश्यक ते बदल करण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी प्रस्तावित केले होते. त्यानुसार ही जागा मोठा बाजार व छोटा बाजार थोक भाजी व्यापाऱ्यांकरिता पर्यायी व्यवस्था म्हणून नियमानुसार स्थानांतरण करण्याची कारवाई करावी, असे कळविले होते. ही जमीन थोक भाजीबाजारासाठी वापर करीत असल्याचे आढळून आल्यामुळे पालिकेने अटी व शर्तीचा भंग केल्याचे दिसून येत आहे. ही जमीन सरकारजमा करण्याचे प्रस्तावित असल्याचे भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पत्रावरून स्पष्ट होते. महसूल व वनविभागाच्या पत्रान्वये विकास आराखड्यास अनुज्ञेय असलेल्या प्रयोजनाव्यतिरिक्त अन्य प्रयोजनासाठी वापर सुरू असल्यास सदर वापर तत्काळ बंद करण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त अहवाल व कागदपत्रांचे अवलोकनानंतर ही जागा भाजीबाजाराकरिता वापर होत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ते बांधकाम तात्काळ बंद करून तसा अहवाल जिल्हा कार्यालयाला सादर करावा, असा आदेश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)विविध संघटनांचा पुढाकार