शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

अखेर कृषी कार्यालयाला सुगीचे दिवस

By admin | Updated: August 5, 2015 00:49 IST

सिहोरा येथील लघु पाठबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीच्या खोलीत हरदोली गावात असणाऱ्या मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण होणार आहे.

खोल्यांची रंगरंगोटी : चरण वाघमारे यांनी शब्द पाडलाचुल्हाड/सिहोरा : सिहोरा येथील लघु पाठबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीच्या खोलीत हरदोली गावात असणाऱ्या मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण होणार आहे.सिहोरा येथे गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत मंडळ कृषी कार्यालयाचे जागाअभावी पाच कि़मी. अंतरावरील हरदोली गावात स्थानांतरण करण्यात आले आहे. प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावातून हक्काचा कार्यालय प्रशासकीय कार्यासाठी गावात पडविण्यात आल्याने शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागला आहे. शेतकऱ्यांचे संबंधित कार्यालय सिहोरा गावात असताना मंडळ कृषी कार्यालय याच गावात स्थानांतरीत करण्यासाठी परिसरात ओरड सुरू झाली. परंतु कार्यालयाचे स्थानांतरण करताना दोन विभागाची आडकाठी ठरत होती. या आधी मंडळ कृषी कार्यालय जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या बस स्थानक परिसरातील रिकाम्या प्रसस्त इमारतीत स्थानांतरण करण्याची योजना होती. हरदोली गावातील जीर्ण इमारती मधून प्रशासकीय कारभार होत असल्याने कार्यरत कर्मचारी भित भित सेवा देत होती. दरम्यान सिहोरा गावात लघु पाठबंधारे विभागात कर्मचाऱ्यांसाठी वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. बहुतांश कर्मचारी याच परिसरातील असल्याने कुणी या वसाहतीच्या खोल्यात वास्तव्य करीत नाही. ८-१० खोल्या उपयोगाविना पडून आहेत. या खोल्यात वीज, पाणी, शौचालय तथा अन्य सुविधा आहेत. या रिकाम्या खोल्या मंडळ कृषी कार्यालयाला प्रशासकीय कामकाजासाठी देण्याची विनंती आ. चरण वाघमारे यांना चुल्हाडचे माजी सरपंच भास्कर सोनेवाने, जेष्ठ शेतकरी गजानन निनावे, बालु तुरकर यांनी केले. कृषी आणि पाठबंधारे विभाग राज्य शासनाच्या अखत्यारित असल्याने रिकाम्या खोल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी उपयोगात आणण्यास हरकत नाही, असे चित्र स्पष्ट होताच आ.वाघमारे यांनी जिल्हा स्तरावर वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत बोलनी केली. या खोल्यात महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालय स्थानांतरीत करण्याची ओरड होत आहे. सध्या हे कार्यालय ग्रामीण सचिवालयात असल्याने सरपंच, सचिव, संग्राम कक्ष, सचिवाचा प्रशासकीय कारभार करण्यात अडचण होत आहे. यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालय पाठबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीत गेल्यास शेतकऱ्यांना सोने पे सुहागा ठरणार आहे. एकाच व्यासपिठावर शेतकऱ्यांचे तीन विभाग उपलब्ध राहणार असल्याने राज्यातील पहिलेच उदाहरण ठरणार आहे. हे दोन्ही कार्यालय या वसाहतीत रिकाम्या खोल्यात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव आ. वाघमारे यांचे समस्त ठेवण्यात येणार आहे. (वार्ताहर)