शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कृषी कार्यालयाला सुगीचे दिवस

By admin | Updated: August 5, 2015 00:49 IST

सिहोरा येथील लघु पाठबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीच्या खोलीत हरदोली गावात असणाऱ्या मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण होणार आहे.

खोल्यांची रंगरंगोटी : चरण वाघमारे यांनी शब्द पाडलाचुल्हाड/सिहोरा : सिहोरा येथील लघु पाठबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीच्या खोलीत हरदोली गावात असणाऱ्या मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण होणार आहे.सिहोरा येथे गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत मंडळ कृषी कार्यालयाचे जागाअभावी पाच कि़मी. अंतरावरील हरदोली गावात स्थानांतरण करण्यात आले आहे. प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावातून हक्काचा कार्यालय प्रशासकीय कार्यासाठी गावात पडविण्यात आल्याने शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागला आहे. शेतकऱ्यांचे संबंधित कार्यालय सिहोरा गावात असताना मंडळ कृषी कार्यालय याच गावात स्थानांतरीत करण्यासाठी परिसरात ओरड सुरू झाली. परंतु कार्यालयाचे स्थानांतरण करताना दोन विभागाची आडकाठी ठरत होती. या आधी मंडळ कृषी कार्यालय जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या बस स्थानक परिसरातील रिकाम्या प्रसस्त इमारतीत स्थानांतरण करण्याची योजना होती. हरदोली गावातील जीर्ण इमारती मधून प्रशासकीय कारभार होत असल्याने कार्यरत कर्मचारी भित भित सेवा देत होती. दरम्यान सिहोरा गावात लघु पाठबंधारे विभागात कर्मचाऱ्यांसाठी वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. बहुतांश कर्मचारी याच परिसरातील असल्याने कुणी या वसाहतीच्या खोल्यात वास्तव्य करीत नाही. ८-१० खोल्या उपयोगाविना पडून आहेत. या खोल्यात वीज, पाणी, शौचालय तथा अन्य सुविधा आहेत. या रिकाम्या खोल्या मंडळ कृषी कार्यालयाला प्रशासकीय कामकाजासाठी देण्याची विनंती आ. चरण वाघमारे यांना चुल्हाडचे माजी सरपंच भास्कर सोनेवाने, जेष्ठ शेतकरी गजानन निनावे, बालु तुरकर यांनी केले. कृषी आणि पाठबंधारे विभाग राज्य शासनाच्या अखत्यारित असल्याने रिकाम्या खोल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी उपयोगात आणण्यास हरकत नाही, असे चित्र स्पष्ट होताच आ.वाघमारे यांनी जिल्हा स्तरावर वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत बोलनी केली. या खोल्यात महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालय स्थानांतरीत करण्याची ओरड होत आहे. सध्या हे कार्यालय ग्रामीण सचिवालयात असल्याने सरपंच, सचिव, संग्राम कक्ष, सचिवाचा प्रशासकीय कारभार करण्यात अडचण होत आहे. यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालय पाठबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीत गेल्यास शेतकऱ्यांना सोने पे सुहागा ठरणार आहे. एकाच व्यासपिठावर शेतकऱ्यांचे तीन विभाग उपलब्ध राहणार असल्याने राज्यातील पहिलेच उदाहरण ठरणार आहे. हे दोन्ही कार्यालय या वसाहतीत रिकाम्या खोल्यात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव आ. वाघमारे यांचे समस्त ठेवण्यात येणार आहे. (वार्ताहर)