शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

शिवलालच्या भूखंडाची मागणी प्रशासनाने ठेवली ‘वेटिंग'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:10 IST

घेराव, उपोषण मोर्चा ही आयुध वापरली गेली. ३७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. तरीही प्रशासनाने पुन्हा एकदा शिवलालच्या प्लॉटसाठी आश्वासनाच्या वेटिंगवर ठेवले आहे. प्रशासन आपले आश्वासन पाळणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देसिरसोली प्रकरण : नाना पटोले यांचा प्रशासनाला अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : घेराव, उपोषण मोर्चा ही आयुध वापरली गेली. ३७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. तरीही प्रशासनाने पुन्हा एकदा शिवलालच्या प्लॉटसाठी आश्वासनाच्या वेटिंगवर ठेवले आहे. प्रशासन आपले आश्वासन पाळणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सिरसोली येथील शिवलाल लिल्हारेचे घर पाडून महिना झाला आहे. तहसीलदार यांना घेराव, शिवलालच्या मुलांचे उपोषण, जनाक्रोश मोर्चा यांचा वापर केला गेला. तसेच तहसीलदार व सिरसोलीच्या सरपंचानी एकूण ३७ जणांवर गुन्हे दाखल करुन पोलिसांनी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. शिवलालला त्याच जागचा घरासाठी पट्टा मिळावा व अन्य मागण्यासाठी सत्ता पक्ष सोडून लढाई सुरु केली. तथापि, प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना आश्वासनाच्या जालीम उपायावर एक महिन्यापासून थोपवून ठेवले आहे.प्रशासन आश्वासनाचा अस्त्र वापरुन आंदोलनाची धार बोथड करण्याचा डाव खेळत असल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार यांना घेराव घातले गेले. अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला. हा सगळा प्रकार एका राजकीय नेत्याच्या सुपीक डोक्यातून झाल्याची जाहिर चर्चा होत आहे. तसेच सिरसोलीचे प्रकरण आश्वासनाच्या लांबणीवर टाकण्याचा कंट्रोल त्याच नेत्याच्या हातातून केला जातोय याची चर्चा अनेकजण करीत आहेत. विरोधकांनी शिवलालला हक्क मिळवून देण्यासाठी जनाक्रोश मोर्च्याची मजबूत मोट बांधली. पण प्रशासनाने पून्हा एकदा आश्वासन देवून आंदोलनकर्त्यांना निर्णयासाठी वेटिंगवर ठेवले आहे.या मोर्च्यात काँग्रेसचे राष्टÑीय नेते नाना पटोले यांची एंट्री महत्वाची मानली जाते. त्यांनी मोर्च्यात सहभाग घेतल्याने स्थानिक पुढाऱ्यांना शक्ती मिळाली. मोर्च्यात नाना पटोले यांनी तात्काळ निर्णय घेत नसाल तर मी रस्त्यावर येतो अशा इशारा देताच उपविभागीय अधिकारी हादरले. त्यांनी तात्काळ २९ जूनपर्यंत शिवलालला प्लॉट देण्याची कार्यवाही करतो असे लेखी आश्वासन दिले. पण इकडे आश्वासन देणारे अधिकारी किती खोटारडे आहेत असे संतापल्या सिरसोलीच्या महिलांनी नाना पटोले यांना सांगितले. नाना पटोलेनी, त्या महिलांना अवंतीबाई संबोधून, शब्द दिला, २९ तारीख प्रशासनाची पुढची तारीख नानांची असेल. जिल्ह्यात आंदोलन पेटवलं जाईल अशा जाहिर इशारा नाना पटोले यांनी प्रशानाला दिला आहे.आता शिवलालसह सगळ्या मोहाडीवासीयांचे लक्ष २९ जूनच्या तारखेकडे लागले आहे. प्रशासन आपले आश्वासन पूर्ण करेल काय, यावर आधीच शंका निर्माण होत आहेत. तरीही हे प्रकरण निस्तारायचे की वाढवायचे हे प्रशासनाच्या हाती आहे.