शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शिवलालच्या भूखंडाची मागणी प्रशासनाने ठेवली ‘वेटिंग'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:10 IST

घेराव, उपोषण मोर्चा ही आयुध वापरली गेली. ३७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. तरीही प्रशासनाने पुन्हा एकदा शिवलालच्या प्लॉटसाठी आश्वासनाच्या वेटिंगवर ठेवले आहे. प्रशासन आपले आश्वासन पाळणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देसिरसोली प्रकरण : नाना पटोले यांचा प्रशासनाला अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : घेराव, उपोषण मोर्चा ही आयुध वापरली गेली. ३७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. तरीही प्रशासनाने पुन्हा एकदा शिवलालच्या प्लॉटसाठी आश्वासनाच्या वेटिंगवर ठेवले आहे. प्रशासन आपले आश्वासन पाळणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सिरसोली येथील शिवलाल लिल्हारेचे घर पाडून महिना झाला आहे. तहसीलदार यांना घेराव, शिवलालच्या मुलांचे उपोषण, जनाक्रोश मोर्चा यांचा वापर केला गेला. तसेच तहसीलदार व सिरसोलीच्या सरपंचानी एकूण ३७ जणांवर गुन्हे दाखल करुन पोलिसांनी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. शिवलालला त्याच जागचा घरासाठी पट्टा मिळावा व अन्य मागण्यासाठी सत्ता पक्ष सोडून लढाई सुरु केली. तथापि, प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना आश्वासनाच्या जालीम उपायावर एक महिन्यापासून थोपवून ठेवले आहे.प्रशासन आश्वासनाचा अस्त्र वापरुन आंदोलनाची धार बोथड करण्याचा डाव खेळत असल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार यांना घेराव घातले गेले. अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला. हा सगळा प्रकार एका राजकीय नेत्याच्या सुपीक डोक्यातून झाल्याची जाहिर चर्चा होत आहे. तसेच सिरसोलीचे प्रकरण आश्वासनाच्या लांबणीवर टाकण्याचा कंट्रोल त्याच नेत्याच्या हातातून केला जातोय याची चर्चा अनेकजण करीत आहेत. विरोधकांनी शिवलालला हक्क मिळवून देण्यासाठी जनाक्रोश मोर्च्याची मजबूत मोट बांधली. पण प्रशासनाने पून्हा एकदा आश्वासन देवून आंदोलनकर्त्यांना निर्णयासाठी वेटिंगवर ठेवले आहे.या मोर्च्यात काँग्रेसचे राष्टÑीय नेते नाना पटोले यांची एंट्री महत्वाची मानली जाते. त्यांनी मोर्च्यात सहभाग घेतल्याने स्थानिक पुढाऱ्यांना शक्ती मिळाली. मोर्च्यात नाना पटोले यांनी तात्काळ निर्णय घेत नसाल तर मी रस्त्यावर येतो अशा इशारा देताच उपविभागीय अधिकारी हादरले. त्यांनी तात्काळ २९ जूनपर्यंत शिवलालला प्लॉट देण्याची कार्यवाही करतो असे लेखी आश्वासन दिले. पण इकडे आश्वासन देणारे अधिकारी किती खोटारडे आहेत असे संतापल्या सिरसोलीच्या महिलांनी नाना पटोले यांना सांगितले. नाना पटोलेनी, त्या महिलांना अवंतीबाई संबोधून, शब्द दिला, २९ तारीख प्रशासनाची पुढची तारीख नानांची असेल. जिल्ह्यात आंदोलन पेटवलं जाईल अशा जाहिर इशारा नाना पटोले यांनी प्रशानाला दिला आहे.आता शिवलालसह सगळ्या मोहाडीवासीयांचे लक्ष २९ जूनच्या तारखेकडे लागले आहे. प्रशासन आपले आश्वासन पूर्ण करेल काय, यावर आधीच शंका निर्माण होत आहेत. तरीही हे प्रकरण निस्तारायचे की वाढवायचे हे प्रशासनाच्या हाती आहे.