शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

शिवलालच्या भूखंडाची मागणी प्रशासनाने ठेवली ‘वेटिंग'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:10 IST

घेराव, उपोषण मोर्चा ही आयुध वापरली गेली. ३७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. तरीही प्रशासनाने पुन्हा एकदा शिवलालच्या प्लॉटसाठी आश्वासनाच्या वेटिंगवर ठेवले आहे. प्रशासन आपले आश्वासन पाळणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देसिरसोली प्रकरण : नाना पटोले यांचा प्रशासनाला अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : घेराव, उपोषण मोर्चा ही आयुध वापरली गेली. ३७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. तरीही प्रशासनाने पुन्हा एकदा शिवलालच्या प्लॉटसाठी आश्वासनाच्या वेटिंगवर ठेवले आहे. प्रशासन आपले आश्वासन पाळणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सिरसोली येथील शिवलाल लिल्हारेचे घर पाडून महिना झाला आहे. तहसीलदार यांना घेराव, शिवलालच्या मुलांचे उपोषण, जनाक्रोश मोर्चा यांचा वापर केला गेला. तसेच तहसीलदार व सिरसोलीच्या सरपंचानी एकूण ३७ जणांवर गुन्हे दाखल करुन पोलिसांनी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. शिवलालला त्याच जागचा घरासाठी पट्टा मिळावा व अन्य मागण्यासाठी सत्ता पक्ष सोडून लढाई सुरु केली. तथापि, प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना आश्वासनाच्या जालीम उपायावर एक महिन्यापासून थोपवून ठेवले आहे.प्रशासन आश्वासनाचा अस्त्र वापरुन आंदोलनाची धार बोथड करण्याचा डाव खेळत असल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार यांना घेराव घातले गेले. अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला. हा सगळा प्रकार एका राजकीय नेत्याच्या सुपीक डोक्यातून झाल्याची जाहिर चर्चा होत आहे. तसेच सिरसोलीचे प्रकरण आश्वासनाच्या लांबणीवर टाकण्याचा कंट्रोल त्याच नेत्याच्या हातातून केला जातोय याची चर्चा अनेकजण करीत आहेत. विरोधकांनी शिवलालला हक्क मिळवून देण्यासाठी जनाक्रोश मोर्च्याची मजबूत मोट बांधली. पण प्रशासनाने पून्हा एकदा आश्वासन देवून आंदोलनकर्त्यांना निर्णयासाठी वेटिंगवर ठेवले आहे.या मोर्च्यात काँग्रेसचे राष्टÑीय नेते नाना पटोले यांची एंट्री महत्वाची मानली जाते. त्यांनी मोर्च्यात सहभाग घेतल्याने स्थानिक पुढाऱ्यांना शक्ती मिळाली. मोर्च्यात नाना पटोले यांनी तात्काळ निर्णय घेत नसाल तर मी रस्त्यावर येतो अशा इशारा देताच उपविभागीय अधिकारी हादरले. त्यांनी तात्काळ २९ जूनपर्यंत शिवलालला प्लॉट देण्याची कार्यवाही करतो असे लेखी आश्वासन दिले. पण इकडे आश्वासन देणारे अधिकारी किती खोटारडे आहेत असे संतापल्या सिरसोलीच्या महिलांनी नाना पटोले यांना सांगितले. नाना पटोलेनी, त्या महिलांना अवंतीबाई संबोधून, शब्द दिला, २९ तारीख प्रशासनाची पुढची तारीख नानांची असेल. जिल्ह्यात आंदोलन पेटवलं जाईल अशा जाहिर इशारा नाना पटोले यांनी प्रशानाला दिला आहे.आता शिवलालसह सगळ्या मोहाडीवासीयांचे लक्ष २९ जूनच्या तारखेकडे लागले आहे. प्रशासन आपले आश्वासन पूर्ण करेल काय, यावर आधीच शंका निर्माण होत आहेत. तरीही हे प्रकरण निस्तारायचे की वाढवायचे हे प्रशासनाच्या हाती आहे.