शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

अन्नदात्यासाठी कृषी समर्पक धोरण स्वीकारा -बंडू बारापात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:53 IST

भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकरी सिंचनासाठी नेहमी नागवला जातो. हीच बळीराजाच्या आर्थिक स्थैर्यासाठी चिंतेची बाब आहे. जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी बळीराजाचे हात बळकट करून त्यांच्या सन्मानाकरिता राज्यासह केंद्र शासनाने कृषी समर्पक धोरण तात्काळ अंगीकारले पाहिजे, असे मत भंडारा येथील बिटीबी सब्जी मंडीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बंडू बारापात्रे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करता येईल, याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद....

ठळक मुद्देकृषी अर्थव्यवस्थेला बळकटीकरणाची गरजचर्चेतील व्यक्तीशी थेट संवादसंडे स्पेशल मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकरी सिंचनासाठी नेहमी नागवला जातो. हीच बळीराजाच्या आर्थिक स्थैर्यासाठी चिंतेची बाब आहे. जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी बळीराजाचे हात बळकट करून त्यांच्या सन्मानाकरिता राज्यासह केंद्र शासनाने कृषी समर्पक धोरण तात्काळ अंगीकारले पाहिजे, असे मत भंडारा येथील बिटीबी सब्जी मंडीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बंडू बारापात्रे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करता येईल, याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद....सिंचनाबाबत नेमके काय केले पाहिजे?तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नातील नदीजोड प्रकल्पांना इमाने इतबारे राबविण्याची गरज आहे. या प्रकल्पाने मोठ्यांसह लहान प्रकल्पातही पुरेसा जलसाठा उपलब्ध होऊन कालव्यांच्या सहाय्याने व उपवितरीकांच्या मदतीने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळू शकेल. तसेच बोडी व तलावांचे खोलीकरण करून त्यातील पाणीही उपलब्ध करून दिले जाऊ शकते. शेततळे योजनेलाही प्राधान्य दिले गेले पाहिजे.स्वामीनाथन आयोगाबाबत आपले मत काय?सदर आयोग लागू करणे म्हणजे अन्नदात्याला खरा आधार देण्यासारखा आहे. मात्र या आयोगाच्या तरतुदी लागू करण्याबाबत नेहमी राजकारण केले जाते. तरतुदी लागू झाल्यास खऱ्या अर्थाने बळीराजाला बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. उत्पन्नाच्या आधारावर हमी भाव प्राप्त करून आर्थिक स्थैर्य तो प्राप्त करू शकतो. मागील तीन वर्षांपासून अडीच हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी निघाली नाही हा प्रश्नही मार्गी निघाला पाहिजे.विषमुक्त शेतीबाबत मत काय?आजघडीला शेतजमिनीचा पोत प्रदूषणाने ढासळत चालला आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन विषमुक्त शेती करिता नैसर्गिक पाणी जमिनीत मुरविणे अत्यंत गरजेचे आहे. सेंद्रीय खतांचा वापरही अगत्याने केला पाहिजे.जगाला पोसणारा अन्नदाता आत्महत्या करतो, ही बाब शासनाला आत्मचिंतन करण्यासाठी पुरेशी आहे. मात्र त्याकडे शासन, प्रशासन गंभीरतेने बघत नाही. हाडामासाचा जीव रक्ताचे पाणी करत असताना त्यांच्या वेदनांवर आर्थिक फुंकर घालणे महत्वाचे आहे.शाश्वत सिंचनाकरिता धरणातील पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत पोहचेल याची काळजी विद्यमान स्थितीत घेणे अत्यंत महत्वाचे झाले आहे.