शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगाम पूर्वमशागतीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST

भंडारा जिल्हा भातशेतीसाठी सुप्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात शेतीत शेणखत टाकणे, बांध्या सपाट करणे, केरकचरा पेटविणे, धुरे नीटनेटके करणे, यासह ...

भंडारा जिल्हा भातशेतीसाठी सुप्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात शेतीत शेणखत टाकणे, बांध्या सपाट करणे, केरकचरा पेटविणे, धुरे नीटनेटके करणे, यासह शेत नांगरणे, वखरणे, धुऱ्यावर माती टाकून तुरी लावणे आदी कामाची लगबग सुरू आहे. यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ झालेली वाढ लक्षात घेता, शेतकरी शेणखताकडे वळण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र पाळीव जनावरांची संख्या कमी झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात शेणखत मिळणे कठीण झाले आहे.

‘घंटो का काम मिनटो में’ म्हणून ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची कामे करीत असल्याने बैलजोड्याचे महत्त्व कमी झाले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे, ते आजही यांत्रिक युगात पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी-वखरणी करतानाचे चित्र दिसते. शेतकरी वर्ग आता जनावरे पाळीत नसल्याने शेणखत मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे नाइलाजास्तव रासायनिक खतांचा वापर करावा लागतो. परिणामी शेतजमिनीची सुपिकता नष्ट झाली आहे.

जे शेतकरी जनावरे पाळतात, त्यांच्याकडे शेणखत उपलब्ध असून त्यांनी बांध्यात शेणखत टाकले आहे. कोरोनाच्या सावटात शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळली असून येणाऱ्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे घेण्यासाठी व इतर शेतीविषयक कामासाठी पैशांची जुळवाजुळव करणे शेतकऱ्यांसमोर मोठा गहन प्रश्न आहे. कृषी विभागाने धान्य, बी-बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्यास मोठा दिलासा मिळेल, अशी शेतकऱ्यांना आस आहे. शेतात नांगरणी केल्यानंतर पावसाच्या आगमनाचे वेध मात्र बळीराजाला लागले आहे.