शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

खरीप हंगाम पूर्वमशागतीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST

भंडारा जिल्हा भातशेतीसाठी सुप्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात शेतीत शेणखत टाकणे, बांध्या सपाट करणे, केरकचरा पेटविणे, धुरे नीटनेटके करणे, यासह ...

भंडारा जिल्हा भातशेतीसाठी सुप्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात शेतीत शेणखत टाकणे, बांध्या सपाट करणे, केरकचरा पेटविणे, धुरे नीटनेटके करणे, यासह शेत नांगरणे, वखरणे, धुऱ्यावर माती टाकून तुरी लावणे आदी कामाची लगबग सुरू आहे. यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ झालेली वाढ लक्षात घेता, शेतकरी शेणखताकडे वळण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र पाळीव जनावरांची संख्या कमी झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात शेणखत मिळणे कठीण झाले आहे.

‘घंटो का काम मिनटो में’ म्हणून ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची कामे करीत असल्याने बैलजोड्याचे महत्त्व कमी झाले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे, ते आजही यांत्रिक युगात पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी-वखरणी करतानाचे चित्र दिसते. शेतकरी वर्ग आता जनावरे पाळीत नसल्याने शेणखत मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे नाइलाजास्तव रासायनिक खतांचा वापर करावा लागतो. परिणामी शेतजमिनीची सुपिकता नष्ट झाली आहे.

जे शेतकरी जनावरे पाळतात, त्यांच्याकडे शेणखत उपलब्ध असून त्यांनी बांध्यात शेणखत टाकले आहे. कोरोनाच्या सावटात शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळली असून येणाऱ्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे घेण्यासाठी व इतर शेतीविषयक कामासाठी पैशांची जुळवाजुळव करणे शेतकऱ्यांसमोर मोठा गहन प्रश्न आहे. कृषी विभागाने धान्य, बी-बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्यास मोठा दिलासा मिळेल, अशी शेतकऱ्यांना आस आहे. शेतात नांगरणी केल्यानंतर पावसाच्या आगमनाचे वेध मात्र बळीराजाला लागले आहे.