शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

खरीप हंगाम पूर्वमशागतीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST

भंडारा जिल्हा भातशेतीसाठी सुप्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात शेतीत शेणखत टाकणे, बांध्या सपाट करणे, केरकचरा पेटविणे, धुरे नीटनेटके करणे, यासह ...

भंडारा जिल्हा भातशेतीसाठी सुप्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात शेतीत शेणखत टाकणे, बांध्या सपाट करणे, केरकचरा पेटविणे, धुरे नीटनेटके करणे, यासह शेत नांगरणे, वखरणे, धुऱ्यावर माती टाकून तुरी लावणे आदी कामाची लगबग सुरू आहे. यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ झालेली वाढ लक्षात घेता, शेतकरी शेणखताकडे वळण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र पाळीव जनावरांची संख्या कमी झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात शेणखत मिळणे कठीण झाले आहे.

‘घंटो का काम मिनटो में’ म्हणून ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची कामे करीत असल्याने बैलजोड्याचे महत्त्व कमी झाले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे, ते आजही यांत्रिक युगात पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी-वखरणी करतानाचे चित्र दिसते. शेतकरी वर्ग आता जनावरे पाळीत नसल्याने शेणखत मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे नाइलाजास्तव रासायनिक खतांचा वापर करावा लागतो. परिणामी शेतजमिनीची सुपिकता नष्ट झाली आहे.

जे शेतकरी जनावरे पाळतात, त्यांच्याकडे शेणखत उपलब्ध असून त्यांनी बांध्यात शेणखत टाकले आहे. कोरोनाच्या सावटात शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळली असून येणाऱ्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे घेण्यासाठी व इतर शेतीविषयक कामासाठी पैशांची जुळवाजुळव करणे शेतकऱ्यांसमोर मोठा गहन प्रश्न आहे. कृषी विभागाने धान्य, बी-बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्यास मोठा दिलासा मिळेल, अशी शेतकऱ्यांना आस आहे. शेतात नांगरणी केल्यानंतर पावसाच्या आगमनाचे वेध मात्र बळीराजाला लागले आहे.