शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

८९ टक्के पेरणी खोळंबली

By admin | Updated: July 12, 2015 00:41 IST

पहिल्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजाने खरीप हंगामासाठी पऱ्हे व सोयाबीन तथा अन्य कडधान्याची पेरणी आटोपती घेतली.

रोवणी केवळ ०.३१ टक्के : शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटभंडारा : पहिल्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजाने खरीप हंगामासाठी पऱ्हे व सोयाबीन तथा अन्य कडधान्याची पेरणी आटोपती घेतली. मात्र, त्यानंतर १५ दिवसापासून पावसाने दडी मारली. यामुळे अनेकांची पऱ्हे करण्याच्या मार्गावर तर पेरणीची बियाणे मातीत गडप झाली. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट उभे राहिले. गुरूवारी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाच्या विलंबाने जिल्ह्यात रोवणी केवळ ०.३१ टक्के आटोपली असून पेरणी ११ टक्केच पार पडल्याचे वास्तव आहे.१ जून ते ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ ३१० मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे. जूनच्या मध्यान्हापासून वरूणराजा गायब झाले. तत्पूर्वी पहिल्या पावसाच्या जोरदार आगमनानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक पेरणी व आवत्या, रोवणी केली. मात्र, त्यानंतर सुमारे पंधरा दिवस पावसाने दडी मारली. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, अशांनी रोवण्यांसह पेरणीही आटोपली. परंतू सिंचनाची व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांना पऱ्हे वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दरम्यान पाऊस नसल्याने पेरणी व रोवणी खोळंबली. जिल्ह्यात धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १,८१,५९१ हेक्टर निर्धारित करण्यात आले आहे. त्यापैकी भात नर्सरी १५,६९१.८० हेक्टर क्षेत्र, आवत्या ८,६८५ हेक्टर, रोवणी ५१६.३० हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे. भात पिकाची पेरणी ९,२०१.३० हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आलेली आहे. सर्वसाधारण क्षेत्राचा विचार केल्यास जिल्ह्यात केवळ ५.०६७ टक्केच भात लागवड आटोपली असून सुमारे १,७२,३८.९७ हेक्टर क्षेत्रात म्हणजेच ९४.९३३ टक्के क्षेत्रातील भात लागवड खोळंबली आहे.जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्रापैकी केवळ ०.३१ टक्के क्षेत्रात रोवणी झाली आहे. सोयाबीनसह अन्य कडधान्य पिकांसाठी कृषी विभागाने १,९८,६३९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले. त्यापैकी २२,३३०.२५ हेक्टर क्षेत्रात म्हणजे केवळ ११.२४ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे.धान पिकाखेरीज जिल्ह्यात तूर, मुंग, उडीद हे कडधान्य, भुईमुंग, खरीप तीळ, सोयाबीन हे तेलबिया पीक, हळद, अद्रक, मिरची, भाजीपाला, ऊस आदी पिकांचीही लागवड जिल्ह्यात होते. धान पिकानंतर सोयाबीन व तुर पिकांची लागवडचे क्षेत्र आहे.भंडारा जिल्ह्यात तुर पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८,२५० हेक्टर तर सोयाबीनचे ८,००६ हेक्टर क्षेत्र निर्धारित केले आहे. यापैकी तूर ६,०७४ हेक्टरमध्ये तर सोयाबीन १,५९५ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आलेली आहे. तुर पिकाची २६.४ टक्के तर सोयाबीनची ८०.१ टक्के पेरणी अद्याप खोळंबली आहे. (शहर प्रतिनिधी)