शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

८९ टक्के पेरणी खोळंबली

By admin | Updated: July 12, 2015 00:41 IST

पहिल्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजाने खरीप हंगामासाठी पऱ्हे व सोयाबीन तथा अन्य कडधान्याची पेरणी आटोपती घेतली.

रोवणी केवळ ०.३१ टक्के : शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटभंडारा : पहिल्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजाने खरीप हंगामासाठी पऱ्हे व सोयाबीन तथा अन्य कडधान्याची पेरणी आटोपती घेतली. मात्र, त्यानंतर १५ दिवसापासून पावसाने दडी मारली. यामुळे अनेकांची पऱ्हे करण्याच्या मार्गावर तर पेरणीची बियाणे मातीत गडप झाली. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट उभे राहिले. गुरूवारी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाच्या विलंबाने जिल्ह्यात रोवणी केवळ ०.३१ टक्के आटोपली असून पेरणी ११ टक्केच पार पडल्याचे वास्तव आहे.१ जून ते ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ ३१० मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे. जूनच्या मध्यान्हापासून वरूणराजा गायब झाले. तत्पूर्वी पहिल्या पावसाच्या जोरदार आगमनानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक पेरणी व आवत्या, रोवणी केली. मात्र, त्यानंतर सुमारे पंधरा दिवस पावसाने दडी मारली. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, अशांनी रोवण्यांसह पेरणीही आटोपली. परंतू सिंचनाची व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांना पऱ्हे वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दरम्यान पाऊस नसल्याने पेरणी व रोवणी खोळंबली. जिल्ह्यात धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १,८१,५९१ हेक्टर निर्धारित करण्यात आले आहे. त्यापैकी भात नर्सरी १५,६९१.८० हेक्टर क्षेत्र, आवत्या ८,६८५ हेक्टर, रोवणी ५१६.३० हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे. भात पिकाची पेरणी ९,२०१.३० हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आलेली आहे. सर्वसाधारण क्षेत्राचा विचार केल्यास जिल्ह्यात केवळ ५.०६७ टक्केच भात लागवड आटोपली असून सुमारे १,७२,३८.९७ हेक्टर क्षेत्रात म्हणजेच ९४.९३३ टक्के क्षेत्रातील भात लागवड खोळंबली आहे.जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्रापैकी केवळ ०.३१ टक्के क्षेत्रात रोवणी झाली आहे. सोयाबीनसह अन्य कडधान्य पिकांसाठी कृषी विभागाने १,९८,६३९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले. त्यापैकी २२,३३०.२५ हेक्टर क्षेत्रात म्हणजे केवळ ११.२४ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे.धान पिकाखेरीज जिल्ह्यात तूर, मुंग, उडीद हे कडधान्य, भुईमुंग, खरीप तीळ, सोयाबीन हे तेलबिया पीक, हळद, अद्रक, मिरची, भाजीपाला, ऊस आदी पिकांचीही लागवड जिल्ह्यात होते. धान पिकानंतर सोयाबीन व तुर पिकांची लागवडचे क्षेत्र आहे.भंडारा जिल्ह्यात तुर पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८,२५० हेक्टर तर सोयाबीनचे ८,००६ हेक्टर क्षेत्र निर्धारित केले आहे. यापैकी तूर ६,०७४ हेक्टरमध्ये तर सोयाबीन १,५९५ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आलेली आहे. तुर पिकाची २६.४ टक्के तर सोयाबीनची ८०.१ टक्के पेरणी अद्याप खोळंबली आहे. (शहर प्रतिनिधी)