शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जिल्ह्यात ८६१ आरोग्य पथक करणार घरोघरी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

गृहभेटीद्वारे संशयीत कोविड तपासणी व उपचार, अति जोखमीचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड-१९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, सारी-इली रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण, कोविड-१९ तपासणी आणि उपचार. गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरीकांचे कोविडबाबत आरोग्य शिक्षण. या मोहिमेत भाग घेणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व आरोग्य शिक्षण संदेश स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ८६१ आरोग्य पथक घरोघरी जाऊन आरोग्य जागृती करणार आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्या १२ लाख १८ हजार २११ असून २ लाख ८५ हजार ४१४ कुटुंबांना भेटी देऊन ही पथक वैयक्तिक, कौटुबिक व सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबतची ही त्रिसुत्री आवश्यक असल्याचे महत्व नागरिकांना या मोहिमेत पटवून देणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी पत्रपरिषदेत दिली.‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कोविडमुक्त महाराष्ट्र मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी केलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर व डॉ. प्रशांत उईके उपस्थित होते. पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर २२ दिवस व दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोंबर १२ दिवस अशा दोन टप्यात ही मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.मोहिम राबविण्यासाठी ग्रामीण भागासाठी ७९० तर शहरी भागासाठी ७१ पथके तयार करण्यात आले आहे. एक आरोग्य कर्मचारी व दोन स्वयंसेवक, असे एकूण तीन व्यक्तीचा पथकात समावेश आहे. ही पथक घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षणाची कामे करणार आहेत. ही माहिती शासनाच्या मोबाईल अ‍ॅपवर अपलोड करण्यात येणार आहे.या बाबतचे प्रशिक्षण टिम सदस्यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात ही मोहिम प्रभाविपणे राबविण्याच्या दृष्टिने पाच ते दहा टिमच्या मागे स्थानिकस्तरावर पर्यवेक्षकाची नेमणुक करण्यात आली आहे. मोहिमेचे जिल्हास्तरावरून सनियंत्रण व पर्यवेक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.एक पथक दररोज ५० घरांना भेटी देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान एसपी दोन तपासणे तसेच कॅडीशन आहे का, याची माहिती घेईल. ताप, खोकला, दम लागणे, एसपी दोन कमी अशी कोविडसदृष्य लक्षणे असणाºया व्यक्तींना जवळच्या फिव्हर क्लिनीकमध्ये संदर्भित करण्यात येईल. फिव्हर क्लिनीकमध्ये कोविड - १९ प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार केले जातील.को-मॉर्बीड कंडीशन असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का, याची खात्री केली जाईल आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीसाठी संदर्भित केले जाईल. प्रत्येक ५ ते १० पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भसेवा दिली जाईल. घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समाजवून सांगितले जातील. लोकप्रतिनिधी व खाजगी रुग्णालय, स्वयंसेविका यांचा या मोहिमेसाठी सहभाग घेतला जात आहे. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहिम कोविड-१९ साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईलगृहभेटीद्वारे संशयीत कोविड तपासणी व उपचार, अति जोखमीचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड-१९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, सारी-इली रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण, कोविड-१९ तपासणी आणि उपचार. गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरीकांचे कोविडबाबत आरोग्य शिक्षण. या मोहिमेत भाग घेणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व आरोग्य शिक्षण संदेश स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रकमेचे बक्षिस देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत बक्षिस मिळालेल्या व्यक्ती व संस्थांना जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या हस्ते, तर राज्यस्तरावर मुख्यमंत्री यांच्या हस्ते बक्षिस देण्यात येणार आहेत. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेवून कोविडमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले.