शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शिष्यवृत्तीची ८ हजार ८०७ हजार प्रकरणे 'पेंडिंग'

By admin | Updated: September 7, 2015 00:45 IST

आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच गरजू व मागासलेल्या वर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविते.

देवानंद नंदेश्वर भंडाराआर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच गरजू व मागासलेल्या वर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविते. त्यामुळे काही प्रमाणात का असेना, परंतु शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाची सोय होते. मात्र समाजकल्याण विभागाच्या नियोजन शून्यतेमुळे ५ सप्टेंबरपर्यंत जिल्हास्तरावर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभागाकडे एकूण ८ हजार ८०७ शिष्यवृत्तीचे प्रकरणे प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. परिणामी गतवर्षीच्या २०१४-१५ मधील तब्बल हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या रकमेपासून वंचित आहेत. मागासवर्गीय गटात मोडणाऱ्या अनुसूचित जाती, ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. राज्य सरकारने गतवर्षी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली. सुरुवातीच्या काळात इंटरनेट लिंक फेलमुळे आॅनलाईन अर्ज करण्यास विद्यार्थी व महाविद्यालयांना प्रचंड अडचण आली. त्यानंतर मात्र आॅनलाईन प्रक्रियेचा मार्ग सुकर झाला. भंडारा जिल्ह्यात गतवर्षी २0१४-१५ मध्ये इयत्ता ११ वी ते पदवी, पदव्युत्तरपर्यंतच्या एकूण ४२ हजार २५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीच्या लाभासाठी समाजकल्याण विभागाच्या वेबसाईटवर आॅनलाईन नोंदणी केली. त्यानंतर संबंधित कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाने शिष्यवृत्ती अर्जाची हार्ड कॉपी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय भंडाराकडे सादर केले. त्यानंतर एकूण ३२ हजार ७२५ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्यात आले. यातील ३१ हजार ८१३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला. तब्बल ८ हजार ८०७ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे पेडिंग आहेत. यात महाविद्यालय स्तरावरील १,९८० व जिल्हास्तरावरील ६,८२७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदर विद्यार्थी गतवर्षीच्या शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाला कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित असल्यामुळे शासनाकडून प्राप्त झालेला कोट्यवधी रूपयांचा निधी तसाच पडून आहे. यावर्षी सन २०१५- १६ साठी अर्ज नोंदणीच्या प्रक्रीयेला ५ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे.महाविद्यालय प्रशासनही जबाबदारसन २०१४-१५ वर्षात प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज हार्ड कॉपी स्वरूपात महाविद्यालयांनी समाजकल्याण कार्यालयात सादर केले. मात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाबाबत अनेक कागदपत्रांची पडताळणी न करता समाजकल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर केलेत. त्यामुळे अनेक अर्जांमध्ये प्रचंड त्रूट्या आहेत. वास्तविकता महाविद्यालयस्तरावरच अर्ज व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची योग्य पडताळणी झाली असती तर समाजकल्याण विभागाला शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढणे सुलभ झाले असते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विलंब होण्यास महाविद्यालय प्रशासनही तेवढेच जबाबदार असल्याचे दिसून येते.समाजकल्याण कार्यालयात येरझारासहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे गतवर्षी २०१४-१५ मधील हजारो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत. शिष्यवृत्तीबाबत विद्यार्थी व पालक महाविद्यालयात लिपिक व प्राचार्यांना वारंवार विचारणा करीत आहेत. विद्यार्थ्यांचा ससेमिरा लागल्यामुळे जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य व लिपिक समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात शिष्यवृत्तीच्या प्रलंबित अजार्बाबत येरझारा मारीत आहेत. अर्ज पडताळणीचे काम सुरूआॅनलाईन अर्ज दाखल झाल्यानंतर मार्च २०१५ पूर्वी महाविद्यालयांकडून हार्ड कॉपी स्वरूपात प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्यात आले. महाविद्यालयांकडून हार्ड कॉपी स्वरूपात प्राप्त झालेल्या शिष्यवृत्तीच्या अर्जांमध्ये अनेक त्रूट्या आहेत. सदर अर्ज पडताळणीचे काम सुरू आहे. या महिन्यात सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येईल, असे सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयातर्फे सांगण्यात आले.लोकमतविशेष