शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

७५ हजार विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेला मुकणार

By admin | Updated: June 18, 2017 00:23 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या विविध मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याऐवजी त्यांना केवळ आश्वासन देण्यात येत आहे.

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या : शिक्षक कृती समितीने घेतला निर्णय, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद शिक्षकांच्या विविध मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याऐवजी त्यांना केवळ आश्वासन देण्यात येत आहे. त्यामुळे या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत शाळा उघडायची नाही, असा निर्णय शिक्षक कृती समितीने शनिवारला घेतला. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार २८७ विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसाला मुकणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिकच्या इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या सुमारे ७४० शाळा जिल्ह्यात आहेत. या शाळांमधून ७५ हजार २८७ विद्यार्थी विद्यार्जन घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सुमारे तीन हजार ५०० शिक्षक विद्यार्जनाचे धडे गिरवित आहेत. मात्र विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांवर जिल्हा परिषद प्रशासनाकडून मागील वर्षभरापासून अन्याय होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षकांच्या अनेक समस्या मार्गी लावण्या ऐवजी त्यांना केवळ आश्वासन देवून वेळ मारून नेत आहे. अनेकदा चर्चा, आंदोलने, निवेदने जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले. मात्र प्रशासनाने यावर तोडगा काढण्याऐवजी "वेळकाढू" धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान ६ आॅक्टोबरला जिल्ह्यातील सर्व जि.प. शाळांमध्ये शिक्षकांनी जि.प. समोर महाधरणे आंदोलन केले होते. या आंदोलनातून शिक्षकांनी असंतोष व्यक्त केला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून मागण्या आठवडा भरात निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठावूक, शिक्षकांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत.त्यामुळे शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. या २७ जूनला जि.प. च्या सर्व शाळा सुरू होत आहेत. मात्र शिक्षकांच्या समस्या निकाली निघेपर्यंत शाळा उघडायच्या नाही, असा ठोस निर्णय शिक्षक कृती समितीने आज झालेल्या बैठकीत घेतला आहे. या निर्णयाचे निवेदन शिक्षक कृती समितीने जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मनिषा ठवकर यांना दिले आहे. शिष्टमंडळात कृती समितीचे रमेश सिंगनजुडे, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, केशव बुरडे, महेश गावंडे, प्रमोद घमे, संदीप वडीले, किशोर ईश्वरकर, हरिकिसन अंबादे, रमेश पारधीकर, मुकूंद ठवकर आदींचा समावेश होता.