शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

७५ हजार विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेला मुकणार

By admin | Updated: June 18, 2017 00:23 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या विविध मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याऐवजी त्यांना केवळ आश्वासन देण्यात येत आहे.

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या : शिक्षक कृती समितीने घेतला निर्णय, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद शिक्षकांच्या विविध मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याऐवजी त्यांना केवळ आश्वासन देण्यात येत आहे. त्यामुळे या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत शाळा उघडायची नाही, असा निर्णय शिक्षक कृती समितीने शनिवारला घेतला. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार २८७ विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसाला मुकणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिकच्या इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या सुमारे ७४० शाळा जिल्ह्यात आहेत. या शाळांमधून ७५ हजार २८७ विद्यार्थी विद्यार्जन घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सुमारे तीन हजार ५०० शिक्षक विद्यार्जनाचे धडे गिरवित आहेत. मात्र विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांवर जिल्हा परिषद प्रशासनाकडून मागील वर्षभरापासून अन्याय होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षकांच्या अनेक समस्या मार्गी लावण्या ऐवजी त्यांना केवळ आश्वासन देवून वेळ मारून नेत आहे. अनेकदा चर्चा, आंदोलने, निवेदने जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले. मात्र प्रशासनाने यावर तोडगा काढण्याऐवजी "वेळकाढू" धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान ६ आॅक्टोबरला जिल्ह्यातील सर्व जि.प. शाळांमध्ये शिक्षकांनी जि.प. समोर महाधरणे आंदोलन केले होते. या आंदोलनातून शिक्षकांनी असंतोष व्यक्त केला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून मागण्या आठवडा भरात निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठावूक, शिक्षकांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत.त्यामुळे शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. या २७ जूनला जि.प. च्या सर्व शाळा सुरू होत आहेत. मात्र शिक्षकांच्या समस्या निकाली निघेपर्यंत शाळा उघडायच्या नाही, असा ठोस निर्णय शिक्षक कृती समितीने आज झालेल्या बैठकीत घेतला आहे. या निर्णयाचे निवेदन शिक्षक कृती समितीने जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मनिषा ठवकर यांना दिले आहे. शिष्टमंडळात कृती समितीचे रमेश सिंगनजुडे, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, केशव बुरडे, महेश गावंडे, प्रमोद घमे, संदीप वडीले, किशोर ईश्वरकर, हरिकिसन अंबादे, रमेश पारधीकर, मुकूंद ठवकर आदींचा समावेश होता.